शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
3
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
4
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
5
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
6
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
7
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
8
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
9
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
10
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
11
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
12
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
13
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
14
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
15
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
16
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
17
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
18
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
19
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
20
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं

आश्रमशाळेतील विद्यार्थी आहारापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 01:15 IST

आदिवासी विकास प्रकल्पा मार्फत चालविण्यात येणाऱ्या आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना दिला जाणारा फळांचा सकस पौष्टिक आहार बंद करून दूध पुरवठा करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला.

जव्हार - आदिवासी विकास प्रकल्पा मार्फत चालविण्यात येणाऱ्या आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना दिला जाणारा फळांचा सकस पौष्टिक आहार बंद करून दूध पुरवठा करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला. मात्र आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना अद्यापर्यंत आहार पुरविला जात नाही. आदिवासी विद्यार्थ्यांना फक्त उसळीचा नाश्ता, डाळ भात भाजी मिळत असून, दूध पुरवठयाचे टेंडर गेल्या वर्षभरापासून रखडले आहे. त्यामुळे आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना ना फळांचा , ना दुधाचा पुरवठा अशी स्थिती आहे. त्यामुळे आश्रम शाळेतील निवासी विद्यार्थ्यांचा आरोग्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.जव्हार आदिवासी विकास प्रकल्पा मार्फत ३० शासकीय आश्रम शाळा व १७ विनाअनुदानित आश्रम शाळा असून, अशा एकूण-४७ आश्रम शाळा चालविल्या जात असून, एकूण १७ हजार ५४० विद्यार्थी त्यात निवासी शिक्षण घेत आहेत.या विद्यार्थांना यापूर्वी दररोज सकाळी सकस आहार म्हणून केळी, सफरचंद, मोसंबी, अंडी असा सकस आणि पौष्टिक आहार पुरविण्यात येत होता. मात्र आदिवासी विकास विभागाने फळांचा सकस आहार बंद करून, दूध पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. मात्र आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना मागील वर्षपासून दूधही मिळत नाही त्यामुळे ना फळांचा ना दुधाचा पुरवठा अशी अवस्था आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच जूनच्या सुरवातीचे काही महिने मुख्याध्यापकस्तरावर टेंडर मागवुन दूध पुरवठा केला जावा, असे आदेश प्रकल्प अधिका-यांनी दिले होते. मात्र वेळेत ठेकेदाराचे बिल मिळत नाही, किंवा अन्य अडचणींमुळे मुख्याध्यापकांनीही दूध पुरवठा करण्यास नकार दिला. त्यामुळे आदिवासी विभागाने आदिवासी विद्यार्थ्यांच्या पोटावर गदा आणली आहे.सध्या आदिवासी विद्यार्थ्यांना फक्त सकाळी काडधान्य उसळीचा नाश्ता, दुपारी डाळ, भात, भाजी खाण्याची वेळ आली आहे. कुठलाच पौष्टीक आहार मिळत नसल्याने पालकवर्गही चिंतेत असून, आमच्या विद्यार्थ्यांना फळांचा पुरवठा नियमित करावा अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून केली जात आहे.फळांचा आहार बंदच केला आहे. गेल्या वर्षी टेंडर काढायला उशीर झाला. या महिनाभरातच दूध चालू करण्यात येईल.- अजित कुंभारे (भा.प्र. से.) प्रकल्प अधिकारी,आमच्या मुलांना आश्रम शाळेत सफरचंद, केळी, अंडी, मिळत होती. तोपर्यंत आमची मुलं आनंदाने शाळेत जात होती. परंतु आता शाळेत फळं व अंडी असा आहार मिळत नसल्याने ती आता शाळेत जायला नकार देत आहेत.- चिंतामण कुरबुडे, पालक.आम्ही नेहमी सकस आहार व फळांबाबत शाळेतील मुख्याध्यापकांना विचारणा करतो. दूध येईल असें सांगण्यात येतें. परंतु ते ही काही मिळत नाही. त्यामुळे प्रकल्पाने फळे किंवा दूध असा कुठलातरी आहार चालू करावा.- सुधीर बुधर, पालक

टॅग्स :Studentविद्यार्थीpalgharपालघर