शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या बुडत्या जहाजाला अनुदानाच्या कुबड्या

By अजित मांडके | Updated: October 10, 2022 10:27 IST

मागील दोन वर्षे कोरोनाचे सावट होते. आता ते दूर झाले आहे, त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत काही रक्कम खेळू लागली.

- अजित मांडके, उप-मुख्य वार्ताहररोनानंतर ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारल्याचे समाधानकारक चित्र एकीकडे दिसत आहे. महापालिकेने आतापर्यंत ७४१ कोटींचे उत्पन्न मिळविले आहे. मात्र, ठाणे महापालिकेवर आजही २,८०० कोटींच्या आसपास दायित्व आहे. ठेकेदारांची ४५० कोटींच्या आसपास देणी आजही शिल्लक आहेत. महापालिकेला मिळालेल्या ३७० कोटींच्या अनुदानामुळे पालिकेचे बुडते जहाज तरताना दिसत आहे. पालिकेच्या बुडत्या जहाजाला अनुदानाच्या कुबड्या प्राप्त झाल्या आहेत. मात्र, पालिकेवर ही वेळ केवळ कोरोनामुळे आली आहे का? तर त्याचे उत्तर नाही असेच आहे. कोरोनापूर्वी पालिकेकडून हाती घेण्यात आलेल्या मोठ्या प्रकल्पांच्या अवाढव्य खर्चामुळे पालिकेवर हे आर्थिक संकट ओढवले. हे मोठे प्रकल्प मार्गी तर लागले नाहीतच; परंतु, त्यासाठी जो खर्च करण्यात आला, तो पाण्यात गेला.

मागील दोन वर्षे कोरोनाचे सावट होते. आता ते दूर झाले आहे, त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत काही रक्कम खेळू लागली. एक वेळ अशी आली होती की, पालिकेला कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. कोरोनाकाळात पालिकेचा आर्थिक डोलारा कोसळल्याचे दिसून आले. ठेकेदारांची ८५० कोटींची बिले थकली. महापालिका उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविण्यात कमी पडली. आता पालिकेच्या तिजोरीत १०० कोटींची शिल्लक आहेत. मात्र, ही शिल्लक राज्य शासनाकडून विविध विकासकामांसाठी ३७० कोटींचे अनुदान मिळाल्याने दिसत आहे. त्यातून पालिका सध्या विकासकामे करीत आहे. आजही पालिकेच्या तिजोरीवर २,८०० कोटींचे दायित्व आहे. हे देणे देऊन आर्थिक घडी कशी बसवायची, असा पेच पालिकेला सतावत आहे.

तत्कालीन आयुक्तांनी कोरोनापूर्वी शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक मोठमोठ्या प्रकल्पांची घोषणा केली. त्यात पारसिक चौपाटी, रस्ते विकास, नवनवीन उद्यानांची निर्मिती, खाडीचे खारे पाणी गोडे करणे, चौपाट्यांचा विकास, जेटी तयार करणे आदींसह इतर मोठ्या प्रकल्पांची घोषणा केली. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसतानाही हे शिवधनुष्य त्यांनी खांद्यावर उचलले होते. मात्र, कोरोना आला आणि त्यांची बदली झाली. या प्रकल्पांना घरघर लागली. 

काही प्रकल्पांची कामे सुरू झाली तर काही प्रकल्पांवर काम करण्यासाठी सल्लागारांवर कोट्यवधींचा निधी खर्च झाला. काही कमी बजेटच्या कामांना वाढीव बजेट खर्च करण्यात आले. मर्जीतील ठेकेदारांची बिले दबावापोटी एकरकमी काढण्यात आली. मात्र, काहींची आजही ५० टक्के बिले अदा झालेली नाहीत. यामुळेच पालिकेचे जहाज आणखी खोलात गेले.

राज्य शासनाकडून मुद्रांक शुल्क, सुशोभीकरणासाठी आलेल्या अनुदानातूनच पालिकेचा कारभार चालताना दिसत आहे. एकूणच पालिकेच्या बुडत्या जहाजाला अनुदानाच्या कुबड्या मिळाल्यानेच पालिकेच्या जहाजाने तग धरला आहे.  

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका