शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १८० दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना १५ नोव्हेंबरपासून एसटीपास मोफत

By सुरेश लोखंडे | Updated: November 9, 2018 19:50 IST

 यंदाच्या खरीप हंगाम पावसा अभावी घेता आलेला नाही. यामुळे प्राप्त अहवालास अनुसरून महसूल विभागाने राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य स्थिती घोषीत केली. यावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी एसटी महामंडळाने नुकतेच ५ नोव्हेंबरला परिपत्रक जारी करून संबंधीत तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत पास देण्याचे निश्चित केले. १५ नोव्हेंबरपासून ते १५ एप्रिलपर्यंत ही सवलत राज्यभरातील विद्यार्थ्यांना मिळणार

ठळक मुद्देराज्यातील १८० दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत एसटी पास एसटी महामंडळाने नुकतेच ५ नोव्हेंबरला परिपत्रक जारी १५ नोव्हेंबरपासून ते १५ एप्रिलपर्यंत ही सवलत नव्याने घेण्यात येणाऱ्या पासेस करीता ही मोफत पास सवलत लागू नसणार

ठाणे :महाराष्ट्र  राज्य मार्ग परिवहन (एसटी)महामंडळाने राज्यातील १८० दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत एसटी पास १५ नोव्हेंबरपासून देण्याचे निश्चित केले. यामध्ये कोकणातील ठाणे जिल्हा वगळता पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश आहे. यंदाच्या खरीप हंगाम पावसा अभावी घेता आलेला नाही. यामुळे प्राप्त अहवालास अनुसरून महसूल विभागाने राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य स्थिती घोषीत केली. यावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी एसटी महामंडळाने नुकतेच ५ नोव्हेंबरला परिपत्रक जारी करून संबंधीत तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत पास देण्याचे निश्चित केले. १५ नोव्हेंबरपासून ते १५ एप्रिलपर्यंत ही सवलत राज्यभरातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या सवलतीचा लाभ शैक्षणिक, तांत्रिक, तसेच व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना घेता येईल.या मोफत पासचा लाभ केवळ पास नूतनीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. नव्याने घेण्यात येणाऱ्या पासेस करीता ही मोफत पास सवलत लागू नसल्याचे एसटी महामंडळाने नमुद केले आहे. या मोफत पास सवलतीसाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ३३.३३ टक्के रक्कम आता घेतली जाणार नाही. या सवलत १५ एप्रिलपर्यंत सध्यातरी लागू राहणार आहे.मात्र कोकणातील या ठाणे जिल्हा ऐवजी मात्र पालघर जिल्ह्यातील पालघर, तलासरी, विक्रमगड या तीन तालुक्यांत दुष्काळ जाहीर केल्याप्रमाणे विद्यार्थी मोफत पास सवलत लागू झाली. याप्रमाणेच देखील मानगाव, श्रीवर्धन, सुधागड तालुके, तर रन्तागिरीचा मंडणगड आणि सिंधुदुर्गच्या वैभववाडी आणि कोकणातील तालुक्यांतील विद्यार्थ्यांना ही मोफत पास सवलत लागू करण्यात आली आहे.अन्य तालुक्यांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थितील लागू करावी अशी शेतकऱ्याची मागणी आहे. मात्र राजकीय पक्षांकडून त्यास फारसा प्रतिसाद दिसून येत नाही. पावसाच्या अवकृपेसह नुकताच पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे कंबरडेच मोडले आहे. कापून पडलेला भात या अवकाळी पावसाने ओला झाला असून त्यांचे पेंढा देखील वापरण्या लायक नसल्याचे मुरबाड तालुक्यातील तळेगांव येथील आत्माराम देखमुख व पोपटराव देशमुख या शेतकऱ्यानी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेBus Driverबसचालक