शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

होर्डिंग्जसाठी दर सहा महिन्यांनी द्यावे लागणार स्थैर्यता प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 00:44 IST

महासभेत होणार धोरण निश्चित : मंजुरीची प्रतीक्षा, ठाणे महापालिकेचा पुढाकार

ठाणे : मागील वर्षी पुण्यात होर्डिंग्जच्या दुर्घटनेनंतर संपूर्ण राज्यातील विविध महापालिका हद्दीतील होर्डिंग्जचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यानंतर ठाणे महापालिकेनेही शहरातील होर्डिंग्जबाबत स्थैर्यता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी पावले उचलली होती. परंतु, यावर आता खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब होणार आहे. त्यानुसार प्रत्येक होर्डिंग्जसाठी दर सहा महिन्यांनी अशा प्रकारचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आता पालिकेने धोरण निश्चित करण्याचे ठरविले असून यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.

मागील वर्षी पुण्यात जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुघर्टनेत चार जणांना आपला जीव गमावावा लागला होता. या घटनेनंतर ठाणे महापालिका प्रशासनाने या होर्डिंग्जबाबत महत्त्वाची पावले उचलली आहेत. ठाणे महापालिका प्रशासनाने आता शहरातील जाहिरात फलकांसाठी दर सहा महिन्यांनी स्थैर्यता प्रमाणपत्र बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात धोरणात्मक निर्णय १९ जूनच्या महासभेत घेतला जाणार आहे. पुण्यातील घटनेनंतर ठाणे महापालिका प्रशासनानेही शहरातील जाहीरात फलकांची तपासणी करून स्थैर्यता प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळेस संबंधीत ठेकेदारांनी महापालिकेकडे त्यानुसार प्रमाणपत्र सादर केले होते, असा दावा प्रशासनाने केला होता. मात्र, त्यालाही सहा महिन्यांचा काळ पूर्ण झाला आहे.बुधवारी मुंबईमध्ये जाहिरात फलक कोसळल्याची घटना घडली असून, त्यापाठोपाठ गुरुवारी सकाळी ठाणे स्थानकाजवळील एसटी महामंडळाच्या आगारातील जाहिरात फलक कोसळला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, त्यामुळे जाहिरातफलकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नेमकी ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने आता शहरातील जाहिरात फलकांसाठीदर सहा महिन्यांनी स्थैर्यता प्रमाणपत्र देणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे.ग्लोबल वार्मिंगमुळे फलक धोक्यातसद्यस्थीतीत वाढत चाललेल्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणात बदल होत आहेत. पावसाळ्याव्यतिरिक्तही वारंवार वादळाचे प्रमाण वाढले आहे. बदलत्या वातावरणामुळे लोखंड गंजण्याची प्रक्रिया जलदगतीने घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जाहिरात फलकाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून नियमित निगा व देखभाल राखणे आवश्यक आहे. त्यामुळे जाहिरात फलकामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी शहरातील जाहिरात फलकांसाठी दर सहा महिन्यांनी स्थैर्यता प्रमाणपत्र बंधनकारक करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने या प्रस्तावात नमूद केले आहे.प्रभाग समितीनिहाय खासगी जाहिरात फलकांची संख्याप्रभाग समीती संख्याकोपरी ०६रायलादेवी ०१कळवा १०वागळे इस्टेट ३४दिवा ३१वर्तकनगर-लोकमान्य १०६माजीवाडा २६४नौपाडा ६५उथळसर ३५एकूण ५४३

टॅग्स :thaneठाणे