शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गांवरील अपघात प्रकरणात चाैकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई हाेणार - मुख्यमंत्री 

By जितेंद्र कालेकर | Updated: October 15, 2023 18:50 IST

समृद्धी महामार्गांवर झालेल्या अपघाताची घटना अत्यंत दुर्देवी आहे. याबाबत चाैकशी करण्याचे आदेश आपण दिले आहेत. त्यात दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिली.

ठाणे : समृद्धी महामार्गांवर झालेल्या अपघाताची घटना अत्यंत दुर्देवी आहे. याबाबत चाैकशी करण्याचे आदेश आपण दिले आहेत. त्यात दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिली. ठाण्याच्या प्रसिद्ध टेंभी नाक्यावरील देवीच्या आगमन मिरवणुकीत मुख्यमंत्री शिंदे रविवारी सकाळी सहभागी झाले होते. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत करण्यात येईल. जखमींचा संपूर्ण खर्च राज्य शासनाच्या माध्यमातून केला जाईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

समृद्धी महामार्गांवर रविवारी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास जांबरगाव टोलनाक्यासमोर टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात बसमधील १२ प्रवाशांचा मृत्यू झाला. मृत पावलेले सर्वजण नाशिक शहरातील रहिवासी होते. टेम्पो ट्रॅव्हलरमधील सर्व प्रवासी सैलानी बाबाच्या दर्शनासाठी गेले होते. शनिवारी ते पुन्हा नाशिकला परतत होते. वाटेत वैजापूर तालुक्यातील जांबरगावजवळ उभ्या ट्रकला भरधाव वेगातील टेम्पो ट्रॅव्हलरने धडक दिली. या संदभार्त रविवारी ठाण्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पत्रकारांनी विचारणा केली. त्यावेळी ते म्हणाले की हा अपघात अत्यंत दुर्देवी आहे. यासंपूर्ण घटनेची चोकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

प्राथमिक पाहणीत आरटीओच्या अधिकाऱ्यांनी महामार्गांवर एक ट्रक थांबवला. त्यानंतर त्याला बस धडकून हा अपघात झाला आहे. परिणामी या घटनेला जे जवाबदार असतील त्या अधिकारी किंवा ट्रकचा चालक यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश दिल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर सबंधित व्यक्तीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा याबाबतही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. सर्व दोषींवर यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. त्याचबरोबर समृद्धी महामार्गांवर आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता लवकरच करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत करण्यात येईल. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींचा संपूर्ण खर्च राज्य शासनाच्या माध्यमातून केला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. ही घटना घडल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे हे त्वरित घटनास्थळी पोहचले होते . अशी माहिती ही मुख्यमंत्र्यांनी दिली. या अपघाताचे ज्यांना राजकारण करणाऱ्यांना ते करू दया, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग