शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

एसटीला बसली ‘कपातीची गोळी’, १५० कर्मचारी कार्यमुक्त : होळी, मे महिन्यात कर्मचाऱ्यांवर असणार ताण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 04:52 IST

होळीचा सण तोंडावर असताना कर्मचाऱ्यांनाच डबल ड्युटी करावी लागणार आहे.

ठाणे : एसटी महामंडळाच्या ठाणे विभागाला मिळालेल्या ५० लालपरी आणि १५ टक्के भाडेवाढीने तारले आहे. मात्र, नव्या वर्षाच्या सुरुवातीला राजकीय हस्तक्षेपामुळे ठाणे नियंत्रक विभागातून १५० चालक-वाहक, लिपिक आणि मेकॅनिक यांनी आपापल्या मूळ गावी बदली करून घेतल्याने कर्मचाऱ्यांची चणचण भासू लागली आहे. होळीचा सण तोंडावर असताना कर्मचाऱ्यांनाच डबल ड्युटी करावी लागणार आहे.

केवळ ठाणे विभागच नव्हे तर पालघर, रायगड आणि मुंबई या कोकणपट्ट्यातही कर्मचारीटंचाई जाणवत असल्याचे सूत्रांनी सांगितले. ठाणे आगारात आधीच २८० ते ३०० हून अधिक रिक्त पदे आहेत. त्यातच जवळपास १५० कर्मचारी नव्या वर्षाच्या सुरुवातीला विनंती अर्जानुसार कार्यमुक्त केल्याने रिक्त पदांची संख्या वाढली. होळीला कोकणात जाणाऱ्यांची संख्या जास्त असते. परिणामी जादा गाड्या सोडाव्या लागतात. मात्र, गाड्या सोडल्या तरी अतिरिक्त मनुष्यबळ आणायचे कुठून हा प्रश्न आहे.

असा पडतोय खड्डा

मुंबई आणि ठाणे ही सुशिक्षित शहरे असल्याने येथील तरुण एसटी महामंडळात भरती होत नाहीत.

महामंडळाच्या भरती प्रक्रियेत, मराठवाडा, विदर्भ आदी भागातील तरुण मोठ्या प्रमाणात भरती होतात.

मुंबईत भरती प्रक्रियेत रुजू व्हायचे आणि नंतर राजकीय वजन वापरून डेप्युटेशनवर दोन ते तीन वर्षात स्थानिक पातळीवर जात असल्याने ही पोकळी दर दोन ते तीन वर्षांनी ठाणे, मुंबई किंवा कोकण पट्ट्यात हमखास निर्माण झाल्याची माहिती आहे.

डेप्युटेशनवर बदली

विदर्भ, मराठवाडा, जळगाव, धुळे, नाशिक, परभणी आदी भागातील चालक-वाहकांनी विनवणी करून डेप्युटेशनवर आपली बदली करून घेतली. सांगली, सातारा आणि कोकण पट्ट्यातील कर्मचाऱ्यांचा यात समावेश नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एसटी विभागाला  ३०० कर्मचाऱ्यांची कमतरता असून, १५० कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केल्याने पोकळी निर्माण झाली. ही रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही रिक्त पदे तातडीने भरावी, अशी मागणी महामंडळाकडे केली.

सागर पळसुले, विभाग नियंत्रक, ठाणे एसटी