शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
2
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
3
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
4
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
5
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
6
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
7
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
8
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
9
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
10
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
11
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
12
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
13
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
14
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
15
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
16
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
17
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
18
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
19
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
20
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा

‘घरातच बसा’चे ठाण्यात तुणतुणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 00:13 IST

प्रशासनाचे रडगाणे : चारपेक्षा जास्त लोक जमण्यास बंदी, जिल्ह्यातील प्रवासासाठी ई-पास

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्यात येत्या ५ आणि ८ जूनपासून कंटेनमेंट झोन वगळता अनेक ठिकाणी संचारबंदीमध्ये शिथिलता आणण्याची घोषणा सरकारने केली असताना ठाणे जिल्ह्यात चारपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी करणारे मनाई आदेश लागू केले आहेत. अमेरिका तसेच युरोपमधील अनेक देशांत कोरोनाचे रुग्ण ठाणे जिल्ह्यापेक्षा जास्त असतानाही तेथील दैनंदिन जीवन सुरळीत करण्यात आले असताना ठाणे जिल्ह्यातील प्रशासन निर्बंध अधिक घट्ट करण्यात धन्यता मानत असल्याने ठाणेकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. आंतरराज्य प्रवासाला पोलिसांच्या ई-पासशिवाय परवानगी नाही, हे सर्वश्रुत आहे. मात्र, आंतरजिल्हा प्रवाशांकरिताही ई-पासची सक्ती केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

केंद्र शासनाने येत्या ८ जूनपासून अनेक व्यवहारांमध्ये शिथिलता आणण्याची घोषणा केली आहे. तसेच आजपासून आंतरजिल्हा प्रवासाला परवानगीची गरज नसल्याचे म्हटले आहे. शिवाय, संपूर्ण दिवसभराची संचारबंदीही शिथिल करून रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. असे असले तरी ठाणे जिल्ह्यातील काही दाट वस्तीच्या भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढती असल्याचे कारण पुढे करून सरसकट ठाणे शहर पोलीस आयुक्तालय आणि ठाणे ग्रामीण भागात संचारबंदी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्ह्यातील ज्या शहरांमधील ज्या भागात कोरोनाचे रुग्ण कमी आहेत, तेथील व्यवहार पूर्ववत सुरू करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. केवळ अत्यावश्यक कामांसाठी म्हणजे किराणा, दूध वितरण, वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी संचारबंदी लागू राहणार नाही. याशिवाय, अत्यावश्यक कामांकरिता सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत परवानगी राहणार आहे. मुख्य बाजारपेठ येत्या ५ जूननंतर सुरू होणार असून ती समविषम तारखेनुसार एक दिवसाआड रस्त्याच्या एकाच बाजूने सुरू राहणार आहे. १ ते ३० जून या कालावधीत हा मनाई आदेश लागू असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा सार्वजनिक कार्यक्रम, सण, उत्सव, स्पर्धा, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांना बंदी राहणार असल्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

खासगी आणि सार्वजनिक वाहतूक सेवा बंद राहणार असल्यामुळे आंतरराज्य, राज्यांतर्गत, जिल्हांतर्गत प्रवासी बसवाहतुकीस मनाई आहे. सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्थाही बंद राहतील. ३ जूनपासून सार्वजनिक उद्यानात व्यायाम, फिरणे, सायकलिंगला सकाळी ५ ते सायंकाळी ७ पर्यंत मुभा राहणार आहे.केवळ अत्यावश्यक कामांसाठी १ ते ३० जून या काळात घराबाहेर पडण्यासाठी परवानगी राहणार आहे. ५ जूननंतर समविषम तारखेनुसार दुकाने बाजारपेठांमध्ये सुरू करता येतील. आंतरराज्य आणि जिल्हा प्रवासाला मात्र अजूनही पोलीस ई-पासशिवाय परवानगी दिलेली नाही.’’- बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर पोलीस आयुक्तालयअत्यावश्यक सेवांसाठी टॅक्सीचालक अधिक दोन, रिक्षामध्ये चालक अधिक दोन प्रवासी, चारचाकी वाहनांतूनही चालकासह तिघे, दुचाकीवर फक्त चालक यांना परवानगी दिल्याचे आदेशात म्हटले आहे.