शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

भातसा धरण प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याला ५० वर्षांनंतर मिळाले यश !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 00:38 IST

मुंबई पालिकेत मिळणार नोकरी 

वसंत पानसरे     लोकमत न्यूज नेटवर्ककिन्हवली : शहापूर तालुक्यात १९६८ मध्ये बांधण्यात आलेल्या भातसा धरण प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना आता लवकरच मुंबई महापालिकेत नोकरी मिळणार आहे. यातील २८ जणांना त्यांच्या पात्रतेनुसार वर्ग ३ व ४ पदांसाठी संधी देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या आगामी महासभेत मंजुरीसाठी मांडण्यात येणार असून यावर शिक्कामोर्तब होणार आहे. धरणामध्ये आपली राहती घरे व शेतजमिनी गेलेल्या ९७ कुटुंबांना पुढील महिन्यात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते जमिनीचे सातबारावाटप होणार असल्याने आपली हक्काची घरे तब्बल ५० वर्षांच्या संघर्षानंतर मिळणार आहे.

भातसा धरणासाठी ६५३ हेक्टर खाजगी जमीन १९६८/६९ मध्ये संपादित केली होती. यामध्ये पाल्हेरी, पाचीवरे, घोडेपाऊल, पळसपाडा, वाकीचापाडासह  धरण बुडीत क्षेत्रात चार गावे पूर्णतः तर १४ गावे अंशतः बुडीत झालेली होती. यामध्ये एकूण ९७ कुटुंबांची १०१ घरे बाधित होऊन ५७८ ग्रामस्थ रस्त्यावर आले होते. १९६८ / ६९ मध्ये पुनर्वसन कायदा राज्यात नसल्याने त्यांचे पुनर्वसन झालेले नव्हते. १९७६ मध्ये हा कायदा अमलात आल्यापासून प्रकल्पग्रस्त आपल्या मागण्यांसाठी भांडत होते. मात्र, मागील आठ ते दहा वर्षांत सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे यांच्या नेतृत्वाखाली सरकारदरबारी पाठपुरावा करत जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष जगदीश घोडी, शहापूरचे आमदार दौलत दरोडा, माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या सहकार्याने प्रकल्पग्रस्तांना आता कुठे यश मिळणे सुरू झाले आहे.

प्रकल्पबाधित ९७ कुटुंबांचे पुनर्वसन तालुक्यातील शेंडेगाव येथे होणार आहे

. त्या ठिकाणी नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अडीच कोटींच्या विकासकामांच्या प्रशासकीय कामांच्या मंजुरीसाठीचे पत्र भातसा धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांनी उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) यांना दिले आहे. यात शेंडेगावअंतर्गत रस्त्याची व मोरी बांधण्यासाठी ५७ लाख, पाणीपुरवठ्यासाठी ४९ लाख, समाजमंदिरसाठी १६ लाख, स्वच्छतागृहासाठी सात लाख, सांडपाणी व्यवस्थापनासाठी ३३ लाख, गावात अंतर्गत गटारे बांधण्यसाठी ८७ लाख मंजुरीचे पत्र दिलेले आहे.

मुंबई पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, महापालिका माजी आयुक्त प्रवीण परदेशी, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पुनर्वसन अधिकारी उपेंद्र तामोरे, भातसाचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांनी पुढाकार घेऊन विशेष सहकार्य केल्यामुळे प्रलंबित प्रश्न सुटतोय, याचे समाधान आहे.    - बबन हरणे, समन्वयक,     प्रकल्पबाधित संघर्ष समिती