शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

राज्यातील १८० दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना १५ नोव्हेंबरपासून एसटीपास मोफत

By सुरेश लोखंडे | Updated: November 9, 2018 19:50 IST

 यंदाच्या खरीप हंगाम पावसा अभावी घेता आलेला नाही. यामुळे प्राप्त अहवालास अनुसरून महसूल विभागाने राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य स्थिती घोषीत केली. यावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी एसटी महामंडळाने नुकतेच ५ नोव्हेंबरला परिपत्रक जारी करून संबंधीत तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत पास देण्याचे निश्चित केले. १५ नोव्हेंबरपासून ते १५ एप्रिलपर्यंत ही सवलत राज्यभरातील विद्यार्थ्यांना मिळणार

ठळक मुद्देराज्यातील १८० दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत एसटी पास एसटी महामंडळाने नुकतेच ५ नोव्हेंबरला परिपत्रक जारी १५ नोव्हेंबरपासून ते १५ एप्रिलपर्यंत ही सवलत नव्याने घेण्यात येणाऱ्या पासेस करीता ही मोफत पास सवलत लागू नसणार

ठाणे :महाराष्ट्र  राज्य मार्ग परिवहन (एसटी)महामंडळाने राज्यातील १८० दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत एसटी पास १५ नोव्हेंबरपासून देण्याचे निश्चित केले. यामध्ये कोकणातील ठाणे जिल्हा वगळता पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश आहे. यंदाच्या खरीप हंगाम पावसा अभावी घेता आलेला नाही. यामुळे प्राप्त अहवालास अनुसरून महसूल विभागाने राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य स्थिती घोषीत केली. यावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी एसटी महामंडळाने नुकतेच ५ नोव्हेंबरला परिपत्रक जारी करून संबंधीत तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत पास देण्याचे निश्चित केले. १५ नोव्हेंबरपासून ते १५ एप्रिलपर्यंत ही सवलत राज्यभरातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या सवलतीचा लाभ शैक्षणिक, तांत्रिक, तसेच व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना घेता येईल.या मोफत पासचा लाभ केवळ पास नूतनीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. नव्याने घेण्यात येणाऱ्या पासेस करीता ही मोफत पास सवलत लागू नसल्याचे एसटी महामंडळाने नमुद केले आहे. या मोफत पास सवलतीसाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ३३.३३ टक्के रक्कम आता घेतली जाणार नाही. या सवलत १५ एप्रिलपर्यंत सध्यातरी लागू राहणार आहे.मात्र कोकणातील या ठाणे जिल्हा ऐवजी मात्र पालघर जिल्ह्यातील पालघर, तलासरी, विक्रमगड या तीन तालुक्यांत दुष्काळ जाहीर केल्याप्रमाणे विद्यार्थी मोफत पास सवलत लागू झाली. याप्रमाणेच देखील मानगाव, श्रीवर्धन, सुधागड तालुके, तर रन्तागिरीचा मंडणगड आणि सिंधुदुर्गच्या वैभववाडी आणि कोकणातील तालुक्यांतील विद्यार्थ्यांना ही मोफत पास सवलत लागू करण्यात आली आहे.अन्य तालुक्यांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थितील लागू करावी अशी शेतकऱ्याची मागणी आहे. मात्र राजकीय पक्षांकडून त्यास फारसा प्रतिसाद दिसून येत नाही. पावसाच्या अवकृपेसह नुकताच पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे कंबरडेच मोडले आहे. कापून पडलेला भात या अवकाळी पावसाने ओला झाला असून त्यांचे पेंढा देखील वापरण्या लायक नसल्याचे मुरबाड तालुक्यातील तळेगांव येथील आत्माराम देखमुख व पोपटराव देशमुख या शेतकऱ्यानी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेBus Driverबसचालक