शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

समृद्धी महामार्गांवरील अपघात प्रकरणात चाैकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई हाेणार - मुख्यमंत्री 

By जितेंद्र कालेकर | Updated: October 15, 2023 18:50 IST

समृद्धी महामार्गांवर झालेल्या अपघाताची घटना अत्यंत दुर्देवी आहे. याबाबत चाैकशी करण्याचे आदेश आपण दिले आहेत. त्यात दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिली.

ठाणे : समृद्धी महामार्गांवर झालेल्या अपघाताची घटना अत्यंत दुर्देवी आहे. याबाबत चाैकशी करण्याचे आदेश आपण दिले आहेत. त्यात दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिली. ठाण्याच्या प्रसिद्ध टेंभी नाक्यावरील देवीच्या आगमन मिरवणुकीत मुख्यमंत्री शिंदे रविवारी सकाळी सहभागी झाले होते. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत करण्यात येईल. जखमींचा संपूर्ण खर्च राज्य शासनाच्या माध्यमातून केला जाईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

समृद्धी महामार्गांवर रविवारी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास जांबरगाव टोलनाक्यासमोर टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात बसमधील १२ प्रवाशांचा मृत्यू झाला. मृत पावलेले सर्वजण नाशिक शहरातील रहिवासी होते. टेम्पो ट्रॅव्हलरमधील सर्व प्रवासी सैलानी बाबाच्या दर्शनासाठी गेले होते. शनिवारी ते पुन्हा नाशिकला परतत होते. वाटेत वैजापूर तालुक्यातील जांबरगावजवळ उभ्या ट्रकला भरधाव वेगातील टेम्पो ट्रॅव्हलरने धडक दिली. या संदभार्त रविवारी ठाण्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पत्रकारांनी विचारणा केली. त्यावेळी ते म्हणाले की हा अपघात अत्यंत दुर्देवी आहे. यासंपूर्ण घटनेची चोकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

प्राथमिक पाहणीत आरटीओच्या अधिकाऱ्यांनी महामार्गांवर एक ट्रक थांबवला. त्यानंतर त्याला बस धडकून हा अपघात झाला आहे. परिणामी या घटनेला जे जवाबदार असतील त्या अधिकारी किंवा ट्रकचा चालक यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश दिल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर सबंधित व्यक्तीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा याबाबतही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. सर्व दोषींवर यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. त्याचबरोबर समृद्धी महामार्गांवर आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता लवकरच करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत करण्यात येईल. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींचा संपूर्ण खर्च राज्य शासनाच्या माध्यमातून केला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. ही घटना घडल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे हे त्वरित घटनास्थळी पोहचले होते . अशी माहिती ही मुख्यमंत्र्यांनी दिली. या अपघाताचे ज्यांना राजकारण करणाऱ्यांना ते करू दया, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग