शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

‘घरातच बसा’चे ठाण्यात तुणतुणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 00:13 IST

प्रशासनाचे रडगाणे : चारपेक्षा जास्त लोक जमण्यास बंदी, जिल्ह्यातील प्रवासासाठी ई-पास

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्यात येत्या ५ आणि ८ जूनपासून कंटेनमेंट झोन वगळता अनेक ठिकाणी संचारबंदीमध्ये शिथिलता आणण्याची घोषणा सरकारने केली असताना ठाणे जिल्ह्यात चारपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी करणारे मनाई आदेश लागू केले आहेत. अमेरिका तसेच युरोपमधील अनेक देशांत कोरोनाचे रुग्ण ठाणे जिल्ह्यापेक्षा जास्त असतानाही तेथील दैनंदिन जीवन सुरळीत करण्यात आले असताना ठाणे जिल्ह्यातील प्रशासन निर्बंध अधिक घट्ट करण्यात धन्यता मानत असल्याने ठाणेकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. आंतरराज्य प्रवासाला पोलिसांच्या ई-पासशिवाय परवानगी नाही, हे सर्वश्रुत आहे. मात्र, आंतरजिल्हा प्रवाशांकरिताही ई-पासची सक्ती केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

केंद्र शासनाने येत्या ८ जूनपासून अनेक व्यवहारांमध्ये शिथिलता आणण्याची घोषणा केली आहे. तसेच आजपासून आंतरजिल्हा प्रवासाला परवानगीची गरज नसल्याचे म्हटले आहे. शिवाय, संपूर्ण दिवसभराची संचारबंदीही शिथिल करून रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. असे असले तरी ठाणे जिल्ह्यातील काही दाट वस्तीच्या भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढती असल्याचे कारण पुढे करून सरसकट ठाणे शहर पोलीस आयुक्तालय आणि ठाणे ग्रामीण भागात संचारबंदी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्ह्यातील ज्या शहरांमधील ज्या भागात कोरोनाचे रुग्ण कमी आहेत, तेथील व्यवहार पूर्ववत सुरू करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. केवळ अत्यावश्यक कामांसाठी म्हणजे किराणा, दूध वितरण, वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी संचारबंदी लागू राहणार नाही. याशिवाय, अत्यावश्यक कामांकरिता सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत परवानगी राहणार आहे. मुख्य बाजारपेठ येत्या ५ जूननंतर सुरू होणार असून ती समविषम तारखेनुसार एक दिवसाआड रस्त्याच्या एकाच बाजूने सुरू राहणार आहे. १ ते ३० जून या कालावधीत हा मनाई आदेश लागू असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा सार्वजनिक कार्यक्रम, सण, उत्सव, स्पर्धा, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांना बंदी राहणार असल्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

खासगी आणि सार्वजनिक वाहतूक सेवा बंद राहणार असल्यामुळे आंतरराज्य, राज्यांतर्गत, जिल्हांतर्गत प्रवासी बसवाहतुकीस मनाई आहे. सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्थाही बंद राहतील. ३ जूनपासून सार्वजनिक उद्यानात व्यायाम, फिरणे, सायकलिंगला सकाळी ५ ते सायंकाळी ७ पर्यंत मुभा राहणार आहे.केवळ अत्यावश्यक कामांसाठी १ ते ३० जून या काळात घराबाहेर पडण्यासाठी परवानगी राहणार आहे. ५ जूननंतर समविषम तारखेनुसार दुकाने बाजारपेठांमध्ये सुरू करता येतील. आंतरराज्य आणि जिल्हा प्रवासाला मात्र अजूनही पोलीस ई-पासशिवाय परवानगी दिलेली नाही.’’- बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर पोलीस आयुक्तालयअत्यावश्यक सेवांसाठी टॅक्सीचालक अधिक दोन, रिक्षामध्ये चालक अधिक दोन प्रवासी, चारचाकी वाहनांतूनही चालकासह तिघे, दुचाकीवर फक्त चालक यांना परवानगी दिल्याचे आदेशात म्हटले आहे.