शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

रिक्षाचे स्टेअरिंग टवाळखोरांच्या हाती; कारवाईकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 07:02 IST

दुर्घटना घडल्यास आम्ही जबाबदार नाही, संघटनेचा इशारा

कल्याण : रिक्षाचालकांची मुजोरी व मनमानी भाडेवसुलीच्या त्रासाला प्रवाशांना सामोरे जावे लागत असतानाच रिक्षाचे स्टेअरिंग अल्पवयीन टवाळखोरांच्या हाती गेल्याने त्यांचा प्रवासही धोकादायक झाला आहे. दुसरीकडे विनापरवाना रिक्षाचालवणाऱ्या या मुलांविरोधात वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने भविष्यात कोणती दुर्घटना घडली तर आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही, असा पवित्रा येथील रिक्षाचालक-मालक असोसिएशनने घेतला आहे.

रिक्षांची वाढती संख्या पाहता परवान्यांचे वाटप थांबवा, अशी मागणी रिक्षा संघटनांकडून होत आहे. मात्र, तरीही परिवहन विभागाने परवाना देणे सुरूच ठेवले आहे. परिणामी वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होऊन वाहतूककोंडीत आणखी भर पडत आहे.रिक्षा चालवणाºया चालकांकडे परवाना आणि बॅज असणे बंधनकारक आहे. परंतु, काही रिक्षाचालक बॅच आणि परवाना नसलेल्या व्यक्तींना रिक्षा चालवायला अथवा भाड्याने देत आहेत. त्यात १५ ते १६ वर्षांची मुलेही आहेत. रिक्षाचालकांसाठी बंधनकारक असलेला गणवेश घालण्याऐवजी ते बर्मुडा, हाफ पॅण्ट, टी-शर्ट अशा पेहरावात रिक्षा चालवतात. त्याचबरोबर स्टॅण्ड सोडून ते प्रवासी घेतात. त्यातील अनेक जण गुटखा, मावा, मद्यपान, चरस आणि गांजाचे व्यसनही करतात. उद्धट, उर्मट वागणूक त्याचबरोबर मनमानीपणे भाडेआकारणी ते करत असल्याचे चित्र कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये बहुतांश ठिकाणी पाहायला मिळत आहे. मात्र, त्यांच्या अशा वर्तणुकीमुळे प्रामाणिक व्यवसाय करणारा रिक्षाचालकही बदनाम होत आहे.

दरम्यान, रविवारी कल्याणमध्ये झालेल्या रिक्षाचालक-मालक असोसिएशनच्या बैठकीत अन्य विषयांसह अल्पवयीन रिक्षाचालकांचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पेणकर, संतोष नवले, जितेंद्र पवार, अब्दुल शेख हे पदाधिकारी आणि रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रिक्षा पासिंगची समस्या, प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वाभाडे आकारणे, बॅज आणि गणवेश नसणे आदी मुद्यांसह वाहतूक पोलीस आणि आरटीओकडून अल्पवयीन रिक्षाचालकांकडे दुर्लक्ष केले जात असल्याबाबत तीव्र नाराजी या बैठकीत व्यक्त करण्यात आली. अल्पवयीन टवाळखोर रिक्षाचालकांमुळे महिला प्रवाशांचा प्रवास धोक्याचा झाला असल्याकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले.

जाग येणार कधी ?एकीकडे कारवाई सुरू असल्याचा दावा आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून केला जात असलातरी आजही कल्याण असो अथवा डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील स्टॅण्डवरील चित्र पाहता बिनधास्तपणे अल्पवयीन रिक्षाचालक रिक्षा लावून भाडे घेत आहेत. मुजोरी, वादावादी असे प्रकार वारंवार त्यांच्याकडून घडत असतात. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच संबंधित यंत्रणेला जाग येणार का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे. वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणीही होत आहे.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षा