शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
4
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
5
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
6
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
7
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
8
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
9
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
10
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
11
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
12
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
13
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
14
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
15
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
16
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
17
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
18
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
19
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

मीरा भाईंदरमध्ये क्लस्टरसह एसआरए पण लागू करणार - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 19:47 IST

मुख्यमंत्री म्हणाले की, मेट्रो कारशेडच्या जागेला लोकांचा विरोध असून कारशेड उत्तन येथे न्यायचा आहे.

मीरारोड -  मीरा भाईंदरमधल्या जुन्या व धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी ठाण्याच्या धर्तीवर क्लस्टर योजना लागू करणार. त्याच सोबत झोपडपट्टी मुक्त शहर करण्यासाठी शहरात झोपडपट्टीवासीयांना इमारतीत पक्की घरे देण्यासाठी एसआरए योजना सुद्धा लागू करू अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाईंदर येथील मीरा भाईंदर संस्कृती आर्ट फेस्टिव्हलमध्ये बोलताना दिली. 

प्रताप सरनाईक फाउंडेशन व संस्कृती युवा प्रतिष्ठान आदींच्या वतीने इंद्रलोक येथील बाळासाहेब ठाकरे मैदानात आयोजित आर्ट फेस्टिव्हल च्या समारोप सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार प्रताप सरनाईक, गीता जैन, प्रकाश सुर्वे सह जिल्हाधिकरी अशोक शिनगारे, पालिका आयुक्त दिलीप ढोले, माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा, मुझफ्फर हुसेन, नरेंद्र मेहता आदींसह अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.  यावेळी कुमार विश्वास यांच्या कविता व  मिश्कील टिप्पण्यांच्या कार्यक्रमाचा मुख्यमंत्र्यांनी आनंद घेतला. 

मुख्यमंत्री म्हणाले की, मेट्रो कारशेडच्या जागेला लोकांचा विरोध असून कारशेड उत्तन येथे न्यायचा आहे. मीरा भाईंदरची मेट्रो हे सरनाईकानी आणली व त्यासाठी त्यांनी आंदोलने केली. त्यात आम्ही सुद्धा सहभागी होतो.  मुंबई , ठाण्याचा जसा विकास होतोय तसाच मीरा भाईंदरचा करणार आहोत. सूर्या पाणी पुरवठा योजना , शहरातील रस्ते काँक्रीटचे करण्यासाठी निधी दिला आहे. दहिसर - भाईंदर रस्ता सुद्धा आम्ही करणार आहोत ज्यामुळे टोल नाक्यातून सुटका होईल.  

शहराची विकास कामे करतानाच आपली संस्कृती, परंपरा वाढवण्याचे काम आर्ट फेस्टिव्हलच्या माध्यमातून या. सरनाईक करतात. शहराच्या विकासाची कामे आ. सरनाईक व आमदार गीता जैन करत आहेत. शहराला भरपूर निधी दिला आहे. आता निधीचे बोलू नका.  नंतर साठी सुद्धा काही बाकी ठेवा? नाहीतर बाकीचे पण मागतील आणि आमचा खजिना खाली होईल असे मुख्यमंत्री म्हणाले. 

अयोध्येला जायचे आहे, एकदा जाणार होतो पण विमानातून उतरावे लागले. आम्ही काम करायला लागलो त्यामुळे काही जण आता रस्त्यावर फिरायला लागले, मोर्चा पण काढण्याची तयारी करत आहेत. समृद्धी महामार्गला काही जणांनी विरोध करायला लावला होता असा टोला मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला. 

पूर्वी पाकिस्तान केवळ बाळासाहेबांना घाबरायचे. बाळासाहेब म्हणायचे की एक दिवसाचा पंतप्रधान करा मग राम मंदिर बांधतो व काश्मीर मधील कलम ३७० हटवतो. बाळासाहेबांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पूर्ण करत आहेत त्यामुळे झालेली चूक सुधारून राज्यात भाजपा सोबत सरकार बनवले आहे. पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शाह यांचा पूर्ण पाठिंबा व सहकार्य आहे  असे मुख्यमंत्री म्हणाले. 

भाषण सुरू असताना वीज गुल मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना काही वेळा साठी वीज गेल्याने काळोख झाला. त्यावर, भाषण बंद करू का?  पोलीस आयुक्तांनी वीज घालवली का? असा मिश्किल टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेpratap sarnaikप्रताप सरनाईकPoliticsराजकारण