शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहि‍णींची दिवाळी गोड होणार! सप्टेंबरचे १५०० रुपये लवकरच मिळणार, तारीख आली समोर
2
"क्या बड़ा तो सबसे दम बड़ा, राग आला की...", गोपीचंद पडळकरांच्या टीकेवर जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
3
केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा; कर्मचाऱ्यांना मारहाण केली, लाखो रुपये पळवले
4
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
5
जर्मनीपासून एक पाऊल दूर! ट्रम्प यांच्या निकटवर्तीयानंही मान्य केली भारताची ताकद, भागीदारीसाठी हात पुढे
6
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
7
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
8
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
9
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
10
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
11
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
12
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
13
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
14
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
15
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
16
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
17
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
18
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
19
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
20
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला

ऑफलाइन होणाऱ्या परीक्षेमुळे विद्यार्थी तणावात, पालक चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 23:43 IST

कोरोनाची धास्ती : सरकारकडून आधीपासूनच संभ्रमाचे वातावरण

स्नेहा पावसकर ठाणे : एकीकडे कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पुन्हा काही शहरे लाॅकडाऊनच्या तयारीत आहेत. मात्र, अशातच दहावी-बारावीच्या परीक्षा प्रत्यक्ष केंद्रावरच होणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केल्याने बहुतांश परीक्षार्थी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच वर्षभर प्रत्यक्ष शाळा नसल्याने अभ्यासाची नसलेली लिंक, परीक्षेबाबतचा गोंधळ आणि आता परीक्षेसाठी बाहेर पडताना कोरोनाची धास्ती या सगळ्यांमुळे विद्यार्थी तणावात आहेत.

कोरोनाचा संसर्ग काहीसा कमी झाला म्हणून मागील महिन्यापासून शासनाने ९ वी ते १२ वीच्या प्रत्यक्ष शाळा सुरू केल्या. त्यानंतर ५ वी ते ८ वीच्या शाळाही काही जिल्ह्यांत सुरू करण्यात आल्या. मात्र, गेल्या आठवडाभरापासून राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुन्हा काही जिल्ह्यांत शाळा ६ मार्चपर्यंत बंद केल्या आहेत. 

ग्रामीण ठाणे जिल्ह्यात सुरू झालेल्या शाळा पुन्हा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी आढावा बैठकीत दिले.  मात्र आता त्यातच दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याच्या शासनाच्या निर्णयाने विद्यार्थ्यांसह पालक संभ्रमित झाले आहेत.

कोरोनाची रुग्णसंख्या परत वाढते आहे. परीक्षा एप्रिल मे महिन्यात आहे. तोपर्यंत काय स्थिती असेल माहीत नाही. मात्र, अशा धोकादायक स्थितीत मुलांना परीक्षेसाठी घराबाहेर पाठवणे तरी धोक्याचे वाटते. येत्या महिनाभरात कोरोना रुग्णसंख्या कमी होईल अशी अपेक्षा आहे.- मंजुळा रेळे, पालक

वर्षभरात अभ्यास जसा ऑनलाइन झाला किंवा इतर काही इयत्तांच्या परीक्षा ऑनलाइन झाल्या तसेच दहावीच्या परीक्षाही ऑनलाइन घेणे शक्य आहे का, हे शासनाने पडताळून पाहून नंतरच निर्णय घेतला असता तर बरे झाले असते. - हिमानी सवाखंडे, पालक

बारावीच्या ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय तसा चुकीचा नाही. मात्र, कोरोनाचे वाढते संकट पाहता त्याला पर्याय काही असेल का, हे पाहायला हवे.- माधव जिनकर, पालक

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे