शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

पहिल्या यादीवर विद्यार्थ्यांची नजर; ठाण्यातील महाविद्यालयांचाही कटआॅफ वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 02:11 IST

दहावीचा निकाल चांगला लागला असून त्यात ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने यंदाही अकरावीच्या प्रवेशासाठी चुरस पाहायला मिळणार आहे.

ठाणे : दहावीचा निकाल चांगला लागला असून त्यात ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने यंदाही अकरावीच्या प्रवेशासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. उद्या (गुरुवारी) अकरावी प्रवेशाची पहिली मेरिट लिस्ट जाहीर होणार असून ठाण्यातील प्रमुख महाविद्यालयांचा कटआॅफ एक ते दोन टक्क्याने वाढण्याची शक्यता आहे.मुंबईप्रमाणेच ठाण्यातीलही प्रमुख महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढतो आहे. निकाल लागल्यावर प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरताना विद्यार्थी सर्वच प्रमुख महाविद्यालयांच्या गतवर्षीच्या कटआॅफची शोधाशोध करतात आणि त्यानुसारच महाविद्यालयांना पसंतीक्रम देतात. यंदा चांगल्या निकालामुळे सर्वच महाविद्यालयांचा कटआॅफ वाढण्याची शक्यता आहे. ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाºयांची संख्या मोठी असल्याने अनेक विद्यार्थ्यांना पहिल्याच लिस्टमध्ये प्रथम पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल की नाही, अशी धाकधूक आहे. वाढत्या गुणवत्तेबरोबर महाविद्यालयांच्या प्रत्येक शाखेच्या कटआॅफमध्ये वाढ होते आहे. हीच परिस्थिती यंदाही कायम राहिली, तर अनेक विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीच्या महाविद्यालयासाठी दुसºया मेरिट लिस्टवर, तर काहींना तिसºया मेरिट लिस्टपर्यंतही वाट पाहावी लागू शकते, असे मत काही प्राचार्यांनी व्यक्त केले आहे.यंदाच्या दहावीच्या निकालात ८५ ते ९५ टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाही प्रमुख महाविद्यालयांचा कटआॅफ किमान दोन टक्क्याने वाढणार, हे नक्की. त्यामुळे ८५ ते ९५ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना तरी पहिल्याच मेरिट लिस्टमध्ये प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळण्याची शक्यता कमी आहे.- डॉ. चंद्रशेखर मराठे, प्राचार्य, सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय

टॅग्स :thaneठाणे