शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत संतप्त प्रवाशांनी रोखली एसटी; मंत्रालय’साठी अधिक गाड्या सोडत असल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 23:49 IST

ठाण्यासाठी बस सोडण्याची मागणी

डोंबिवली : अत्यावश्यक सेवेतील व सरकारी कर्मचाऱ्यांना रेल्वे सुविधा आहे, परंतु खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यासाठी बसशिवाय पर्याय नाही. बससाठी आम्ही तासन्तास रांगेत उभे राहतो. आम्हाला वेळेत बस मिळायला हवी, त्यासाठी बसफेºया वाढवा, अशी मागणी करत संतप्त प्रवाशांनी गुरुवारी सकाळी पूर्वेतील इंदिरा गांधी चौकात मंत्रालयासाठी सोडण्यात येणारी बस रोखून धरली.

ठाण्याला जाण्यासाठी अनेक जण पहाटेपासून रांगेत उभे होते. मात्र, सकाळी ८ वाजले तरी मंत्रालयासाठी बस सोडण्यात आल्या. त्यामुळे ठाणे बस कधी सोडणार, असा संतप्त सवाल करत प्रवाशांनी बस रोखून धरली. आधी ठाणे बस सोडा, त्याशिवाय कोणतीही बस जाऊ देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. १५ मिनिटे हा प्रकार सुरू होता. अखेर, प्रवाशांच्या मागणीची दखल घेत एसटी महामंडळाने एक बस ठाणे मार्गावर सोडली. या बसची घोषणा होताच ठाण्यात जाऊ इच्छिणाºयांची बसमध्ये चढण्यासाठी झुंबड उडाली. परिणामी, तेथे फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले.

यासंदर्भात एसटीच्या बस नियंत्रण व्यवस्थापनाने सांगितले की, मंत्रालय मार्गावर बस सोडल्या, असे प्रवाशांचे म्हणणे चुकीचे आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसारच मंत्रालयासाठी बस सोडण्यात आल्या आहे. ठाणे डेपोसाठी आलेल्या बस ठाण्याला सोडतो. गुरुवारी काही बस वाहतूककोंडीत अडकल्याने समस्या निर्माण झाली होती. प्रवाशांनी संयम राखावा आणि कोरोनाच्या धर्तीवर नियमांचे पालन करावे, असेही आवाहन त्यांनी केले.

लेटमार्कमुळे नाहक नुकसान : अनेक कंपन्यांमध्ये बायोमेट्रिक अथवा संगणकीय हजेरी पद्धत आहे. त्यामुळे बस अथवा अन्य कोणत्याही कारणामुळे कामावर येण्यास उशीर झाला, तर त्याचा नाहक फटका सोसावा लागतो. अगोदरच आर्थिक परिस्थिती भीषण असताना, आणखी नुकसान होत असल्याने कर्मचाºयांनी नाराजी व्यक्त केली.

खड्डे, कोंडी अन् कामावर येण्याची सक्ती

च्सातत्याने मागणी होऊनही रेल्वेसेवा सुरू केली जात नाही. त्यामुळे नियोजन कोलमडले आहे. त्यात खासगी वाहनांनी जायचे म्हणजे तिकीट अथवा प्रवासावर खूप पैसे खर्च होतात. सामान्यांनी जगायचे कसे? आम्ही नोकरी टिकवायची म्हणून जीव धोक्यात घालून प्रवास करतो, पण आम्हाला होणाºया त्रासाचे काय, असा संतप्त सवाल त्रस्त नागरिकांनी केला.

च्कल्याण-शीळ महामार्गावर खड्डे पडले आहेत. त्यात वाहतूककोंडी होते, त्यामुळेदेखील आम्ही त्रस्त आहोत. सरकार लक्ष घालत नाही आणि कंपन्यांमध्ये वरिष्ठ कामावर येण्याची सक्ती करतात. या परिस्थितीमुळे सामान्यांची अडचण होत आहे. याकडे कोणी लक्ष देईल का, असाही सवाल नागरिकांनी केला.

टॅग्स :dombivaliडोंबिवली