शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

समृद्धी महामार्गांवरील अपघात प्रकरणात चाैकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई हाेणार - मुख्यमंत्री 

By जितेंद्र कालेकर | Updated: October 15, 2023 18:50 IST

समृद्धी महामार्गांवर झालेल्या अपघाताची घटना अत्यंत दुर्देवी आहे. याबाबत चाैकशी करण्याचे आदेश आपण दिले आहेत. त्यात दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिली.

ठाणे : समृद्धी महामार्गांवर झालेल्या अपघाताची घटना अत्यंत दुर्देवी आहे. याबाबत चाैकशी करण्याचे आदेश आपण दिले आहेत. त्यात दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिली. ठाण्याच्या प्रसिद्ध टेंभी नाक्यावरील देवीच्या आगमन मिरवणुकीत मुख्यमंत्री शिंदे रविवारी सकाळी सहभागी झाले होते. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत करण्यात येईल. जखमींचा संपूर्ण खर्च राज्य शासनाच्या माध्यमातून केला जाईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

समृद्धी महामार्गांवर रविवारी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास जांबरगाव टोलनाक्यासमोर टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात बसमधील १२ प्रवाशांचा मृत्यू झाला. मृत पावलेले सर्वजण नाशिक शहरातील रहिवासी होते. टेम्पो ट्रॅव्हलरमधील सर्व प्रवासी सैलानी बाबाच्या दर्शनासाठी गेले होते. शनिवारी ते पुन्हा नाशिकला परतत होते. वाटेत वैजापूर तालुक्यातील जांबरगावजवळ उभ्या ट्रकला भरधाव वेगातील टेम्पो ट्रॅव्हलरने धडक दिली. या संदभार्त रविवारी ठाण्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पत्रकारांनी विचारणा केली. त्यावेळी ते म्हणाले की हा अपघात अत्यंत दुर्देवी आहे. यासंपूर्ण घटनेची चोकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

प्राथमिक पाहणीत आरटीओच्या अधिकाऱ्यांनी महामार्गांवर एक ट्रक थांबवला. त्यानंतर त्याला बस धडकून हा अपघात झाला आहे. परिणामी या घटनेला जे जवाबदार असतील त्या अधिकारी किंवा ट्रकचा चालक यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश दिल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर सबंधित व्यक्तीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा याबाबतही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. सर्व दोषींवर यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. त्याचबरोबर समृद्धी महामार्गांवर आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता लवकरच करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत करण्यात येईल. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींचा संपूर्ण खर्च राज्य शासनाच्या माध्यमातून केला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. ही घटना घडल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे हे त्वरित घटनास्थळी पोहचले होते . अशी माहिती ही मुख्यमंत्र्यांनी दिली. या अपघाताचे ज्यांना राजकारण करणाऱ्यांना ते करू दया, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग