शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
5
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
6
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
7
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
8
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
9
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
10
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
12
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
13
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
14
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
15
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
16
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
17
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
18
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
19
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
20
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप

निकृष्ट दर्जाला चाप लावुन खड्डयांच्या दुरुस्तीला सुरुवात; वाटमारीला आयुक्तांचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 18:17 IST

मीरा-भार्इंदरमधील वाहुतकीच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्यांच्या दुरुस्तीत वाटमारी करुन निकृष्ट दर्जाचा वापर केला जात असल्याने आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी त्याला चाप लावून त्याची दुरुस्ती योग्य पद्धतीने करण्याची सक्त ताकीद अधिकारी व कंत्राटदारांना दिल्याने त्यातील वाटमारीला तूर्तास दणका दिल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु झाली आहे.

- राजू काळेभार्इंदर - मीरा-भार्इंदरमधील वाहुतकीच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्यांच्या दुरुस्तीत वाटमारी करुन निकृष्ट दर्जाचा वापर केला जात असल्याने आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी त्याला चाप लावून त्याची दुरुस्ती योग्य पद्धतीने करण्याची सक्त ताकीद अधिकारी व कंत्राटदारांना दिल्याने त्यातील वाटमारीला तूर्तास दणका दिल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु झाली आहे.शहरातील रस्त्यांवर असंख्य खड्डे पडले असुन त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार काही राजकीय तसेच ुविविध सामाजिक संस्थांकडुन अनेकदा करण्यात येते. त्या तक्रारींवर तात्पुरत्या मलमपट्टीचे आश्वासन देऊन खड्डयाची दुरुस्ती प्रशासनाकडुन केली जाते. यामुळे दुरुस्त झालेले खड्डे पुन्हा उखडुन पालिकेने खर्ची घातलेला निधी खड्डयात जात असल्याची बाब चव्हाट्यावर येते. रस्त्यावरील बहुतांशी खड्डे गणेशोत्सवातही जैसे थे असल्याने मनसेने थेट गणपतीच्या प्रतिकात्मक उपस्थितीत पालिका मुख्यालयात आंदोलन करुन खड्डे अनंत चतुर्थीपर्यंत दुरुस्त करावेत, अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. त्यावेळी प्रशासनाने खड्डे दुरुस्तीला सुरुवात केली खरी परंतु, कंत्राटदाराने खड्यांतील धुळ, माती व कचरा साफ न करताच खड्यांचे डांबरीकरण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार थेट आयुक्तांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी कंत्राटदाराच्या कामातील निकृष्ट दर्जाला लगाम घालुन योग्य पद्धतीनेच खड्डे दुरुस्ती करण्याचे फर्मान सोडले. घटनास्थळी वरीष्ठ अधिका-यांना पाचारण करुन त्यांना कामावर नियंत्रण ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले. यानंतर काही खड्यांची दुरुस्ती करण्यात आली असली तरी आजही अनेक रस्त्यांवरील खड्डे जैसे थे आहेत. सततच्या खड्डे दुरुस्तीच्या मागणीला कंटाळून अखेर मनविसेचे शहर सचिव शान पवार यांनी खड्डे दुरुस्ती न करता वाहनचालकांच्या माहितीसाठी खड्डयांचे फलकच रस्त्याच्या कडेला लावावेत, अशी सुचना थेट परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना निवेदनाद्वारे केली. दरम्यान आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार खड्डे दुरुस्तीसाठी सुचित केलेल्या पद्धतीचा वापर करण्यास कंत्राटदाराकडुन सुरुवात करण्यात आल्याचे आयुक्तांकडुन सांगण्यात आले. खड्डे दुरुस्तीपुर्वी त्यातील धुळ, माती, कचरा हवेच्या फवा-याने काढावी, खड्डे धुळमुक्त झाल्यासच त्यात टार (रसायनयुक्त डांबराचा द्रव पदार्थ) टाकावे. शेवटी त्यावर डांबरयुक्त खडी टाकून त्याचे सपाटीकरण करण्याच्या सुचना दिल्याप्रमाणे खड्डे दुरुस्तीला सुरुवात झाल्याचे आयुक्तांकडून सांगण्यात आले.