शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

भातपीक घेणाऱ्या भिवंडीत प्रथमच भुईमुगाची यशस्वी शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 18:32 IST

तब्बल दीड एकरात भुईमुगाची शेती केली असून हा भिवंडी तालुक्यातील पहिलाच प्रयोग असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी चांगले पीक आल्याचे पाहिल्याने पुढच्या वर्षी भुईमूगाचे पीक घेण्याचा निर्णय सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे

- नितिन पंडीत

भिवंडी : ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त भातपीक भिवंडी तालुक्यात घेतला जातो, मात्र पावसाचा भरोसा नसल्याने कधी पाऊस कमी तर कधी जास्त. त्यातच शेत मजूर मिळत नाही त्यामुळे मोठी मेहनत घेऊन भातपीक येथील शेतकऱ्यांना घ्यावे लागत आहे. लॉकडाऊनच्या काळात बहुसंख्य शेतकरी कर्जबाजारी सुद्धा झाले आहेत. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये पहारे गावातील तरुण शेतकरी दिपक नारायण भोईर यांनी भुईमुगाच्या शेतीचा पहिला उपक्रम राबवला असून त्यासाठी मातीची तपासणी करून अतिशय चांगल्या प्रकारे भुईमूग लावला असून हे भुईमुगाचे पीक टवटवीत आले आहे. तब्बल दीड एकरात भुईमुगाची शेती केली असून हा भिवंडी तालुक्यातील पहिलाच प्रयोग असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी चांगले पीक आल्याचे पाहिल्याने पुढच्या वर्षी भुईमूगाचे पीक घेण्याचा निर्णय सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे. 

पावसाचा भरोसा नाही तर शेतमजूर मिळत नसल्याने भातपीक घेण्यास अनेक अडचणी येत असल्याने कमी मेहनत आणि पीक जास्त मिळणाऱ्या भुईमुगाच्या पिकाकडे शेतकरी वळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याने तरुण शेतकरी दिपक भोईर यांचे पंचक्रोशीत कौतुक करण्यात येत आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीagricultureशेती