शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमध्ये डेंग्यूने मुलाचा मृत्यू?

By admin | Updated: September 8, 2016 02:50 IST

शहरात ताप आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तापाचे १७००, डेंग्यूचे संशयित ३८, तर मलेरियाच्या ४१ रुग्णांची पालिकेकडे नोंद झाली आहे.

उल्हासनगर : शहरात ताप आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तापाचे १७००, डेंग्यूचे संशयित ३८, तर मलेरियाच्या ४१ रुग्णांची पालिकेकडे नोंद झाली आहे. दरम्यान, डेंग्यूने साहिल भालेराव (१७) या मुलाचा मृत्यू झाला. उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयावर कारवाईची मागणी कुटुंबाने केली आहे. उल्हासनगरमध्ये नियमित कचरा उचलला जात नाही. परिणामी, कचऱ्याचे ढीग साचून दुर्गंधी पसरली आहे. ताप व डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचा आरोप शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी करत कारवाईची मागणी आयुक्तांकडे केली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडे जानेवारीपासून तापाचे १७००, तर डेंग्यूच्या ३८ रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णालयात खाटा मिळत नसल्याने रुग्णांना जमिनीवर झोपण्याची वेळ आल्याची माहिती मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा चिकित्सक डॉ. अशोक नंदापूरकर यांनी दिली.शहरातील कॅम्प नं.-४ दहाचाळ विभागात राहणाऱ्या साहिलला ताप आल्यानंतर प्राथमिक उपचारासाठी खाजगी दवाखान्यात नेले. दुसऱ्या दिवशी रामरक्षा रुग्णालयात दाखल केल्यानंतरही तब्येतीत सुधारणा न झाल्याने चार दिवसांनी एम्स रुग्णालयात नेले. उपचारादरम्यान साहिलचा मृत्यू झाला. त्याच्या पालकांसह कुटुंबांनी साहिलवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला आहे. ताप व डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाने जनजागृती केली. तसेच औषधांची खरेदी करून आरोग्य केंद्रासह रुग्णालयात पुरवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांनी दिली. १५ दिवसांत डेंग्यूचे संशयित १६ रुग्ण आढळले. त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार करून घरी सोडून दिले, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)