शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

शेती विकून हळद समारंभ करणे थांबवा

By admin | Updated: June 2, 2017 05:23 IST

शेती विकून गाडी, बंगले घ्यायचे आणि मोठ्या थाटामाटात हळद व लग्नसमारंभ करायचे, ही मानसिकता बदलण्याची नितांत गरज

लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर : शेती विकून गाडी, बंगले घ्यायचे आणि मोठ्या थाटामाटात हळद व लग्नसमारंभ करायचे, ही मानसिकता बदलण्याची नितांत गरज आहे. आता हळद, साखरपुडा आणि लग्नसमारंभ पाहून वीट येतो, अशा शब्दांत आमदार किसन कथोरे यांनी शेतकऱ्यांना कानपिचक्या दिल्या. शेती पिकत नाही, शेतमाल विकला जात नाही, ही नकारात्मकता मनातून काढून टाका. बदलापूरची लोकसंख्या प्रचंड वाढत आहे. या लोकसंख्येला अपुरा भाजीपाला उपलब्ध होत आहे. बदलापूर आणि आसपासच्या परिसरात जितकी शेती पिकवू, तितकी कमीच आहे. आपण शेती करा, आपल्याला काय कमी पडते, ते सांगा. शासनाच्या माध्यमातून ते उपलब्ध करून देण्याकरिता सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासनही कथोरे यांनी दिले. ‘शिवार संवाद’कार्यक्र माच्या माध्यमातून कथोरे यांनी शेतकऱ्यांकरिता असलेले शासनाचे उपक्रम, योजना यांची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. बेडशीळ येथील सदानंद सुरोशे यांच्या ‘उत्कर्ष कृषी पर्यटन केंद्रा’च्या शेतावर झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, आपल्या विभागात शेतकरी शेतीसाठी कर्जच काढत नाहीत, तर कर्ज माफ कोणाचे करायचे? भाताबरोबरच अन्य भाजीपाला कसा पिकवता येतो, हे कृषीभूषण राजेंद्र भट यांच्यासारख्या आपल्याच तालुक्यातील शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या अनुभवाचा शेतकऱ्यांनी अवश्य लाभ घ्यावा. आपल्या भागातील भाजीपाला उत्पादकांसाठी शहरात खाजगीकरणातून भाजीविक्र ी केंद्र सुरू करत आहोत. याचा लाभ शेतकऱ्यांना होईल, असा विश्वास आशीष गोळे यांनी व्यक्त केला.तालुका कृषी अधिकारी विजय पाटील, पंचायत समिती कृषी अधिकारी रवींद्र पाटील यांची यावेळी भाषणे झाली. भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेश पाटील, राजेश शर्मा, ऋतुराज जोशी, सदानंद सुरोशे, महेश सुरोशे, संजय आदक आदी मान्यवर उपस्थित होते. सरपंच चित्रा पारधी यांनी स्वागत केले, तर कृषी पर्यवेक्षक सचिन केणे यांनी आभार प्रदर्शन केले. शेतकरी उत्पादक व्हावाआपल्या तालुक्यातील ५० टक्के शेतकरी भूमिहीन झालेले आहेत. शासनाने फुलशेती व अन्य उत्पादनाबाबत प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळते. प्रशिक्षणासाठी जी फी भरावी लागते, ती तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती भरेल. बदलापूरमधील शेतकरी हाच आता ग्राहक झालेला आहे. यात परिवर्तन घडवून शेतकरी हा जास्त उत्पादक होणे आवश्यक आहे.