शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्रीपर्यंत छाननी सुरूच

By admin | Updated: April 6, 2016 01:51 IST

पालघर जिल्ह्यातील ३१५ अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी दाखल झालेल्या ९ हजार ४६० उमेदवारांच्या अर्ज छाननी दरम्यान जिल्ह्यातील अनेक तहसिलदार

पालघर : पालघर जिल्ह्यातील ३१५ अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी दाखल झालेल्या ९ हजार ४६० उमेदवारांच्या अर्ज छाननी दरम्यान जिल्ह्यातील अनेक तहसिलदार कार्यालयात एकच झुंबड उडाली होती. त्यात स्वच्छतागृहाबाबत उमेदवारांच्या अर्जासोबत जोडावयाचा दाखला व उमेदवारीबाबत घेतलेल्या हरकतीमुळे रात्रभर छाननी प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.पालघर जिल्'ातील ३१५ अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींचे ३ हजार २६१ उमेदवार निवडून देण्यासाठी एकूण ९ हजार ४६० उमेदवारांनी आपले अर्ज संबंधित तहसिलदार अथवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर केले आहेत. या ३१५ ग्रामपंचायतीमध्ये एकूण १ हजार १६२ प्रभाग असून अनुसूचित जातीचे ३० सदस्य, अनुसूचित जमातीचे २ हजार ७२५ सदस्य, मागास प्रवर्गासाठी १४९ सदस्य तर सर्वसाधारण ३५७ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीचे काम जिल्ह्यातील तहसिलदारांमार्फत आज सुरू आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत ६ एप्रिल (बुधवार) रोजी असल्याने एकूण किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहणार आहेत हे कळणार आहे. पालघर तालुक्यात ५६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी १ हजार ९०२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. डहाणू तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतीमधून १ हजार ८११ उमेदवारी अर्ज, जव्हार तालुक्यात ४७ ग्रामपंचायतीमधून १ हजार ६९ अर्ज, वाडा तालुक्यातून ७० ग्रामपंचायतीमधून १ हजार ८१९ अर्ज, विक्रमगड तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतीमधून १ हजार १७६ अर्ज, तलासरी तालुक्यातून १२ ग्रामपंचायतीमधून ६३५ अर्ज, मोखाडा तालुक्यातून २१ ग्रामपंचायतीमधून ६२९ उमेदवारी अर्ज, वसई तालुक्यातून ११ ग्रामपंचायतीसाठी ४१९ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.पालघर तहसिल कार्यालयासह अनेक ठिकाणी आज उमेदवारी अर्ज छाननीच्या प्रक्रियेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. उमेदवारासोबत असलेल्या राजकीय प्रतिनिधीच्या गर्दीमुळे पालघर तहसिल कार्यालयाचे आवार पूर्ण गच्च भरले होते तर त्यांनी आणलेली वाहने तहसिलदार कार्यालयासमोर बेशिस्त पद्धतीने पार्क करण्यात आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. निवडणुक आयोगाने उमेदवाराकडे शौचालय असणे सक्तीचे केल्याने ते दाखले मिळविणे यासाठी २८ मार्च रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या विशेष ग्रामसभेची माहिती उमेदवारापर्यंत पोहचली नसल्याने बऱ्याच उमेदवारांना शौचालयाचा दाखला आपल्या अर्जासोबत जोडता आलेला नाही.