शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

डोंबिवलीत संतप्त प्रवाशांनी रोखली एसटी; मंत्रालय’साठी अधिक गाड्या सोडत असल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 23:49 IST

ठाण्यासाठी बस सोडण्याची मागणी

डोंबिवली : अत्यावश्यक सेवेतील व सरकारी कर्मचाऱ्यांना रेल्वे सुविधा आहे, परंतु खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यासाठी बसशिवाय पर्याय नाही. बससाठी आम्ही तासन्तास रांगेत उभे राहतो. आम्हाला वेळेत बस मिळायला हवी, त्यासाठी बसफेºया वाढवा, अशी मागणी करत संतप्त प्रवाशांनी गुरुवारी सकाळी पूर्वेतील इंदिरा गांधी चौकात मंत्रालयासाठी सोडण्यात येणारी बस रोखून धरली.

ठाण्याला जाण्यासाठी अनेक जण पहाटेपासून रांगेत उभे होते. मात्र, सकाळी ८ वाजले तरी मंत्रालयासाठी बस सोडण्यात आल्या. त्यामुळे ठाणे बस कधी सोडणार, असा संतप्त सवाल करत प्रवाशांनी बस रोखून धरली. आधी ठाणे बस सोडा, त्याशिवाय कोणतीही बस जाऊ देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. १५ मिनिटे हा प्रकार सुरू होता. अखेर, प्रवाशांच्या मागणीची दखल घेत एसटी महामंडळाने एक बस ठाणे मार्गावर सोडली. या बसची घोषणा होताच ठाण्यात जाऊ इच्छिणाºयांची बसमध्ये चढण्यासाठी झुंबड उडाली. परिणामी, तेथे फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले.

यासंदर्भात एसटीच्या बस नियंत्रण व्यवस्थापनाने सांगितले की, मंत्रालय मार्गावर बस सोडल्या, असे प्रवाशांचे म्हणणे चुकीचे आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसारच मंत्रालयासाठी बस सोडण्यात आल्या आहे. ठाणे डेपोसाठी आलेल्या बस ठाण्याला सोडतो. गुरुवारी काही बस वाहतूककोंडीत अडकल्याने समस्या निर्माण झाली होती. प्रवाशांनी संयम राखावा आणि कोरोनाच्या धर्तीवर नियमांचे पालन करावे, असेही आवाहन त्यांनी केले.

लेटमार्कमुळे नाहक नुकसान : अनेक कंपन्यांमध्ये बायोमेट्रिक अथवा संगणकीय हजेरी पद्धत आहे. त्यामुळे बस अथवा अन्य कोणत्याही कारणामुळे कामावर येण्यास उशीर झाला, तर त्याचा नाहक फटका सोसावा लागतो. अगोदरच आर्थिक परिस्थिती भीषण असताना, आणखी नुकसान होत असल्याने कर्मचाºयांनी नाराजी व्यक्त केली.

खड्डे, कोंडी अन् कामावर येण्याची सक्ती

च्सातत्याने मागणी होऊनही रेल्वेसेवा सुरू केली जात नाही. त्यामुळे नियोजन कोलमडले आहे. त्यात खासगी वाहनांनी जायचे म्हणजे तिकीट अथवा प्रवासावर खूप पैसे खर्च होतात. सामान्यांनी जगायचे कसे? आम्ही नोकरी टिकवायची म्हणून जीव धोक्यात घालून प्रवास करतो, पण आम्हाला होणाºया त्रासाचे काय, असा संतप्त सवाल त्रस्त नागरिकांनी केला.

च्कल्याण-शीळ महामार्गावर खड्डे पडले आहेत. त्यात वाहतूककोंडी होते, त्यामुळेदेखील आम्ही त्रस्त आहोत. सरकार लक्ष घालत नाही आणि कंपन्यांमध्ये वरिष्ठ कामावर येण्याची सक्ती करतात. या परिस्थितीमुळे सामान्यांची अडचण होत आहे. याकडे कोणी लक्ष देईल का, असाही सवाल नागरिकांनी केला.

टॅग्स :dombivaliडोंबिवली