शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

मुंबई-नाशिक महामार्गावर विद्यार्थ्यांच्या बसला अपघात; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

By नितीन पंडित | Updated: January 29, 2024 18:01 IST

चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पुढील ट्रकवर आदळली.

भिवंडी : नाशिक येथून मुंबईच्या दिशेने शालेय सहलीसाठी निघालेल्या खाजगी लक्झरी बसला भिवंडी तालुक्यातील पडघा येथे सोमवारी सकाळी पडघा टोलनाका परिसरात अपघात झाला आहे. या अपघातात बसचे नुकसान झाले. पण सुदैवाने बसमधील कोणीही जखमी न झाल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

नाशिक जिल्ह्यातील माध्यमिक विद्यालय बिलोली या शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची सहल ठाणे येथील टीकुजिनी वाडी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी दोन स्वतंत्र खाजगी लक्झरी बसमधून येथील विद्यार्थी सहलीसाठी निघाले होते. तालुक्यातील पडघा येथील टोलनाका परिसरात बस आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पुढील ट्रकवर आदळली.

या अपघातात बसच्या समोरील बाजूची काच फुटली. परंतु  बसमधील ५५ विद्यार्थिनी यांना कोणतीही दुखापत झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पडघा पोलिस रुग्णवाहिकेसह दाखल झाले होते. या घटनेची नोंद पडघा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी