शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

पहिल्या यादीवर विद्यार्थ्यांची नजर; ठाण्यातील महाविद्यालयांचाही कटआॅफ वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 02:11 IST

दहावीचा निकाल चांगला लागला असून त्यात ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने यंदाही अकरावीच्या प्रवेशासाठी चुरस पाहायला मिळणार आहे.

ठाणे : दहावीचा निकाल चांगला लागला असून त्यात ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने यंदाही अकरावीच्या प्रवेशासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. उद्या (गुरुवारी) अकरावी प्रवेशाची पहिली मेरिट लिस्ट जाहीर होणार असून ठाण्यातील प्रमुख महाविद्यालयांचा कटआॅफ एक ते दोन टक्क्याने वाढण्याची शक्यता आहे.मुंबईप्रमाणेच ठाण्यातीलही प्रमुख महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढतो आहे. निकाल लागल्यावर प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरताना विद्यार्थी सर्वच प्रमुख महाविद्यालयांच्या गतवर्षीच्या कटआॅफची शोधाशोध करतात आणि त्यानुसारच महाविद्यालयांना पसंतीक्रम देतात. यंदा चांगल्या निकालामुळे सर्वच महाविद्यालयांचा कटआॅफ वाढण्याची शक्यता आहे. ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाºयांची संख्या मोठी असल्याने अनेक विद्यार्थ्यांना पहिल्याच लिस्टमध्ये प्रथम पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल की नाही, अशी धाकधूक आहे. वाढत्या गुणवत्तेबरोबर महाविद्यालयांच्या प्रत्येक शाखेच्या कटआॅफमध्ये वाढ होते आहे. हीच परिस्थिती यंदाही कायम राहिली, तर अनेक विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीच्या महाविद्यालयासाठी दुसºया मेरिट लिस्टवर, तर काहींना तिसºया मेरिट लिस्टपर्यंतही वाट पाहावी लागू शकते, असे मत काही प्राचार्यांनी व्यक्त केले आहे.यंदाच्या दहावीच्या निकालात ८५ ते ९५ टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाही प्रमुख महाविद्यालयांचा कटआॅफ किमान दोन टक्क्याने वाढणार, हे नक्की. त्यामुळे ८५ ते ९५ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना तरी पहिल्याच मेरिट लिस्टमध्ये प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळण्याची शक्यता कमी आहे.- डॉ. चंद्रशेखर मराठे, प्राचार्य, सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय

टॅग्स :thaneठाणे