शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

पालिकेच्या बुडत्या जहाजाला अनुदानाच्या कुबड्या

By अजित मांडके | Updated: October 10, 2022 10:27 IST

मागील दोन वर्षे कोरोनाचे सावट होते. आता ते दूर झाले आहे, त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत काही रक्कम खेळू लागली.

- अजित मांडके, उप-मुख्य वार्ताहररोनानंतर ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारल्याचे समाधानकारक चित्र एकीकडे दिसत आहे. महापालिकेने आतापर्यंत ७४१ कोटींचे उत्पन्न मिळविले आहे. मात्र, ठाणे महापालिकेवर आजही २,८०० कोटींच्या आसपास दायित्व आहे. ठेकेदारांची ४५० कोटींच्या आसपास देणी आजही शिल्लक आहेत. महापालिकेला मिळालेल्या ३७० कोटींच्या अनुदानामुळे पालिकेचे बुडते जहाज तरताना दिसत आहे. पालिकेच्या बुडत्या जहाजाला अनुदानाच्या कुबड्या प्राप्त झाल्या आहेत. मात्र, पालिकेवर ही वेळ केवळ कोरोनामुळे आली आहे का? तर त्याचे उत्तर नाही असेच आहे. कोरोनापूर्वी पालिकेकडून हाती घेण्यात आलेल्या मोठ्या प्रकल्पांच्या अवाढव्य खर्चामुळे पालिकेवर हे आर्थिक संकट ओढवले. हे मोठे प्रकल्प मार्गी तर लागले नाहीतच; परंतु, त्यासाठी जो खर्च करण्यात आला, तो पाण्यात गेला.

मागील दोन वर्षे कोरोनाचे सावट होते. आता ते दूर झाले आहे, त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत काही रक्कम खेळू लागली. एक वेळ अशी आली होती की, पालिकेला कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. कोरोनाकाळात पालिकेचा आर्थिक डोलारा कोसळल्याचे दिसून आले. ठेकेदारांची ८५० कोटींची बिले थकली. महापालिका उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविण्यात कमी पडली. आता पालिकेच्या तिजोरीत १०० कोटींची शिल्लक आहेत. मात्र, ही शिल्लक राज्य शासनाकडून विविध विकासकामांसाठी ३७० कोटींचे अनुदान मिळाल्याने दिसत आहे. त्यातून पालिका सध्या विकासकामे करीत आहे. आजही पालिकेच्या तिजोरीवर २,८०० कोटींचे दायित्व आहे. हे देणे देऊन आर्थिक घडी कशी बसवायची, असा पेच पालिकेला सतावत आहे.

तत्कालीन आयुक्तांनी कोरोनापूर्वी शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक मोठमोठ्या प्रकल्पांची घोषणा केली. त्यात पारसिक चौपाटी, रस्ते विकास, नवनवीन उद्यानांची निर्मिती, खाडीचे खारे पाणी गोडे करणे, चौपाट्यांचा विकास, जेटी तयार करणे आदींसह इतर मोठ्या प्रकल्पांची घोषणा केली. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसतानाही हे शिवधनुष्य त्यांनी खांद्यावर उचलले होते. मात्र, कोरोना आला आणि त्यांची बदली झाली. या प्रकल्पांना घरघर लागली. 

काही प्रकल्पांची कामे सुरू झाली तर काही प्रकल्पांवर काम करण्यासाठी सल्लागारांवर कोट्यवधींचा निधी खर्च झाला. काही कमी बजेटच्या कामांना वाढीव बजेट खर्च करण्यात आले. मर्जीतील ठेकेदारांची बिले दबावापोटी एकरकमी काढण्यात आली. मात्र, काहींची आजही ५० टक्के बिले अदा झालेली नाहीत. यामुळेच पालिकेचे जहाज आणखी खोलात गेले.

राज्य शासनाकडून मुद्रांक शुल्क, सुशोभीकरणासाठी आलेल्या अनुदानातूनच पालिकेचा कारभार चालताना दिसत आहे. एकूणच पालिकेच्या बुडत्या जहाजाला अनुदानाच्या कुबड्या मिळाल्यानेच पालिकेच्या जहाजाने तग धरला आहे.  

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका