शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वाहतूक विभागाच्या कारवाईने धास्तावले, नऊ महिन्यांत एक कोटीचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 04:16 IST

उल्हासनगरमध्ये अपघातांत घट : नऊ महिन्यांत एक कोटीचा दंड वसूल

सदानंद नाईक

उल्हासनगर : विठ्ठलवाडी व उल्हासनगर वाहतूक विभागाने ९ महिन्यांत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर धडक कारवाई अपघातांच्या प्रमाणात घट झाली आहे. पोलिसांनी वाहनधारकांकडून सुमारे एक कोटी रूपयांचा दंड वसूल केला असून, सर्वाधिक गुन्हे विनापरवाना वाहन चालविण्याचे दाखल केले आहेत.

उल्हासनगर वाहतूकविभागाने रस्ता सुरक्षा सप्ताह शिस्तबध्द रितीने साजरा केल्याने हा विभाग प्रकाशझोतात आला. विठ्ठलवाडी व उल्हासनगर वाहतूक विभागाने चालू वर्षी चमकदार कामगिरी केली असून दंडात्मक रक्कमेची वसुलीही कोट्यवधीच्या घरात गेली. एकट्या उल्हासनगर वाहतूक विभागाने ९ महिन्यांत एक कोटीची दंडात्मक वसुली केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक घेटे यांनी दिली. भरधाव गाडी चालवणे, विनापरवाना गाडी चालवणे, अल्पवयीन मुलांनी गाडी चालवणे, मद्यपाशन करून गाडी चालवणे, पोलिस-प्रेस आणि मराठी नंबर प्लेट लिहिलेल्या गाड्यांवर एकूण ३९ हजारांपेक्षा जास्त केसेस दाखल करून त्यांच्याकडून ९३ लाख ५७ हजाराचा दंड वसूल केला. सर्वाधिक केसेस विनापरवाना गाडी चालवल्याच्या आहेत.विठ्ठलवाडी वाहतूक विभागाची कामगिरी उल्हासनगर विभागाच्या खालोखाल आहे. या कारवायांमुळे अपघातांच्या प्रमाणात दोन्हीकडे घट झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक घेटे यांनी दिली. एका वर्षात दोन्ही वाहतूक विभागाची दंडात्मक वसुली दोन कोटींपेक्षा जास्त होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. शहरातील मुलांना वाहतूक नियमांबाबत माहिती मिळण्यासाठी ट्राफिक गार्डनची संकल्पना त्यांनी मांडली असून, त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी पालिका आयुक्तांना पत्र दिल्याचे सांगितले.मुंबईला दोन ट्राफिक गार्डन असून उल्हासनगरात तसे गार्डन उभे राहिल्यास, हजारो विद्यार्थ्यांनावाहतूक नियमाची माहिती देता येईल. मुलांच्या सहलीचे हे मुख्य ठिकाण होणार असल्याचेही घेटे यांनी सांगितले.ई-चलन मशिनद्वारे दंडवसुलीच्वाहतुकीचे नियम मोडणाºयांकडून वाहतूक पोलिस विशिष्ट रकमेची पावती यापूर्वी देत होते. त्यावरून नागरिक व पोलिसांत अनेकदा वाद झाले आहेत. १४ फेबु्रवारीपासून शासनाने ई-चलन मशिनद्बारे दंडात्मक रक्कम घेण्याची सुविधा वाहतूक विभागाला दिली.च्त्यानुसार रोख नसेल, तर एटीएम कार्डद्वारे दंडाची रक्कम देता येणार आहे. वाहनधारकावर पूर्वीची दंडाची रक्कम बाकी असेल, तर तीही रक्कम ई-चलन मशीन दाखविणार आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस