शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
2
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
3
Ola Electric ला सरकारकडून मिळणार ३६६.७८ कोटी रुपयांचा मोठा दिलासा; शेअरमध्ये जोरदार तेजी, जाणून घ्या
4
क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल; वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव
5
कोंबडी आधी की अंडं? शतकानुशतके पडलेल्या या जुन्या प्रश्नाचं उत्तर अखेर वैज्ञानिकांना सापडलं
6
तुम्ही सुद्धा 'हर्बल टी' पिता का? FSSAI नं कंपन्यांना दिला इशारा, नक्की प्रकरण काय?
7
Girish Mahajan : भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का?
8
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
9
Viral : टेक्नोलॉजिया! अवघ्या एका विटेत पठ्ठ्याने तयार केला रूम हीटर; ५० रुपयांच्या खर्चात थंडी केली गायब
10
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
11
शिंदेसेनेकडून ४२ जागांचा प्रस्ताव, जागा वाटपाचा तिढा सुटेना; तीन मंत्र्यांसह नेत्यांची जंबो बैठक
12
"मला खूप दुखतंय...", उपचारांसाठी ८ तास वेटिंग; कॅनडात वडिलांसमोर भारतीयाचा तडफडून मृत्यू
13
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
14
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
15
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
16
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
17
New Year 2026: २०२६ मध्ये तुमचे प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण; त्यासाठी वापरा '३६९ मॅनिफेस्टेशन' टेक्निक 
18
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
19
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
20
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
Daily Top 2Weekly Top 5

शेती विकून हळद समारंभ करणे थांबवा

By admin | Updated: June 2, 2017 05:23 IST

शेती विकून गाडी, बंगले घ्यायचे आणि मोठ्या थाटामाटात हळद व लग्नसमारंभ करायचे, ही मानसिकता बदलण्याची नितांत गरज

लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर : शेती विकून गाडी, बंगले घ्यायचे आणि मोठ्या थाटामाटात हळद व लग्नसमारंभ करायचे, ही मानसिकता बदलण्याची नितांत गरज आहे. आता हळद, साखरपुडा आणि लग्नसमारंभ पाहून वीट येतो, अशा शब्दांत आमदार किसन कथोरे यांनी शेतकऱ्यांना कानपिचक्या दिल्या. शेती पिकत नाही, शेतमाल विकला जात नाही, ही नकारात्मकता मनातून काढून टाका. बदलापूरची लोकसंख्या प्रचंड वाढत आहे. या लोकसंख्येला अपुरा भाजीपाला उपलब्ध होत आहे. बदलापूर आणि आसपासच्या परिसरात जितकी शेती पिकवू, तितकी कमीच आहे. आपण शेती करा, आपल्याला काय कमी पडते, ते सांगा. शासनाच्या माध्यमातून ते उपलब्ध करून देण्याकरिता सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासनही कथोरे यांनी दिले. ‘शिवार संवाद’कार्यक्र माच्या माध्यमातून कथोरे यांनी शेतकऱ्यांकरिता असलेले शासनाचे उपक्रम, योजना यांची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. बेडशीळ येथील सदानंद सुरोशे यांच्या ‘उत्कर्ष कृषी पर्यटन केंद्रा’च्या शेतावर झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, आपल्या विभागात शेतकरी शेतीसाठी कर्जच काढत नाहीत, तर कर्ज माफ कोणाचे करायचे? भाताबरोबरच अन्य भाजीपाला कसा पिकवता येतो, हे कृषीभूषण राजेंद्र भट यांच्यासारख्या आपल्याच तालुक्यातील शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या अनुभवाचा शेतकऱ्यांनी अवश्य लाभ घ्यावा. आपल्या भागातील भाजीपाला उत्पादकांसाठी शहरात खाजगीकरणातून भाजीविक्र ी केंद्र सुरू करत आहोत. याचा लाभ शेतकऱ्यांना होईल, असा विश्वास आशीष गोळे यांनी व्यक्त केला.तालुका कृषी अधिकारी विजय पाटील, पंचायत समिती कृषी अधिकारी रवींद्र पाटील यांची यावेळी भाषणे झाली. भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेश पाटील, राजेश शर्मा, ऋतुराज जोशी, सदानंद सुरोशे, महेश सुरोशे, संजय आदक आदी मान्यवर उपस्थित होते. सरपंच चित्रा पारधी यांनी स्वागत केले, तर कृषी पर्यवेक्षक सचिन केणे यांनी आभार प्रदर्शन केले. शेतकरी उत्पादक व्हावाआपल्या तालुक्यातील ५० टक्के शेतकरी भूमिहीन झालेले आहेत. शासनाने फुलशेती व अन्य उत्पादनाबाबत प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळते. प्रशिक्षणासाठी जी फी भरावी लागते, ती तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती भरेल. बदलापूरमधील शेतकरी हाच आता ग्राहक झालेला आहे. यात परिवर्तन घडवून शेतकरी हा जास्त उत्पादक होणे आवश्यक आहे.