शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

कल्याण शहराजवळच्या गावांतील विद्यार्थ्यांचा जीवघेणा शाळा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 06:55 IST

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाणे, पालघर जिल्ह्यांतील शहरांनास्मार्ट सिटीचे वेध लागले आहेत.

सुरेश लोखंडेठाणे : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाणे, पालघर जिल्ह्यांतील शहरांना स्मार्ट सिटीचे वेध लागले आहेत. एकीकडे शहरे स्मार्ट होत असताना या जिल्ह्यांतील ग्रामीण, आदिवासी दुर्गम भागांच्या समस्या कायम आहेत. विद्यार्थ्यांना अजूनही नदीनाल्यांतून जीवघेणा प्रवास करून शाळा गाठावी लागत आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहराजवळील गावांसह शहापूर, मुरबाड, भिवंडी तालुक्यांत, तर पालघर जिल्ह्यातील मोखाडा, डाहाणू, जव्हार आणि तलासरीतील विद्यार्थी पाण्यातून मृत्यूची वाट तुडवत शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना झगडावे लागत असल्याचे विदारक चित्र दुर्गम भागात दिसत आहे.अहमदनगर महामार्गावरील कल्याण तालुक्यातील मामणोली गावापासून तीन किलोमीटरवरील बांगरवाडीतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी नदीनाल्यांच्या पाण्यातून वाट काढत चौथी इयत्तेनंतरचे शिक्षण घेण्यासाठी कुंदे येथील शाळेत जात आहेत. बांगरवाडीत ४० घरे आहेत. पाण्याशी दोन हात करून विद्यार्थ्यांना प्रवास करून शाळेत जावे लागत असल्याची शोकांतिका पाहायला मिळत आहे. बांगरवाडीपासून कुंदे गावापर्यंतचा काही रस्ता सिमेंट काँक्रीटचा आहे; पण २०० मीटरचा रस्ता हा जागेच्या वादामुळे अपूर्णावस्थेत आहे. याच रस्त्यावरून नाल्यासारखे पाणी वाहत आहे. त्या पाण्यातून रस्त्याचा अंदाज घेत विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना तीन ते चार फूट पाण्यात वाट काढावी लागत आहे.विद्यार्थी आपली दप्तरे कशीबशी सांभाळत डोक्यावर घेऊ न या पाण्यातून शाळेत जातात. त्यांना ओल्या गणवेशातच वर्गात शिक्षण घ्यावे लागत आहे. या रस्त्यावरील वाहत्या पाण्यातून विद्यार्थी वाहून जाण्याची भीती आहे.शाळेची ओढ लागलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी एकमेकांचा हात धरून पाण्यातून वाट काढत शिक्षण घेत आहेत. याप्रमाणेच शहापूर तालुक्यातील डिंभे येथील सुमारे ५० विद्यार्थी नदीनाले आणि ओहोळाच्या पाण्यातून टहारपूर येथील संत ज्ञानेश्वर विद्यामंदिर शाळेत जात आहेत. याशिवाय, भिवंडी तालुक्यातील बीजपाडा येथील २५ विद्यार्थी शहापूर तालुक्यातील पिवळी येथील किल्ले माहुली ग्रामीण विद्यालयात नदीओढे पार करून येतात. तानसा अभयारण्यातील या दोन्ही गावांच्या विद्यार्थ्यांना नदीनाल्यांच्या पुराशीही सामना करावा लागतो. सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतर या विद्यार्थ्यांना पायी प्रवास करावा लागत आहे. मुरबाड तालुक्यातील टोकावडेच्या जंगलपट्ट्यात, शाई, काळूच्या खोऱ्यांतील काही गावपाड्यांच्या विद्यार्थ्यांना असाच प्रवास करत शिक्षण घ्यावे लागत आहे.>पालघरमध्ये होडी, टायरवरून प्रवासपालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यामधील तलवाडा गावाजवळील भावडी गावातील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना १२ महिने लाकडी होडीतून प्रवास करावा लागतो. १०० मीटर नदीचे पात्र ओलांडून विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागते. त्यासाठी शासनाने काहीही व्यवस्था केलेली नाही. गावकऱ्यांनीच लाकडी होडी तयार करून व्यवस्था केली आहे.विक्रमगड तालुक्यातील म्हसा या गावातील विद्यार्थिनी-विद्यार्थी नदीच्या पाण्यात टायर सोडतात. या नदीपात्रात तरंगणाºया टायरवर बसून विद्यार्थी नदीतून प्रवास करून वाकी येथे शाळेत जातात. जव्हारच्या डोंगरपाड्यातील, डहाणूतील आष्टेपाडा येथील विद्यार्थीही ओहोळाच्या पाण्यातून वाट काढून शाळेत जातात. धांगडा, डोंगरशेत परिसरातील विद्यार्थ्यांनाही जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.काळू नदीला पूल नसल्यामुळे नदीच्या पाण्यातून तलासरीच्या सावरोली-अणवीर या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे. मोखाडा तालुक्यातील बोटोशी, आमळे, घोडीपाडा, मुकुंदपाडा, कोल्हेधाव, बालघोडा, कुरलोड पीकी, आंब्याचापाडा, रायपाडा आदी गावांतील विद्यार्थ्यांना नदीपात्रातून येजा करावी लागते. या जीवघेण्या प्रवासामुळे अनेक मुलांनी शाळाच सोडली आहे. जव्हार तालुक्यातील सारसून, खंडीपाडा, विनवल, माळघर, दापटी, वांगणी, बेहडपाडा या गावांचा रस्त्यातील मोरीचा पाइप दोन ठिकाणी फुटला आहे. त्यातील पाण्यात पडून जीवितहानी होण्याची शक्यता गावकºयांसह विद्यार्थी वर्तवत आहेत.