शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

उल्हासनगरातील १३०० इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट; हजारो नागरिकांचे जीव टांगणीला 

By सदानंद नाईक | Updated: May 12, 2023 17:23 IST

उल्हासनगर : शहरात ऐन पावसाळ्यात इमारत स्लॅब कोसळून होणारी दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने १० वर्ष पेक्षा जुन्या १३०० इमारतींना नोटिसा ...

उल्हासनगर : शहरात ऐन पावसाळ्यात इमारत स्लॅब कोसळून होणारी दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने १० वर्ष पेक्षा जुन्या १३०० इमारतींना नोटिसा देऊन, त्यांच्यात जनजागृतीसाठी शिबीर बोलाविले. टॉउन हॉल मधील शिबिरात नागरिकांनी सुरक्षेसाठी आपापल्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आयुक्त अजीज शेख यांनी सांगितले.

 उल्हासनगरात दरवर्षी पावसाळ्या मध्ये धोकादायक इमारतीचे स्लॅब कोसळून जीवित व वित्तहानी होते. महापालिकेने इमारत कोसळून जीवितहानी टाळण्यासाठी शहरातील १० वर्ष जुन्या तब्बल १३०० इमारतींना नोटिसा देऊन, इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे सुचविले आहे. याबाबत नागरिकांत जनजागृती होण्यासाठी गुरवारी सायंकाळी ५ वाजता टॉउन हॉल मध्ये शिबिराचें आयोजन केले होते. शिबिराला नागरिकांसह राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, महापालिका अधिकारी, पोलीस व तहसीलदार, वास्तुविशारद, अभियंता, नाखवा अभियंता पथक आदीजन उपस्थिती होते. यावेळी आयुक्तांनी धोकादायक इमारती बाबत माहिती देऊन, नोटिसा दिलेल्या १३०० इमारती मधील नागरिकांनी स्ट्रक्चरल ऑडिट करून ऑडिट नंतर सुचविलेली इमारत दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

 महापालिकेने नेमून दिलेली नाखवा संस्था अथवा मान्यताप्राप्त खाजगीकडून स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे असल्याचे आयुक्तांनी सांगितले. महापालिकेचे नगररचनाकार प्रकाश मुळे यांनी इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिट बाबत माहिती देऊन, स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर इमारतीचा अहवाल महापालिकेकडे सादर करून ऑडिट मध्ये दिल्याप्रमाणे इमारतीची दुरुस्ती करण्याचे मुळे यांनी सुचविले. शिबिराला आमदार कुमार आयलानी, आयुक्त अज़ीज़ शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, करूणा जुईकर, तहसीलदार कोमल ठाकूर, मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, महापालिका अधिकारी व कर्मचारी, माजी नगरसेवक, सामाजिक संस्था, एनडीआरएफ टीम, अग्निशमन दल, ऋषभ कर्णावत, अनिरुध्द नाखवा आदीजण शिबिराला उपस्थित होते. 

ट्रान्झिट कॅम्पला ३० कोटी पावसाळ्यात इमारत कोसळून आपत्कालीन परिस्थिती शहरात निर्माण होते. अश्यावेळी दुर्घटनाग्रस्त नागरिकांना तात्पुरता निवारा देण्यासाठी महापालिकेकडे कोणतीही यंत्रणा नाही. अश्यावेळी तात्पुरता निवाराकेंद्र असणे गरजेचे आहे. शासनाने त्यासाठी ३० कोटीचा निधी मंजूर केला असून त्या निधीतून भव्यदिव्य ट्रान्झिट कॅम्प उभा राहणार आहे. अशी माहिती आयुक्त अजीज शेख यांनी उपस्थितीत नागरिकांना दिली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर