शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
6
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
7
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
8
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
11
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
12
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
13
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
14
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
15
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
16
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
17
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
18
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
19
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
20
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

उल्हासनगरमध्ये डेंग्यूने मुलाचा मृत्यू?

By admin | Updated: September 8, 2016 02:50 IST

शहरात ताप आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तापाचे १७००, डेंग्यूचे संशयित ३८, तर मलेरियाच्या ४१ रुग्णांची पालिकेकडे नोंद झाली आहे.

उल्हासनगर : शहरात ताप आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तापाचे १७००, डेंग्यूचे संशयित ३८, तर मलेरियाच्या ४१ रुग्णांची पालिकेकडे नोंद झाली आहे. दरम्यान, डेंग्यूने साहिल भालेराव (१७) या मुलाचा मृत्यू झाला. उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयावर कारवाईची मागणी कुटुंबाने केली आहे. उल्हासनगरमध्ये नियमित कचरा उचलला जात नाही. परिणामी, कचऱ्याचे ढीग साचून दुर्गंधी पसरली आहे. ताप व डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचा आरोप शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी करत कारवाईची मागणी आयुक्तांकडे केली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडे जानेवारीपासून तापाचे १७००, तर डेंग्यूच्या ३८ रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णालयात खाटा मिळत नसल्याने रुग्णांना जमिनीवर झोपण्याची वेळ आल्याची माहिती मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा चिकित्सक डॉ. अशोक नंदापूरकर यांनी दिली.शहरातील कॅम्प नं.-४ दहाचाळ विभागात राहणाऱ्या साहिलला ताप आल्यानंतर प्राथमिक उपचारासाठी खाजगी दवाखान्यात नेले. दुसऱ्या दिवशी रामरक्षा रुग्णालयात दाखल केल्यानंतरही तब्येतीत सुधारणा न झाल्याने चार दिवसांनी एम्स रुग्णालयात नेले. उपचारादरम्यान साहिलचा मृत्यू झाला. त्याच्या पालकांसह कुटुंबांनी साहिलवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला आहे. ताप व डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाने जनजागृती केली. तसेच औषधांची खरेदी करून आरोग्य केंद्रासह रुग्णालयात पुरवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांनी दिली. १५ दिवसांत डेंग्यूचे संशयित १६ रुग्ण आढळले. त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार करून घरी सोडून दिले, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)