शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना ना पुस्तके, ना वह्या

By admin | Updated: June 24, 2016 03:39 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शाळा सुरू होऊन महिना उलटल्यावच शालेय साहित्य मिळते.

जान्हवी मोर्ये,  कल्याणकल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शाळा सुरू होऊन महिना उलटल्यावच शालेय साहित्य मिळते. यंदाही तोच शिरस्ता महापालिकेने पाळणार असल्याचे दिसत आहे. पहिल्या दिवशी तर सोडाच पण अजूनही त्यांना शालेय साहित्य मिळालेले नाही. अगोदर विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता आणि आता महापालिकेने कंत्राटादाराला साहित्य खरेदीसाठी कार्यादेश दिले नसल्याने खरेदीच रखडली आहे. दरम्यान, यामुळे विद्यार्थी आणि पालक संतप्त झाले आहेत. कल्याण-डोंबिवलीच्या ६७ शाळांमध्ये १० हजार ५०० विद्यार्थी आहेत. त्यांना महापालिका दरवर्षी गणवेश, बूट, दप्तर, रेनकोट आदी शालेय साहित्य पुरविते. या साहित्यांची वेळेवर खरेदी करून ते शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पडेल, यासाठी प्रशासनाने कधीच प्रयत्न केलेले नाहीत. शालेय साहित्यांच्या खरेदीसाठी महापालिकेने तीन कोटी २५ लाख रुपये खर्चास मान्यता दिली आहे. दोन वर्षांसाठी शालेय साहित्य खरेदीचा दर निश्चित करण्यात आला आहे. मागील वर्षी ज्या कंत्राटदाराने शालेय साहित्याची खरेदी करून विद्यार्थ्यांना त्याचा पुरवठा केला, त्याच कंत्राटदाराला कंत्राटदाराला महापालिकेने यंदा कार्यादेश देणे बाकी होते. दर वर्षी काही ना काही कारण सांगून शालेय साहित्याची खरेदी वेळेवर होत नाही. याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता यंदा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा विषय मार्गी लागू शकलेला नाही, असे सांगण्यात आले. शिवसेनेचे माजी नगरसेवक कैलास शिंदे पाच वर्षे महापालिकेतील शाळांना शालेय साहित्य वेळेवर मिळावे, यासाठी झगडत होते. त्यांच्या पाठपुराव्यामुळे विद्यार्थ्यांना दोन महिन्यांनी का होईना प्रशासनाकडून शालेय साहित्याचे वाटप केले जात होते. आता शिंदे नगरसेवक नसल्याने त्यांच्याऐवजी कोण पाठपुरावा करणार, हा खरा प्रश्न आहे. एकाही सदस्याला असा पाठपुरावा करून गरीब विद्यार्थ्यांना वेळेत साहित्य मिळावे, असे वाटत नाही. शिक्षण मंडळाच्या सदस्यांनी देखिल ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिलेली नाही. महापालिका स्मार्ट सिटीसाठी २ हजार कोटींचा प्रस्ताव तयार करते. तसेच स्मार्ट सिटी शिखर परिषदेसाठी १५ लाखांचा खर्च करते. मात्र त्याच महापालिका हद्दीतील महापालिका शाळा स्मार्ट कशा होतील, याचा विचार करत नाही. विद्यार्थ्यांना कालानुरूप स्मार्ट शिक्षण मिळावे, यासाठी काहीच विचार झालेला नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे.