शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

कल्याण-वसई जलमार्गाला चालना, खासदारांकडून पाहणी : मेट्रोच्या धर्तीवर उभारणार १० स्थानके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 02:17 IST

जलवाहतूक सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. कल्याण-ठाणे-वसई-नवी मुंबई-मुंबई जलवाहतूक सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यादृष्टीने कल्याण-ठाणे-वसई जलमार्गाची पाहणी सोमवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली.

कल्याण : जलवाहतूक सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. कल्याण-ठाणे-वसई-नवी मुंबई-मुंबई जलवाहतूक सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यादृष्टीने कल्याण-ठाणे-वसई जलमार्गाची पाहणी सोमवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली.श्लॉ वॉटर बोटीतून ही पाहणी करण्यात आली. त्यावेळी या प्रकल्पाचे सल्लागार व नौसेनेचे निवृत्त कॅप्टन रोहिला, शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, सभागृह नेते राजेश मोरे, नगरसेवक दीपेश म्हात्रे आदी सहभागी झाले होते. हा मार्ग कल्याण खाडीपासून डोंबिवली, दिवा, मुंब्रा, अंजूर दिवे, गायमुख ते वसई असा राहणार आहे. या मार्गात १० स्टेशन असून, ती मेट्रो रेल्वे स्थानकाप्रमाणे बांधली जातील. त्यासाठी जेटी विकसित केल्या जाणार आहेत. पाहणी दौºयात वसई ते कल्याण अंतर पार करण्यासाठी एक तास २० मिनिटे लागली. एका वेळी एका बोटीतून ७० ते ८० प्रवासी प्रवास करतील. वसई ते कल्याण, कल्याण ते वसई अशा बोटीच्या फेºया होतील. ठाकुर्ली येथील चोळे पॉवर हाउस ते कल्याण यादरम्यान खाडीत खडक असून, तो फोडावा लागणार आहे.सध्या कल्याणहून वसईला जाण्यासाठी एसटीच्या कल्याण-आंबाडी-वसई-विरार या मार्गाने धावणाºया बस आहेत. त्या किमान तीन तासाने आहेत. ठाण्याहून वसईला जाण्यासाठी ठाणे-दादर-वसई, असा हेलपाटा मारून जावे लागते. तर रेल्वेने वसई गाठण्यासाठी दिवा-वसई गाडी कोपर स्थानकातून पकडावी लागते. परंतु, या मार्गावर दररोज किमान सहाच गाड्या धावतात. या प्रवासाला एक ते सव्वा तास लागतो. रेल्वेचा आणखी एक पर्याय म्हणजे दादरमार्गे वसई-विरार गाठणे. पण हा सर्वात जास्त लांबचा पल्ला आहे. त्या तुलनेत जलवाहतुकीमुळे वसई गाठण्यासाठी कमी वेळ लागणार आहे.जलवाहतुकीसाठी ठाणे पालिकेने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला होता. त्यानुसार कल्याण ते ठाणे, ठाणे ते वसई, ठाणे ते नवी मुंबई, ठाणे ते मुंबई या जलमार्गांच्या शक्यता त्यात नमूद केल्या होत्या. त्यासाठी सल्लागाराने निश्चित केलेल्या जलमार्गाची पाहणी शिंदे यांनी केली. हा जलमार्ग अंतिम झाल्यावर त्याचा अहवाल पुन्हा सादर करून कामाची निविदा काढली जाणार आहे.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदे