शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
5
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
6
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
7
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
8
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
9
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
10
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
11
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
12
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
13
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
14
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
15
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
16
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
17
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
18
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
19
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
20
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...

एसटीची प्रवासी संख्या २० टक्क्यांनी घटली, प्रवासी भारमान अभियानाला कोरोनामुळे ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 01:17 IST

जगावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटामुळे प्रवासी भारमान अभियानाला ब्रेक लागण्याची भीती वर्तवली जात आहे.

- पंकज रोडेकर ठाणे : खासगी बससेवेमुळे महाराष्ट्र  राज्य परिवहन विभागाची प्रवासी संख्या आधीच कमी झाली आहे. ती वाढण्यासाठी राज्य परिवहन विभागाने १ मार्च ते ३० एप्रिल असे प्रवासी भारमान अभियान सुरू केले आहे. यासाठी प्रवासी भारमान वाढवणाऱ्या डेपोंना (आगार) रोख रकमेचे बक्षीस जाहीर केले आहे. मात्र, जगावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटामुळे या अभियानाला ब्रेक लागण्याची भीती वर्तवली जात आहे. कोरोनामुळे ठाणे परिवहन विभागातील प्रवासी भारमान हे गेल्या काही दिवसांत २० टक्क्यांनी घटल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे परिवहन विभागांतर्गत आठ डेपो येत असून, सुमारे ६०० गाड्या राज्यभर धावत आहेत. त्यातच दहावी-बारावीच्या परीक्षा कालावधीत प्रवासी भारमान नेहमीच कमी होते. यामुळे या अभियानात ठाणे परिवहन विभागाने प्रवासी भारमान वाढून बक्षीस मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ठाणे विभागातील भारमान जवळपास ६५ इतके आहे; परंतु सध्या सर्वत्र कोरोनाचे संकट ओढवलेले आहे. यामुळे सद्य:स्थिती प्रवासी भारमान वाढण्याऐवजी ते सुमारे २० टक्क्यांनी क मी झाले असून, ठाणे परिवहन विभागाचे भारमान हे ४० टक्क्यांवर आले आहे.एसी बसमध्ये सॅनिटायझरची व्यवस्थामहाराष्टÑ राज्य परिवहन सेवेच्या वातानुकूलित बसमध्ये ठाणे परिवहन विभागामार्फत सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे. बसमधील प्रत्येक प्रवाशांच्या हातावर देऊन त्यांचा प्रवास सुखकार व्हावा, हा उद्देश आहे. त्याचबरोबर या सॅनिटायझरच्या बाटल्या प्रामुख्याने मीरारोड-भार्इंदर आणि पुणे या ठिकाणी धावणाºया बसच्या स्थानकांवर आणि चालकांकडे दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.पुण्याकडील प्रवासी संख्येत घटठाण्याच्या वंदना एसटी स्टॅण्डवरून एकूण ५६ फेºया या दिवसाला ठाणे ते पुणे अशा धावतात. मात्र, कोरोनामुळे आता पुण्याकडे जाणाºया प्रवाशांची संख्याही घटली आहे. शनिवारी सकाळी तर वंदना येथे सात गाड्या उभ्या होत्या. मात्र, पुण्याला जाणाºया प्रवाशांची संख्या ही अवघी एक होती. त्यामुळे प्रवासी संख्या वाढली तर पुण्याकडे गाड्या सोडण्यात येतील, अन्यथा विनाकारण बस सोडणे चुकीचे असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर अक्कलकोट आणि शिर्डीकडे जाणाºया प्रवाशांची संख्या कमी झाली आहे.टीएमटीच्या सेवेवरपरिणाम नाहीठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेवर कोरोनाचा सद्य:स्थितीत कोणताही परिणाम झालेला नाही. प्रवासी संख्या वाढलेली नाही, तशीच ती कमी झालेलीही नाही, अशी माहिती ठामपा परिवहन व्यवस्थापक व उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली. 

टॅग्स :state transportएसटी