शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

आई वडिलांच्या धाकाने घर सोडलेल्या मुलीचा शोध घेण्यात यश, कळवा पोलिसांची कामगिरी

By अजित मांडके | Updated: August 21, 2023 18:13 IST

कळव्यातून बेपत्ता झालेल्या एका १६ वर्षीय मुलीचा अवघ्या दोन तासांमध्ये शोध घेण्यात कळवा पोलिसांना यश आले आहे.

ठाणे : कळव्यातून बेपत्ता झालेल्या एका १६ वर्षीय मुलीचा अवघ्या दोन तासांमध्ये शोध घेण्यात कळवा पोलिसांना यश आले आहे. आई वडिलांच्या माराच्या भीतीने तिने दोन दिवसांपूर्वी घर सोडले होते. याप्रकरणी अपहरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी नवी मुंबईतील तुर्भे भागातून तिचा शोध घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कळव्यातील न्यू शिवाजीनगर भागात ही मुलगी वास्तव्याला आहे. तिचे आई वडिल हे मुंबईतील रे रोड भागात बिगारीचे काम करतात. याच कामासाठी ते १९ आॅगस्ट रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या या आजारी मुलीला घरात ठेवून गेले होते. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ते जेंव्हा घरी परतले, त्यावेळी घरातून मुलगी बेपत्ता झाली होती. परिसरात तसेच नातेवाईकांकडे त्यांनी त्यांनी तिचा शोध घेतला. मात्र, रात्री उशिरापर्यंत तिचा शोध लागलाच नाही. अखेर मुलीचे अपहरण झाल्याच्या शक्यतेने तिच्या पालकांनी याप्रकरणी २० आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

अपहरणाचा गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी तिच्या शोधासाठी दोन पथकांची निर्मिती केली. या पथकांनी तिच्या मोबाईलवरील लोकेशनच्या आधारे नवी मुंबईतील तुर्भे भागातून तिचा शोध घेतला.  त्यावेळी ती एका ओळखीतल्या मुलाबरोबर आल्याची माहिती समोर आली. आई वडिल क्षुल्लक बाबीवरुन मारतात, ओरडतात, याचा आपल्याला राग येतो. याच रागातून आपण घर सोडल्याचे तिने पोलिसांना सांगितले. मुलीला विश्वासात घेत तिचे समुपदेशन करण्यात आले. तरीही तिने आई वडिलांकडे जायचेच, नसल्याचा पवित्रा घेतला. अखेर तिची बालसुधारगृहात रवानगी केल्याचे पोलिसांनी सांगितले.

केवळ मोबाईलसाठी किंवा अभ्यासासाठी आई वडिल रागावतात. शिस्तीसाठी ओरडतात, अशा तक्रारी मुलांच्या असतात. पण यात मुलांचे किंवा मुलींचेच हित असते. हे मुलांनी लक्षात घेतले पाहिजे. अगदी किरकोळ गोष्टीवरुन मुलांना ओरडून किंवा मारहाण करण्यापेक्षा त्यांना विश्वासात घ्या. त्यांच्याशी संवाद साधा, असा सल्ला वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिला आहे.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस