शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्रीपर्यंत छाननी सुरूच

By admin | Updated: April 6, 2016 01:51 IST

पालघर जिल्ह्यातील ३१५ अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी दाखल झालेल्या ९ हजार ४६० उमेदवारांच्या अर्ज छाननी दरम्यान जिल्ह्यातील अनेक तहसिलदार

पालघर : पालघर जिल्ह्यातील ३१५ अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी दाखल झालेल्या ९ हजार ४६० उमेदवारांच्या अर्ज छाननी दरम्यान जिल्ह्यातील अनेक तहसिलदार कार्यालयात एकच झुंबड उडाली होती. त्यात स्वच्छतागृहाबाबत उमेदवारांच्या अर्जासोबत जोडावयाचा दाखला व उमेदवारीबाबत घेतलेल्या हरकतीमुळे रात्रभर छाननी प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.पालघर जिल्'ातील ३१५ अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींचे ३ हजार २६१ उमेदवार निवडून देण्यासाठी एकूण ९ हजार ४६० उमेदवारांनी आपले अर्ज संबंधित तहसिलदार अथवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर केले आहेत. या ३१५ ग्रामपंचायतीमध्ये एकूण १ हजार १६२ प्रभाग असून अनुसूचित जातीचे ३० सदस्य, अनुसूचित जमातीचे २ हजार ७२५ सदस्य, मागास प्रवर्गासाठी १४९ सदस्य तर सर्वसाधारण ३५७ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीचे काम जिल्ह्यातील तहसिलदारांमार्फत आज सुरू आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत ६ एप्रिल (बुधवार) रोजी असल्याने एकूण किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहणार आहेत हे कळणार आहे. पालघर तालुक्यात ५६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी १ हजार ९०२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. डहाणू तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतीमधून १ हजार ८११ उमेदवारी अर्ज, जव्हार तालुक्यात ४७ ग्रामपंचायतीमधून १ हजार ६९ अर्ज, वाडा तालुक्यातून ७० ग्रामपंचायतीमधून १ हजार ८१९ अर्ज, विक्रमगड तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतीमधून १ हजार १७६ अर्ज, तलासरी तालुक्यातून १२ ग्रामपंचायतीमधून ६३५ अर्ज, मोखाडा तालुक्यातून २१ ग्रामपंचायतीमधून ६२९ उमेदवारी अर्ज, वसई तालुक्यातून ११ ग्रामपंचायतीसाठी ४१९ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.पालघर तहसिल कार्यालयासह अनेक ठिकाणी आज उमेदवारी अर्ज छाननीच्या प्रक्रियेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. उमेदवारासोबत असलेल्या राजकीय प्रतिनिधीच्या गर्दीमुळे पालघर तहसिल कार्यालयाचे आवार पूर्ण गच्च भरले होते तर त्यांनी आणलेली वाहने तहसिलदार कार्यालयासमोर बेशिस्त पद्धतीने पार्क करण्यात आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. निवडणुक आयोगाने उमेदवाराकडे शौचालय असणे सक्तीचे केल्याने ते दाखले मिळविणे यासाठी २८ मार्च रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या विशेष ग्रामसभेची माहिती उमेदवारापर्यंत पोहचली नसल्याने बऱ्याच उमेदवारांना शौचालयाचा दाखला आपल्या अर्जासोबत जोडता आलेला नाही.