शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

ठाण्याच्या वर्तकनगर दोस्ती विहार संकुलात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 23:22 IST

वर्तकनगर येथील दोस्ती विहार इमारतीच्या संकुलामध्ये आठ जणांवर कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे या भागात भीतीचे वातावरण आहे. ठाणे महापालिकेने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे.

ठळक मुद्देएकाच आठवडयात आठ जणांवर केला हल्लालहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोनामुळे गेली सात महिने सुरु असलेल्या टाळेबंदीमध्ये आता शिथिलता आली आहे. मात्र, सार्वजनिक उद्यानात खेळण्यासाठी जाणाऱ्या लहान मुलांच्या अंगावर भटक्या कुत्र्यांकडून हल्ला होण्याच्या प्रकारांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. विशेषत: वर्तकनगर येथील दोस्ती विहार इमारतीच्या संकुलामध्ये आठ जणांवर कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे या भागात भीतीचे वातावरण आहे.फिरण्यासाठी किंवा खेळण्यासाठी उद्यानात जाणाºया मुलांच्या अंगावर भुंकणे, जेष्ठ नागरिकांच्या मागे लागणे त्याचबरोबर मोटारसायकलस्वाराचा पाठलाग करणे आदी प्रकार ठाण्यातील वर्तकनगर येथील दोस्ती विहार इमारतीच्या संकुलात गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. याबाबत ठाणे महापालिकेकडे तक्र ार करूनही कोणतीच कार्यवाही न झाल्याने रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे.ठाणे शहरातील विविध भागात भटक्या कुत्र्यांनी मोठया प्रमाणात उच्छाद घातला आहे. अनेक भागात असलेले कचºयाचे साम्राज्य, चायनीजच्या गाडयांवरील उरलेले अन्न पदार्थ या भटक्या कुत्र्यांना दिले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या टाळेबंदीच्या काळात सार्वजनिक तसेच विविध संकुलातील खासगी उद्यानांमध्येही या भटक्या कुत्र्यांचा वावर मोठया प्रमाणात वाढला होता. इतरत्र त्यांना त्यांचे खाद्यही न मिळाल्याने रस्त्यावरुन जाणाºया नागरिकांच्या अंगावर धावून जाणे, त्यांच्यावर भुंकणे तसेच त्यांचा चावा घेणे असे प्रकार या भटक्या कुत्र्यांकडून सुरु आहेत. भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणासाठी त्यांचे ठाणे महापालिकेकडून निर्बीजीकरणही केले जाते. तरीही ठाण्यातील वर्तकनगर भागातील दोस्ती विहार या संकुलात गेल्या दोन वर्षांतच या भटक्या कुत्र्यांची संख्या मोठया प्रमाणात वाढल्याचे येथील रहिवाशी गिरीश म्हात्रे यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षात ७० ते ८० रहिवाशांना या कुत्र्यांनी लक्ष केल्याचीही माहिती म्हात्रे यांनी दिली. या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही त्यांनी ठाणे महापालिकेकडे पत्राद्वारे केली आहे. मात्र, पालिका प्रशासनाने कोणताच प्रतिसाद दिला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. येथील रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीdogकुत्रा