शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळेतील विद्यार्थी आहारापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 01:15 IST

आदिवासी विकास प्रकल्पा मार्फत चालविण्यात येणाऱ्या आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना दिला जाणारा फळांचा सकस पौष्टिक आहार बंद करून दूध पुरवठा करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला.

जव्हार - आदिवासी विकास प्रकल्पा मार्फत चालविण्यात येणाऱ्या आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना दिला जाणारा फळांचा सकस पौष्टिक आहार बंद करून दूध पुरवठा करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला. मात्र आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना अद्यापर्यंत आहार पुरविला जात नाही. आदिवासी विद्यार्थ्यांना फक्त उसळीचा नाश्ता, डाळ भात भाजी मिळत असून, दूध पुरवठयाचे टेंडर गेल्या वर्षभरापासून रखडले आहे. त्यामुळे आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना ना फळांचा , ना दुधाचा पुरवठा अशी स्थिती आहे. त्यामुळे आश्रम शाळेतील निवासी विद्यार्थ्यांचा आरोग्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.जव्हार आदिवासी विकास प्रकल्पा मार्फत ३० शासकीय आश्रम शाळा व १७ विनाअनुदानित आश्रम शाळा असून, अशा एकूण-४७ आश्रम शाळा चालविल्या जात असून, एकूण १७ हजार ५४० विद्यार्थी त्यात निवासी शिक्षण घेत आहेत.या विद्यार्थांना यापूर्वी दररोज सकाळी सकस आहार म्हणून केळी, सफरचंद, मोसंबी, अंडी असा सकस आणि पौष्टिक आहार पुरविण्यात येत होता. मात्र आदिवासी विकास विभागाने फळांचा सकस आहार बंद करून, दूध पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. मात्र आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना मागील वर्षपासून दूधही मिळत नाही त्यामुळे ना फळांचा ना दुधाचा पुरवठा अशी अवस्था आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच जूनच्या सुरवातीचे काही महिने मुख्याध्यापकस्तरावर टेंडर मागवुन दूध पुरवठा केला जावा, असे आदेश प्रकल्प अधिका-यांनी दिले होते. मात्र वेळेत ठेकेदाराचे बिल मिळत नाही, किंवा अन्य अडचणींमुळे मुख्याध्यापकांनीही दूध पुरवठा करण्यास नकार दिला. त्यामुळे आदिवासी विभागाने आदिवासी विद्यार्थ्यांच्या पोटावर गदा आणली आहे.सध्या आदिवासी विद्यार्थ्यांना फक्त सकाळी काडधान्य उसळीचा नाश्ता, दुपारी डाळ, भात, भाजी खाण्याची वेळ आली आहे. कुठलाच पौष्टीक आहार मिळत नसल्याने पालकवर्गही चिंतेत असून, आमच्या विद्यार्थ्यांना फळांचा पुरवठा नियमित करावा अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून केली जात आहे.फळांचा आहार बंदच केला आहे. गेल्या वर्षी टेंडर काढायला उशीर झाला. या महिनाभरातच दूध चालू करण्यात येईल.- अजित कुंभारे (भा.प्र. से.) प्रकल्प अधिकारी,आमच्या मुलांना आश्रम शाळेत सफरचंद, केळी, अंडी, मिळत होती. तोपर्यंत आमची मुलं आनंदाने शाळेत जात होती. परंतु आता शाळेत फळं व अंडी असा आहार मिळत नसल्याने ती आता शाळेत जायला नकार देत आहेत.- चिंतामण कुरबुडे, पालक.आम्ही नेहमी सकस आहार व फळांबाबत शाळेतील मुख्याध्यापकांना विचारणा करतो. दूध येईल असें सांगण्यात येतें. परंतु ते ही काही मिळत नाही. त्यामुळे प्रकल्पाने फळे किंवा दूध असा कुठलातरी आहार चालू करावा.- सुधीर बुधर, पालक

टॅग्स :Studentविद्यार्थीpalgharपालघर