शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भिवंडीतील शेलार ग्रामपंचायतीच्या हंडा मोर्चाला यश ; पाणीपुरवठा सुरळीत व मुबलक करण्याचे स्टेमचे लेखी आश्वासन

By नितीन पंडित | Updated: January 12, 2023 18:04 IST

भिवंडी शहरालगत असलेल्या शेलार ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना स्ट्रेम वॉटर डिस्ट्रीब्यूटर कंपनीकडून होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने व अत्यल्प होत असल्याने शेलार ग्रामपंचायतीवर पाणी संकट ओढवले आहे.

भिवंडी - भिवंडी शहरालगत असलेल्या शेलार ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना स्ट्रेम वॉटर डिस्ट्रीब्यूटर कंपनीकडून होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने व अत्यल्प होत असल्याने शेलार ग्रामपंचायतीवर पाणी संकट ओढवले आहे. याबाबत स्टेम प्राधिकरणाला शेलार ग्रामपंचायतच्या वतीने वारंवार लेखी निवेदने व तक्रारी अर्ज करूनही स्टेम प्राधिकरण शेलार ग्रामपंचायतच्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याकडे सतत दुर्लक्ष करीत होते.स्टेमचमुके या दुर्लक्षित कारभारामुळे शेलार ग्रामपंचायत हद्दीत पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट झाली आहे.स्टेम प्राधिकरणाच्या या नियोजनशून्य कारभाराविरोधात शेलार ग्रामपंचायतचे सरपंच एड. किरण चन्ने यांनी शेकडो ग्रामस्थांना सोबत घेऊन गुरुवारी भिवंडी पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चाचे आयोजन केले होते.शेलार ग्राम पंचायत कार्यालयापासून निघालेल्या या हंडा मोर्चात शेलार गावातील शेकडो नागरिक व महिला सहभागी झाल्या होत्या.

या मोर्चा दरम्यान पंचायत समिती सभागृहात पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व स्टेम प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तिकरित्या आंदोलकर्त्यांशी पाणी प्रश्नावर चर्चा केली.यावेळी आंदोलनकर्त्यांनी स्टेम प्राधिकरणाचे अभियंता प्रथमेश पाटील यांना धारेवर धरत नागरिकांच्या पाणी प्रश्नात स्टेमने राजकारण करू नये असा इशारा आंदोलनकर्ते सरपंच किरण चन्ने यांनी या बैठकीत उपस्थित करत जोपर्यंत स्टेम प्राधिकरण पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार अशी भूमिका घेतली होती. अखेर आंदोलनकर्त्यांची मागणी मान्य करत स्टेमने शेलार ग्राम पंचतीचा पाणी पुरवठा गुरुवारपासून सुरळीत करण्यात येईल व येत्या पंधरा दिवसात शेलार ग्राम पंचयातीस अतिरिक्त पाणी पुरवठा करण्यात येईल असे लेखी आश्वासन स्टेम प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी दिले.त्यांनतर आंदोलनकर्त्यांनी हे आंदोलन स्थगित केले.

 काटई व कांबा गावातील पाणी समस्या सोडविण्यासाठी मिल्लत नगर येथून नवी पाईपलाईन प्रकल्प प्रस्थापित होता मात्र स्टेम प्राधिकरणाने मिल्लत नगर येथून पाईपलाईन न टाकता मागील तीन पाहिन्यांपासून शेलरच्या पाईपलाईनवर काटई कांबा गावची पाईपलाईन जोडली होती त्यामुळे मागील तीन चार महिने शेलार गावाला अत्यल्प पाणीपुरवठा होत होता त्यामुळे गावावर पाणी संकट आले असून अधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत लेखी आश्वासन दिले आहे त्यामुळे येत्या १५ दिवसांमध्ये ज्यादा व सुरळीत पाणीपुरवठा केला नाही तर स्टेम विरोधात शेलार ग्रामपंचायतीच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन केले जाईल अशी प्रतिक्रिया सरपंच किरण चन्ने यांनी दिली आहे.

टॅग्स :thaneठाणे