शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

समृद्धी महामार्गांवरील अपघात प्रकरणात चाैकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई हाेणार - मुख्यमंत्री 

By जितेंद्र कालेकर | Updated: October 15, 2023 18:50 IST

समृद्धी महामार्गांवर झालेल्या अपघाताची घटना अत्यंत दुर्देवी आहे. याबाबत चाैकशी करण्याचे आदेश आपण दिले आहेत. त्यात दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिली.

ठाणे : समृद्धी महामार्गांवर झालेल्या अपघाताची घटना अत्यंत दुर्देवी आहे. याबाबत चाैकशी करण्याचे आदेश आपण दिले आहेत. त्यात दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिली. ठाण्याच्या प्रसिद्ध टेंभी नाक्यावरील देवीच्या आगमन मिरवणुकीत मुख्यमंत्री शिंदे रविवारी सकाळी सहभागी झाले होते. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत करण्यात येईल. जखमींचा संपूर्ण खर्च राज्य शासनाच्या माध्यमातून केला जाईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

समृद्धी महामार्गांवर रविवारी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास जांबरगाव टोलनाक्यासमोर टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात बसमधील १२ प्रवाशांचा मृत्यू झाला. मृत पावलेले सर्वजण नाशिक शहरातील रहिवासी होते. टेम्पो ट्रॅव्हलरमधील सर्व प्रवासी सैलानी बाबाच्या दर्शनासाठी गेले होते. शनिवारी ते पुन्हा नाशिकला परतत होते. वाटेत वैजापूर तालुक्यातील जांबरगावजवळ उभ्या ट्रकला भरधाव वेगातील टेम्पो ट्रॅव्हलरने धडक दिली. या संदभार्त रविवारी ठाण्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पत्रकारांनी विचारणा केली. त्यावेळी ते म्हणाले की हा अपघात अत्यंत दुर्देवी आहे. यासंपूर्ण घटनेची चोकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

प्राथमिक पाहणीत आरटीओच्या अधिकाऱ्यांनी महामार्गांवर एक ट्रक थांबवला. त्यानंतर त्याला बस धडकून हा अपघात झाला आहे. परिणामी या घटनेला जे जवाबदार असतील त्या अधिकारी किंवा ट्रकचा चालक यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश दिल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर सबंधित व्यक्तीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा याबाबतही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. सर्व दोषींवर यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. त्याचबरोबर समृद्धी महामार्गांवर आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता लवकरच करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत करण्यात येईल. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींचा संपूर्ण खर्च राज्य शासनाच्या माध्यमातून केला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. ही घटना घडल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे हे त्वरित घटनास्थळी पोहचले होते . अशी माहिती ही मुख्यमंत्र्यांनी दिली. या अपघाताचे ज्यांना राजकारण करणाऱ्यांना ते करू दया, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग