शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

सुभाषचंद्र बोस मैदान ताब्यात घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 02:36 IST

मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रात असलेले नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान ताब्यात घेण्याचे आदेश आयुक्त बालाजी खतगावकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांना दिले

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रात असलेले नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान ताब्यात घेण्याचे आदेश आयुक्त बालाजी खतगावकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांना दिले. मैदानाची मूळ जागा केंद्र सरकारच्या मिठागर विभागाची असली तरी सध्या मैदानाचा ताबा महसूल विभागाकडे आहे. मात्र मैदानातील क्रीडा सोयीसुविधांचा अभाव दूर करण्याकरिता महापालिकेला मैदानाचा ताबा हवा आहे.सध्या या मैदानाचा विकास सीआरझेडच्या नावाखाली खुंटल्याने स्थानिक खेळाडूंना या ठिकाणी अद्ययावत सोईसुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. खेळाडूंसाठी मैदानात असलेल्या शौचालयाची दुरवस्था असून सिझन क्रिकेट सरावासाठी बांधलेल्या नेटच्या काही जाळ्या तुटलेल्या आहेत. काही जाळ््या पालिकेने नव्याने बसवल्या आहेत. या नेटमधील काहींच्या मॅटस् नादुरुस्त झाल्याने मुलांना त्यात क्रिकेटचा सराव करणे अडचणीचे ठरते. अशातच येथील क्रिकेटपटूंना सामने खेळण्यासाठी स्वतंत्र खेळपट्टी उपलब्ध नाही. पर्यायाने टेनिसच्या खेळपट्टीवर सिझन क्रिकेटचे सामने खेळण्यास मनाई केली जाते. त्यामुळे नेट सराव करुनही सामने खेळता येत नसल्याची खंत क्रिकेट प्रशिक्षकांनी व्यक्त केली. मैदानात गवत लावण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली असली तरी महसूल विभाग प्राप्त तक्रारींवर एकतर्फी कारवाई करीत असल्याची डोकेदुखी अधिकाऱ्यांना सहन करावी लागत आहे. अशा एकतर्फी कारवाईवर आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली असून प्राप्त तक्रारींची शहानिशा करुनच कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकाºयांशी अलीकडेच पत्रव्यवहार केला आहे. हे मैदान १८ हेक्टर जागेवर वसले आहे. यानंतर पालिकेने स्टेडीयम साकारण्याचा प्रस्ताव एमसीसी (मुंबई क्रिकेट क्लब) कडे पाठविला होता. मैदानालगतची जागा जाण्याच्या भीतीपोटी स्थानिकांनी स्टेडीयमला विरोध केला.गतवर्षी पालिकेने हे मैदान ताब्यात घेण्यासाठी मिठागरे विभागाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यावर मिठागरे विभागाने बाजारभावानुसार किंमत मोजून मैदानाची जागा ताब्यात घ्यावी, असे लेखी उत्तर पालिकेला २६ नोव्हेंबर २०१७ रोजी कळवले. आर्थिकदृष्ट्या पालिकेला ते अशक्य होते.