शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

शेती विकून हळद समारंभ करणे थांबवा

By admin | Updated: June 2, 2017 05:23 IST

शेती विकून गाडी, बंगले घ्यायचे आणि मोठ्या थाटामाटात हळद व लग्नसमारंभ करायचे, ही मानसिकता बदलण्याची नितांत गरज

लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर : शेती विकून गाडी, बंगले घ्यायचे आणि मोठ्या थाटामाटात हळद व लग्नसमारंभ करायचे, ही मानसिकता बदलण्याची नितांत गरज आहे. आता हळद, साखरपुडा आणि लग्नसमारंभ पाहून वीट येतो, अशा शब्दांत आमदार किसन कथोरे यांनी शेतकऱ्यांना कानपिचक्या दिल्या. शेती पिकत नाही, शेतमाल विकला जात नाही, ही नकारात्मकता मनातून काढून टाका. बदलापूरची लोकसंख्या प्रचंड वाढत आहे. या लोकसंख्येला अपुरा भाजीपाला उपलब्ध होत आहे. बदलापूर आणि आसपासच्या परिसरात जितकी शेती पिकवू, तितकी कमीच आहे. आपण शेती करा, आपल्याला काय कमी पडते, ते सांगा. शासनाच्या माध्यमातून ते उपलब्ध करून देण्याकरिता सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासनही कथोरे यांनी दिले. ‘शिवार संवाद’कार्यक्र माच्या माध्यमातून कथोरे यांनी शेतकऱ्यांकरिता असलेले शासनाचे उपक्रम, योजना यांची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. बेडशीळ येथील सदानंद सुरोशे यांच्या ‘उत्कर्ष कृषी पर्यटन केंद्रा’च्या शेतावर झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, आपल्या विभागात शेतकरी शेतीसाठी कर्जच काढत नाहीत, तर कर्ज माफ कोणाचे करायचे? भाताबरोबरच अन्य भाजीपाला कसा पिकवता येतो, हे कृषीभूषण राजेंद्र भट यांच्यासारख्या आपल्याच तालुक्यातील शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या अनुभवाचा शेतकऱ्यांनी अवश्य लाभ घ्यावा. आपल्या भागातील भाजीपाला उत्पादकांसाठी शहरात खाजगीकरणातून भाजीविक्र ी केंद्र सुरू करत आहोत. याचा लाभ शेतकऱ्यांना होईल, असा विश्वास आशीष गोळे यांनी व्यक्त केला.तालुका कृषी अधिकारी विजय पाटील, पंचायत समिती कृषी अधिकारी रवींद्र पाटील यांची यावेळी भाषणे झाली. भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेश पाटील, राजेश शर्मा, ऋतुराज जोशी, सदानंद सुरोशे, महेश सुरोशे, संजय आदक आदी मान्यवर उपस्थित होते. सरपंच चित्रा पारधी यांनी स्वागत केले, तर कृषी पर्यवेक्षक सचिन केणे यांनी आभार प्रदर्शन केले. शेतकरी उत्पादक व्हावाआपल्या तालुक्यातील ५० टक्के शेतकरी भूमिहीन झालेले आहेत. शासनाने फुलशेती व अन्य उत्पादनाबाबत प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळते. प्रशिक्षणासाठी जी फी भरावी लागते, ती तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती भरेल. बदलापूरमधील शेतकरी हाच आता ग्राहक झालेला आहे. यात परिवर्तन घडवून शेतकरी हा जास्त उत्पादक होणे आवश्यक आहे.