शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

सावरकर विरोधाचा प्रतिवाद करण्यासाठी अभ्यास करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:40 IST

सच्चिदानंद शेवडे : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ पुस्तकाचे प्रकाशन

डोंबिवली : विरोध करणाऱ्यांनाही स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पटले असते; मात्र त्यांचे हिंदुत्व आड येते. आता हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर असल्याने विरोधकांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे बुद्धिवाद आणि विज्ञानवादी सावरकरांची गाळीव वाक्ये घेऊ न त्यातून लोकांसमोर मर्यादित सावरकर मांडण्याचा प्रयत्न होत आहे. त्याला उत्तर देण्यासाठी तरुणांनी सावरकर विचारांचा अभ्यास करून उत्तर दिले पाहिजे, असे मत सुप्रसिद्ध व्याख्याते, लेखक सच्चिदानंद शेवडे यांनी व्यक्त केले.

टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ, डोंबिवली आणि पै फे्र ण्ड्स लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने अक्षय जोगलिखित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर- आक्षेप आणि खंडन’ पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा शनिवारी टिळकनगर शाळेच्या पेंढरकर सभागृहात पार पडला. त्यावेळी शेवडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पै फ्रेण्ड्स लायब्ररीचे पुंडलिक पै, टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह श्रीकांत पावगी, अक्षय जोग आदी उपस्थित होते.

शेवडे म्हणाले की, सावरकरांना जाऊन अर्धशतक झाले आहे. तरीही, त्यांचे विचार आणखी लोकांपर्यंत जात आहे. हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे सरकार सत्तेत आहे. पूर्वी प्रिंट मीडिया, लिखाणाच्या क्षेत्रात डाव्या विचारांचे प्राबल्य होते. आता इलेक्ट्रॉनिक मीडियामध्येउजव्या हातांचे प्राबल्य असल्याने विरोधकांना जशास तशी उत्तरे मिळत आहे. सावरकर नास्तिकवादी कसे होते, हे सांगण्यासाठी सावरकरांचा बुद्धिवाद आणि विज्ञानवाद यातील सोयीस्कर वाक्ये निवडून ती लोकांसमोर मांडली जातात. त्यांना छेद द्यायचा असल्यास सावरकर वाचले पाहिजेत. एखादी गोष्ट नाकारणे सोपे असते; पण ती स्वीकारली तर अभ्यास करावा लागतो. त्यामुळे सोशल मीडियावर सावरकरांच्या विचारांना स्वीकारणारी तरुण मंडळी गोंधळलेली दिसते, असे त्यांनी सांगितले.

शेवडे यांनी अक्षय यांचे कौतुक करताना तरुण लेखकांनी संदर्भ देऊन लिखाण केले पाहिजे. आज समाजाला सावरकरांच्या विचारांची अधिक गरज असल्याचेही ते पुढे म्हणाले.

विशेष घटना, दुर्मीळ छायाचित्रांचा उल्लेखअक्षय जोग म्हणाले की, सावरकरांच्या माझी जन्मठेप या आत्मचरित्राचे वाचन केल्यावर आपल्या जीवनाला एक नवी दिशा मिळाली. त्यानंतर, झपाट्याने सावरकर चरित्र वाचण्यास सुरुवात केली. पुस्तकांत आतापर्यंत घेतलेल्या आक्षेपांचे सप्रमाण खंडन केले आहेच, शिवाय सावरकरांच्या जीवनातील काही विशेष घटनांचा, दुर्मीळ छायाचित्रांचा आणि त्यांच्यावरील इतर देशांत प्रकाशित झालेल्या साहित्याचा उल्लेखही पुस्तकांत संदर्भ म्हणून केलेला आहे.