शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

मध्यरात्रीपर्यंत छाननी सुरूच

By admin | Updated: April 6, 2016 01:51 IST

पालघर जिल्ह्यातील ३१५ अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी दाखल झालेल्या ९ हजार ४६० उमेदवारांच्या अर्ज छाननी दरम्यान जिल्ह्यातील अनेक तहसिलदार

पालघर : पालघर जिल्ह्यातील ३१५ अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी दाखल झालेल्या ९ हजार ४६० उमेदवारांच्या अर्ज छाननी दरम्यान जिल्ह्यातील अनेक तहसिलदार कार्यालयात एकच झुंबड उडाली होती. त्यात स्वच्छतागृहाबाबत उमेदवारांच्या अर्जासोबत जोडावयाचा दाखला व उमेदवारीबाबत घेतलेल्या हरकतीमुळे रात्रभर छाननी प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.पालघर जिल्'ातील ३१५ अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींचे ३ हजार २६१ उमेदवार निवडून देण्यासाठी एकूण ९ हजार ४६० उमेदवारांनी आपले अर्ज संबंधित तहसिलदार अथवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर केले आहेत. या ३१५ ग्रामपंचायतीमध्ये एकूण १ हजार १६२ प्रभाग असून अनुसूचित जातीचे ३० सदस्य, अनुसूचित जमातीचे २ हजार ७२५ सदस्य, मागास प्रवर्गासाठी १४९ सदस्य तर सर्वसाधारण ३५७ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीचे काम जिल्ह्यातील तहसिलदारांमार्फत आज सुरू आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत ६ एप्रिल (बुधवार) रोजी असल्याने एकूण किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहणार आहेत हे कळणार आहे. पालघर तालुक्यात ५६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी १ हजार ९०२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. डहाणू तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतीमधून १ हजार ८११ उमेदवारी अर्ज, जव्हार तालुक्यात ४७ ग्रामपंचायतीमधून १ हजार ६९ अर्ज, वाडा तालुक्यातून ७० ग्रामपंचायतीमधून १ हजार ८१९ अर्ज, विक्रमगड तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतीमधून १ हजार १७६ अर्ज, तलासरी तालुक्यातून १२ ग्रामपंचायतीमधून ६३५ अर्ज, मोखाडा तालुक्यातून २१ ग्रामपंचायतीमधून ६२९ उमेदवारी अर्ज, वसई तालुक्यातून ११ ग्रामपंचायतीसाठी ४१९ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.पालघर तहसिल कार्यालयासह अनेक ठिकाणी आज उमेदवारी अर्ज छाननीच्या प्रक्रियेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. उमेदवारासोबत असलेल्या राजकीय प्रतिनिधीच्या गर्दीमुळे पालघर तहसिल कार्यालयाचे आवार पूर्ण गच्च भरले होते तर त्यांनी आणलेली वाहने तहसिलदार कार्यालयासमोर बेशिस्त पद्धतीने पार्क करण्यात आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. निवडणुक आयोगाने उमेदवाराकडे शौचालय असणे सक्तीचे केल्याने ते दाखले मिळविणे यासाठी २८ मार्च रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या विशेष ग्रामसभेची माहिती उमेदवारापर्यंत पोहचली नसल्याने बऱ्याच उमेदवारांना शौचालयाचा दाखला आपल्या अर्जासोबत जोडता आलेला नाही.