शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

एसटीची प्रवासी संख्या २० टक्क्यांनी घटली, प्रवासी भारमान अभियानाला कोरोनामुळे ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 01:17 IST

जगावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटामुळे प्रवासी भारमान अभियानाला ब्रेक लागण्याची भीती वर्तवली जात आहे.

- पंकज रोडेकर ठाणे : खासगी बससेवेमुळे महाराष्ट्र  राज्य परिवहन विभागाची प्रवासी संख्या आधीच कमी झाली आहे. ती वाढण्यासाठी राज्य परिवहन विभागाने १ मार्च ते ३० एप्रिल असे प्रवासी भारमान अभियान सुरू केले आहे. यासाठी प्रवासी भारमान वाढवणाऱ्या डेपोंना (आगार) रोख रकमेचे बक्षीस जाहीर केले आहे. मात्र, जगावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटामुळे या अभियानाला ब्रेक लागण्याची भीती वर्तवली जात आहे. कोरोनामुळे ठाणे परिवहन विभागातील प्रवासी भारमान हे गेल्या काही दिवसांत २० टक्क्यांनी घटल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे परिवहन विभागांतर्गत आठ डेपो येत असून, सुमारे ६०० गाड्या राज्यभर धावत आहेत. त्यातच दहावी-बारावीच्या परीक्षा कालावधीत प्रवासी भारमान नेहमीच कमी होते. यामुळे या अभियानात ठाणे परिवहन विभागाने प्रवासी भारमान वाढून बक्षीस मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ठाणे विभागातील भारमान जवळपास ६५ इतके आहे; परंतु सध्या सर्वत्र कोरोनाचे संकट ओढवलेले आहे. यामुळे सद्य:स्थिती प्रवासी भारमान वाढण्याऐवजी ते सुमारे २० टक्क्यांनी क मी झाले असून, ठाणे परिवहन विभागाचे भारमान हे ४० टक्क्यांवर आले आहे.एसी बसमध्ये सॅनिटायझरची व्यवस्थामहाराष्टÑ राज्य परिवहन सेवेच्या वातानुकूलित बसमध्ये ठाणे परिवहन विभागामार्फत सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे. बसमधील प्रत्येक प्रवाशांच्या हातावर देऊन त्यांचा प्रवास सुखकार व्हावा, हा उद्देश आहे. त्याचबरोबर या सॅनिटायझरच्या बाटल्या प्रामुख्याने मीरारोड-भार्इंदर आणि पुणे या ठिकाणी धावणाºया बसच्या स्थानकांवर आणि चालकांकडे दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.पुण्याकडील प्रवासी संख्येत घटठाण्याच्या वंदना एसटी स्टॅण्डवरून एकूण ५६ फेºया या दिवसाला ठाणे ते पुणे अशा धावतात. मात्र, कोरोनामुळे आता पुण्याकडे जाणाºया प्रवाशांची संख्याही घटली आहे. शनिवारी सकाळी तर वंदना येथे सात गाड्या उभ्या होत्या. मात्र, पुण्याला जाणाºया प्रवाशांची संख्या ही अवघी एक होती. त्यामुळे प्रवासी संख्या वाढली तर पुण्याकडे गाड्या सोडण्यात येतील, अन्यथा विनाकारण बस सोडणे चुकीचे असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर अक्कलकोट आणि शिर्डीकडे जाणाºया प्रवाशांची संख्या कमी झाली आहे.टीएमटीच्या सेवेवरपरिणाम नाहीठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेवर कोरोनाचा सद्य:स्थितीत कोणताही परिणाम झालेला नाही. प्रवासी संख्या वाढलेली नाही, तशीच ती कमी झालेलीही नाही, अशी माहिती ठामपा परिवहन व्यवस्थापक व उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली. 

टॅग्स :state transportएसटी