शहरं
Join us  
Trending Stories
1
लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
4
दहशत माजवणारा साद रिझवी कुठे गायब झाला? पीएम शहबाज शरीफ यांच्याही आणलेले नाकी नऊ!
5
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
6
WhatsApp युजर्सना मोठा धक्का; ChatGPT चा वापर करू देणार नाही मेटा, कारण...
7
"मोठी सती सावित्री बनून फिरतेय, रीलमध्ये फक्त पेटीकोटवर...", तान्या मित्तलची मालतीकडून पोलखोल
8
"आर्यनने त्याच्या दु:खावर सर्वांना हसवलं...", लक्ष्य लालवानीने केलं शाहरुखच्या लेकाचं कौतुक
9
"नगरविकास खाते माझ्याकडे; पैशांचा तुटवडा येणार नाही"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात मोठा दावा
10
बांके बिहारी मंदिराच्या १०० वर्षांहून जुन्या 'तळघरात' अखेर काय सापडलं? साडे चार फूट सोन्याची काठी...
11
कारनामा! १६ वर्षांनी जिवंत सापडला मृत मुलगा; वडिलांनी हडपले ७२ लाख, अखेर फुटलं बिंग
12
Virender Sehwag Birthday: 'नजफगडचा नवाब' 47 वर्षांचा! वीरेंद्र सेहवागचे 4 महारेकॉर्ड्स, जे आजपर्यंत कुणीच तोडू शकलं नाही!
13
NSE Holidays 2025: उद्या शेअर बाजारात कामकाज सुरू राहणार का? स्टॉक मार्केटला कधी-कधी आहेत सुट्ट्या, पाहा यादी
14
अभिनेता अंकुर वाढवे दुसऱ्यांदा झाला बाबा; फोटो पोस्ट करत म्हणाला, "यावेळी मुलगा..."
15
"अणुयुद्ध झाले असते, मी २००% टॅरिफ लावण्याची धमकी दिली म्हणून..."; भारत-पाकिस्तान युद्धावर काय म्हणाले ट्रम्प?
16
Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक
17
'आमचा विश्वास कायद्यावर आहे, पण...' : जुबिन गर्ग यांच्या मृत्यूला एक महिना पूर्ण, तरीही गूढ कायम!
18
Laxmi Pujan 2025 Puja Vidhi: लक्ष्मीपूजन कसे करावे? पहा साहित्याची यादी, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि आरती
19
Bank FD मध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा २ लाखांपेक्षा अधिक व्याज; ही बँक देतेय जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
20
न भूतो न भविष्यति! दीपिका पादुकोण-ॲटलीच्या आगामी सिनेमावर रणवीर सिंहची प्रतिक्रिया

कल्याण शहराजवळच्या गावांतील विद्यार्थ्यांचा जीवघेणा शाळा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 06:55 IST

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाणे, पालघर जिल्ह्यांतील शहरांनास्मार्ट सिटीचे वेध लागले आहेत.

सुरेश लोखंडेठाणे : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाणे, पालघर जिल्ह्यांतील शहरांना स्मार्ट सिटीचे वेध लागले आहेत. एकीकडे शहरे स्मार्ट होत असताना या जिल्ह्यांतील ग्रामीण, आदिवासी दुर्गम भागांच्या समस्या कायम आहेत. विद्यार्थ्यांना अजूनही नदीनाल्यांतून जीवघेणा प्रवास करून शाळा गाठावी लागत आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहराजवळील गावांसह शहापूर, मुरबाड, भिवंडी तालुक्यांत, तर पालघर जिल्ह्यातील मोखाडा, डाहाणू, जव्हार आणि तलासरीतील विद्यार्थी पाण्यातून मृत्यूची वाट तुडवत शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना झगडावे लागत असल्याचे विदारक चित्र दुर्गम भागात दिसत आहे.अहमदनगर महामार्गावरील कल्याण तालुक्यातील मामणोली गावापासून तीन किलोमीटरवरील बांगरवाडीतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी नदीनाल्यांच्या पाण्यातून वाट काढत चौथी इयत्तेनंतरचे शिक्षण घेण्यासाठी कुंदे येथील शाळेत जात आहेत. बांगरवाडीत ४० घरे आहेत. पाण्याशी दोन हात करून विद्यार्थ्यांना प्रवास करून शाळेत जावे लागत असल्याची शोकांतिका पाहायला मिळत आहे. बांगरवाडीपासून कुंदे गावापर्यंतचा काही रस्ता सिमेंट काँक्रीटचा आहे; पण २०० मीटरचा रस्ता हा जागेच्या वादामुळे अपूर्णावस्थेत आहे. याच रस्त्यावरून नाल्यासारखे पाणी वाहत आहे. त्या पाण्यातून रस्त्याचा अंदाज घेत विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना तीन ते चार फूट पाण्यात वाट काढावी लागत आहे.विद्यार्थी आपली दप्तरे कशीबशी सांभाळत डोक्यावर घेऊ न या पाण्यातून शाळेत जातात. त्यांना ओल्या गणवेशातच वर्गात शिक्षण घ्यावे लागत आहे. या रस्त्यावरील वाहत्या पाण्यातून विद्यार्थी वाहून जाण्याची भीती आहे.शाळेची ओढ लागलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी एकमेकांचा हात धरून पाण्यातून वाट काढत शिक्षण घेत आहेत. याप्रमाणेच शहापूर तालुक्यातील डिंभे येथील सुमारे ५० विद्यार्थी नदीनाले आणि ओहोळाच्या पाण्यातून टहारपूर येथील संत ज्ञानेश्वर विद्यामंदिर शाळेत जात आहेत. याशिवाय, भिवंडी तालुक्यातील बीजपाडा येथील २५ विद्यार्थी शहापूर तालुक्यातील पिवळी येथील किल्ले माहुली ग्रामीण विद्यालयात नदीओढे पार करून येतात. तानसा अभयारण्यातील या दोन्ही गावांच्या विद्यार्थ्यांना नदीनाल्यांच्या पुराशीही सामना करावा लागतो. सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतर या विद्यार्थ्यांना पायी प्रवास करावा लागत आहे. मुरबाड तालुक्यातील टोकावडेच्या जंगलपट्ट्यात, शाई, काळूच्या खोऱ्यांतील काही गावपाड्यांच्या विद्यार्थ्यांना असाच प्रवास करत शिक्षण घ्यावे लागत आहे.>पालघरमध्ये होडी, टायरवरून प्रवासपालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यामधील तलवाडा गावाजवळील भावडी गावातील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना १२ महिने लाकडी होडीतून प्रवास करावा लागतो. १०० मीटर नदीचे पात्र ओलांडून विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागते. त्यासाठी शासनाने काहीही व्यवस्था केलेली नाही. गावकऱ्यांनीच लाकडी होडी तयार करून व्यवस्था केली आहे.विक्रमगड तालुक्यातील म्हसा या गावातील विद्यार्थिनी-विद्यार्थी नदीच्या पाण्यात टायर सोडतात. या नदीपात्रात तरंगणाºया टायरवर बसून विद्यार्थी नदीतून प्रवास करून वाकी येथे शाळेत जातात. जव्हारच्या डोंगरपाड्यातील, डहाणूतील आष्टेपाडा येथील विद्यार्थीही ओहोळाच्या पाण्यातून वाट काढून शाळेत जातात. धांगडा, डोंगरशेत परिसरातील विद्यार्थ्यांनाही जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.काळू नदीला पूल नसल्यामुळे नदीच्या पाण्यातून तलासरीच्या सावरोली-अणवीर या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे. मोखाडा तालुक्यातील बोटोशी, आमळे, घोडीपाडा, मुकुंदपाडा, कोल्हेधाव, बालघोडा, कुरलोड पीकी, आंब्याचापाडा, रायपाडा आदी गावांतील विद्यार्थ्यांना नदीपात्रातून येजा करावी लागते. या जीवघेण्या प्रवासामुळे अनेक मुलांनी शाळाच सोडली आहे. जव्हार तालुक्यातील सारसून, खंडीपाडा, विनवल, माळघर, दापटी, वांगणी, बेहडपाडा या गावांचा रस्त्यातील मोरीचा पाइप दोन ठिकाणी फुटला आहे. त्यातील पाण्यात पडून जीवितहानी होण्याची शक्यता गावकºयांसह विद्यार्थी वर्तवत आहेत.