शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

मीरा भाईंदरमध्ये क्लस्टरसह एसआरए पण लागू करणार - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 19:47 IST

मुख्यमंत्री म्हणाले की, मेट्रो कारशेडच्या जागेला लोकांचा विरोध असून कारशेड उत्तन येथे न्यायचा आहे.

मीरारोड -  मीरा भाईंदरमधल्या जुन्या व धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी ठाण्याच्या धर्तीवर क्लस्टर योजना लागू करणार. त्याच सोबत झोपडपट्टी मुक्त शहर करण्यासाठी शहरात झोपडपट्टीवासीयांना इमारतीत पक्की घरे देण्यासाठी एसआरए योजना सुद्धा लागू करू अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाईंदर येथील मीरा भाईंदर संस्कृती आर्ट फेस्टिव्हलमध्ये बोलताना दिली. 

प्रताप सरनाईक फाउंडेशन व संस्कृती युवा प्रतिष्ठान आदींच्या वतीने इंद्रलोक येथील बाळासाहेब ठाकरे मैदानात आयोजित आर्ट फेस्टिव्हल च्या समारोप सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार प्रताप सरनाईक, गीता जैन, प्रकाश सुर्वे सह जिल्हाधिकरी अशोक शिनगारे, पालिका आयुक्त दिलीप ढोले, माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा, मुझफ्फर हुसेन, नरेंद्र मेहता आदींसह अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.  यावेळी कुमार विश्वास यांच्या कविता व  मिश्कील टिप्पण्यांच्या कार्यक्रमाचा मुख्यमंत्र्यांनी आनंद घेतला. 

मुख्यमंत्री म्हणाले की, मेट्रो कारशेडच्या जागेला लोकांचा विरोध असून कारशेड उत्तन येथे न्यायचा आहे. मीरा भाईंदरची मेट्रो हे सरनाईकानी आणली व त्यासाठी त्यांनी आंदोलने केली. त्यात आम्ही सुद्धा सहभागी होतो.  मुंबई , ठाण्याचा जसा विकास होतोय तसाच मीरा भाईंदरचा करणार आहोत. सूर्या पाणी पुरवठा योजना , शहरातील रस्ते काँक्रीटचे करण्यासाठी निधी दिला आहे. दहिसर - भाईंदर रस्ता सुद्धा आम्ही करणार आहोत ज्यामुळे टोल नाक्यातून सुटका होईल.  

शहराची विकास कामे करतानाच आपली संस्कृती, परंपरा वाढवण्याचे काम आर्ट फेस्टिव्हलच्या माध्यमातून या. सरनाईक करतात. शहराच्या विकासाची कामे आ. सरनाईक व आमदार गीता जैन करत आहेत. शहराला भरपूर निधी दिला आहे. आता निधीचे बोलू नका.  नंतर साठी सुद्धा काही बाकी ठेवा? नाहीतर बाकीचे पण मागतील आणि आमचा खजिना खाली होईल असे मुख्यमंत्री म्हणाले. 

अयोध्येला जायचे आहे, एकदा जाणार होतो पण विमानातून उतरावे लागले. आम्ही काम करायला लागलो त्यामुळे काही जण आता रस्त्यावर फिरायला लागले, मोर्चा पण काढण्याची तयारी करत आहेत. समृद्धी महामार्गला काही जणांनी विरोध करायला लावला होता असा टोला मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला. 

पूर्वी पाकिस्तान केवळ बाळासाहेबांना घाबरायचे. बाळासाहेब म्हणायचे की एक दिवसाचा पंतप्रधान करा मग राम मंदिर बांधतो व काश्मीर मधील कलम ३७० हटवतो. बाळासाहेबांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पूर्ण करत आहेत त्यामुळे झालेली चूक सुधारून राज्यात भाजपा सोबत सरकार बनवले आहे. पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शाह यांचा पूर्ण पाठिंबा व सहकार्य आहे  असे मुख्यमंत्री म्हणाले. 

भाषण सुरू असताना वीज गुल मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना काही वेळा साठी वीज गेल्याने काळोख झाला. त्यावर, भाषण बंद करू का?  पोलीस आयुक्तांनी वीज घालवली का? असा मिश्किल टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेpratap sarnaikप्रताप सरनाईकPoliticsराजकारण