शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

ST Strike : एसटी संप चिघळण्याची शक्यता; खोपट डेपोतील विश्रामगृहातून कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 15:41 IST

ST Strike : ठाण्यातील खोपट आगारातील विश्रांती कक्षात आराम करणाऱ्या वाहकांची चक्क हाकालपट्टी करण्यात आल्याने आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. 

ठाणे - गेले अनेक दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी संपावर गेले असून त्यामुळे सामान्य प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. अहिंसक मार्गाने सुरू असलेल्या या एसटी कर्मचाऱ्यांच्या लढ्याला आज एक वेगळेच वळण लागले असून एसटी कर्मचाऱ्यांना सरकार दरबारी किती महत्व आहे याची प्रचिती मिळते. आज ठाण्यातील खोपट आगारातील विश्रांती कक्षात आराम करणाऱ्या वाहकांची चक्क हाकालपट्टी करण्यात आल्याने आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. 

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे सरकारमध्ये विलनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी संपावर गेले असून आपली मागणी पूर्ण झाल्याशिवाय कामावर रुजू होणार नाही असा चंगच जणू त्यांनी बांधला आहे. कोरोनाकाळात आपल्या जीवाची बाजी लावत सरकारी कर्मचारी म्हणून आपण सेवा बजावली तेव्हा आपल्याला सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वागणूक दिली व कोरोना ओसरताच आपल्याला पुन्हा महामंडळाच्या कर्मचाऱ्याप्रमाणे सापत्न वागणूक का दिली जात आहे असा थेट सवाल आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी विचारला आहे. 

"सरकारने कितीही बळाचा वापर केला तरीही हे आंदोलन सुरू राहील"

आपण सर्वजण अत्यंत संयम राखत आंदोलन करत असताना सरकारने मात्र दडपशाहीने खोपट आगारातील एसटी कर्मचाऱ्यांच्या विश्रांती गृहाला टाळे ठोकण्याचा जुलूम का केला असा सवाल काहींनी केला. यात खेदाची गोष्ट म्हणजे विश्रांती कक्षात आराम करत असलेल्या बस वाहकांना आहेत त्या परिस्थितीत बाहेर हाकलण्यात आले ज्याचा निषेध सर्वच थरातून होत आहे. सरकारने कितीही बळाचा वापर केला तरीही हे आंदोलन असेच सुरू राहील अशी गर्जना अनेक कर्मचाऱ्यांनी केली. 

टॅग्स :ST Strikeएसटी संपthaneठाणे