शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-वसई जलमार्गाला चालना, खासदारांकडून पाहणी : मेट्रोच्या धर्तीवर उभारणार १० स्थानके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 02:17 IST

जलवाहतूक सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. कल्याण-ठाणे-वसई-नवी मुंबई-मुंबई जलवाहतूक सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यादृष्टीने कल्याण-ठाणे-वसई जलमार्गाची पाहणी सोमवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली.

कल्याण : जलवाहतूक सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. कल्याण-ठाणे-वसई-नवी मुंबई-मुंबई जलवाहतूक सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यादृष्टीने कल्याण-ठाणे-वसई जलमार्गाची पाहणी सोमवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली.श्लॉ वॉटर बोटीतून ही पाहणी करण्यात आली. त्यावेळी या प्रकल्पाचे सल्लागार व नौसेनेचे निवृत्त कॅप्टन रोहिला, शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, सभागृह नेते राजेश मोरे, नगरसेवक दीपेश म्हात्रे आदी सहभागी झाले होते. हा मार्ग कल्याण खाडीपासून डोंबिवली, दिवा, मुंब्रा, अंजूर दिवे, गायमुख ते वसई असा राहणार आहे. या मार्गात १० स्टेशन असून, ती मेट्रो रेल्वे स्थानकाप्रमाणे बांधली जातील. त्यासाठी जेटी विकसित केल्या जाणार आहेत. पाहणी दौºयात वसई ते कल्याण अंतर पार करण्यासाठी एक तास २० मिनिटे लागली. एका वेळी एका बोटीतून ७० ते ८० प्रवासी प्रवास करतील. वसई ते कल्याण, कल्याण ते वसई अशा बोटीच्या फेºया होतील. ठाकुर्ली येथील चोळे पॉवर हाउस ते कल्याण यादरम्यान खाडीत खडक असून, तो फोडावा लागणार आहे.सध्या कल्याणहून वसईला जाण्यासाठी एसटीच्या कल्याण-आंबाडी-वसई-विरार या मार्गाने धावणाºया बस आहेत. त्या किमान तीन तासाने आहेत. ठाण्याहून वसईला जाण्यासाठी ठाणे-दादर-वसई, असा हेलपाटा मारून जावे लागते. तर रेल्वेने वसई गाठण्यासाठी दिवा-वसई गाडी कोपर स्थानकातून पकडावी लागते. परंतु, या मार्गावर दररोज किमान सहाच गाड्या धावतात. या प्रवासाला एक ते सव्वा तास लागतो. रेल्वेचा आणखी एक पर्याय म्हणजे दादरमार्गे वसई-विरार गाठणे. पण हा सर्वात जास्त लांबचा पल्ला आहे. त्या तुलनेत जलवाहतुकीमुळे वसई गाठण्यासाठी कमी वेळ लागणार आहे.जलवाहतुकीसाठी ठाणे पालिकेने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला होता. त्यानुसार कल्याण ते ठाणे, ठाणे ते वसई, ठाणे ते नवी मुंबई, ठाणे ते मुंबई या जलमार्गांच्या शक्यता त्यात नमूद केल्या होत्या. त्यासाठी सल्लागाराने निश्चित केलेल्या जलमार्गाची पाहणी शिंदे यांनी केली. हा जलमार्ग अंतिम झाल्यावर त्याचा अहवाल पुन्हा सादर करून कामाची निविदा काढली जाणार आहे.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदे