शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाचे काम सुरू; मात्र सुरक्षेकडे दुर्लक्ष, अपघाताची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 01:21 IST

अंबरनाथ शहरातून जाणारा कल्याण-बदलापूर रस्ता हा सुरक्षेच्या कारणावरून पुन्हा चर्चेत आला आहे.

- पंकज पाटीलअंबरनाथ : शहरातून जाणारा कल्याण-बदलापूर रस्ता हा सुरक्षेच्या कारणावरून पुन्हा चर्चेत आला आहे. या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. सोमवारी या रस्त्याचे काम सुरू झाले आहे; मात्र महामर्गाचे काम करताना अपघात टाळण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. तसेच, रस्त्यासाठी खोदकाम करताना वाहतुकीने गजबजलेला रस्ता सुरक्षित करणे गरजेचे असतानाही त्याठिकाणी सुरक्षेसाठी दोरी किंवा बॅरेकेटिंग लावण्यात आलेले नाही. त्यामुळे बेसावध वाहन थेट खड्ड्यात पडण्याची भीती निर्माण झाली आहे.अंबरनाथमध्ये अडकून पडलेला कल्याण-बदलापूरमार्गे पुण्याला जोडणारा राज्य महामार्गाचे काम ठेकेदाराने सुरू केले आहे. हे काम करताना अनेक ठिकाणी सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सर्वच ठिकाणी एकत्रित काम सुरू असून अस्तित्वातील रस्ता आणि नव्याने तयार करण्यात येणारा रस्ता यांच्यासाठी खोदण्यात येणारे खड्डे हे जीवघेणे ठरण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी बॅरिगेट्स, सूचना फलक लावणे गरजेचे आहे. मात्र, अनेक ठिकाणी असे फलकच लावलेले नाहीत. विम्को नाका ते शंकर मंदिर, आयटीआयसमोरील रस्त्यांवरही अशीच स्थिती आहे. रस्त्याचे काम करीत सुरक्षेची जबाबदारी ही ठेकेदाराची असतानाही ठेकेदार या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत आहे.सहा महिन्यांपासून या रस्त्याचे काम रखडलेल्या अवस्थेत होते. जलवाहिनी स्थलांतरित होत नसल्याने काम करता येत नसल्याचे कारण पुढे केले जात होते. आता ठेकेदाराने परस्पर काम सुरू करून जलवाहिनीचे काँक्रीट खाली दाबण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जलवाहिन्या स्थलांतरित होत नाहीत तोवर काम करता येणार नाही, असे सबब देणारे अधिकारीच आता या जलवाहिन्या काँक्रीट खाली दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भविष्यात जलवाहिनी फुटल्यास रस्ता खोदण्याची वेळ येणार आहे.जलवाहिनीच्या ठिकाणी भर टाकून कामफॉरेस्ट नाका परिसरात रस्त्याच्या एक फुटावर जलवाहिनी असल्याने काँक्रीटचे काम करणे शक्य नाही. त्यामुळे आता त्याच्यावर वाढीव माती भराव करून हा रस्ताच वर उचलण्यात येत आहे. त्यामुळे शेजारी असलेली दुकाने किंवा कंपन्या या रस्त्यापासून खाली गेल्या आहेत. अधिकारी या अडचणी न सोडवताच रस्त्याचे काम उरकण्याचा प्रयत्न करत आहेत. उल्हासनगर महापालिका, जीवनप्राधिकरण, अंबरनाथमधील एका बड्या बिल्डरची जलवाहिनी ही याच मार्गावरून गेली आहे. ती स्थलांतरित न करताच काम सुरू केले आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाthaneठाणे