शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

वादळीवाऱ्यांनी पालघरला झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 05:12 IST

वृक्ष कोसळून घरांचे नुकसान : सुदैवाने जीवितहानी नाही

हितेन नाईक ।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : निसर्ग चक्रीवादळाचे संकट टळल्याने निश्चिंत झालेल्या पालघरवासीयांना गुरुवारी पहाटेपासून कोसळणाºया मुसळधार पाऊस आणि जोरदार वादळी वाऱ्यांनी झोडपून काढले. या घटनेत अनेक घरांवर वृक्ष कोसळण्याबरोबरच अनेकांच्या घरांचे पत्रे उडून घरातील जीवनावश्यक वस्तू भिजल्या. या घटनेत सुदैवाने जीवित हानीची घटना घडली नाही. दरम्यान, वसई-विरार परिसरातही ४० झाडे पडण्याच्या घटना घडल्या.निसर्ग चक्रीवादळाने मार्ग बदलल्याने पालघरवासीयांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. परंतु गुरुवारी पहाटे अचानक जोरदार वादळी वारे सुटून मुसळधार पाऊस सुरू झाला. बुधवारी टळलेले संकट पुन्हा अवतरले की काय? अशी भीती सर्वच लोकांच्या मनात निर्माण झाली. गुरुवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पालघर शहराच्या पूर्वेकडील सुनील प्रजापती यांच्या घराजवळील मोठे झाड कोसळले.या वेळी प्रजापती यांची पत्नी, आई-वडील, भावाची पत्नी, त्यांची दोन मुले असे ९ जणांचे कुटुंब घरात झोपले होते. या घटनेमुळे कुणाला दुखापत झाली नसली तरी घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक साहित्य, जीवनावश्यक वस्तू, कपडे आदी महत्त्वपूर्ण वस्तू भिजून खराब झाल्या, तर दुसरीकडे तालुक्यातील नानिवली येथील शेतकरी दाजी उघडे यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने व काही पत्रे फुटल्याने घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले. या जोरदार वारा आणि पावसामुळे पालघर विद्युत वितरण विभागाच्या ६ सब स्टेशनचा विद्युत पुरवठा १-२ तासांसाठी खंडित करावा लागल्याचे अधीक्षक अभियंत्या किरण नगावकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.मच्छीमारांचेही नुकसानपालघर जिल्ह्यातील वसई, पालघर, डहाणू तालुक्यातील किनाºयावर राहणाºया मच्छीमारांनी वाळत घातलेले मासे पावसाने भिजल्याने नुकसान भरपाईची मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केली आहे. जिल्ह्यात नुकसान झालेल्या काही किरकोळ घटनांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.