शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

कोणी रिलॅक्स, तर कोणी टेन्शनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:41 IST

ठाणे जिल्ह्यात ११५०७७ विद्यार्थ्यांनी केली होती नाेंदणी स्नेहा पावसकर लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अन्य बोर्डांच्या ...

ठाणे जिल्ह्यात ११५०७७ विद्यार्थ्यांनी केली होती नाेंदणी

स्नेहा पावसकर

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अन्य बोर्डांच्या धर्तीवर महाराष्ट्र बोर्डानेही यंदाची दहावीची परीक्षा रद्द केली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय योग्य असला तरी अव्वल येण्याच्या, सर्वोत्तम गुण मिळवण्याच्या दृष्टीने वर्षभर कसून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये मात्र चिंता दिसते आहे. ठाणे जिल्ह्यातील एकूण ११५०७७ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

निकालासाठी कोणते निकष लावणार याबाबत आता विद्यार्थी चिंताग्रस्त आहेत.

दरवर्षी दहावीची परीक्षा म्हटली की, विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही तणावाचे वातावरण असते. परीक्षा आणि निकाल या दोन्ही गोष्टींकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असते. यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई, ठाण्यातील मुलांच्या तर वर्षभर शाळा सुरू झाल्या नाहीच, मात्र परीक्षांबाबतही संभ्रमाचे वातावरण होते. अखेर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनानेही दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षिता याला प्राधान्य दिल्याने काही पालक, विद्यार्थी खुश आहेत. ठाणे जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १०५७७८ आहे. निकालासाठीचे निकष लवकरच सरकार जाहीर करणार आहे. मात्र, वर्गात टॉप येण्यास इच्छुक, उत्तम काॅलेजमध्ये, अपेक्षित शाखेत प्रवेश मिळविण्याची इच्छा असणारे विद्यार्थी, पालक मात्र काहीसे विचारात आणि चिंतेत दिसत आहेत.

-----------

शाळा नसली तरी वर्षभर खूप अभ्यास केला. चांगले गुण मिळविण्याची अपेक्षा होती; पण आता काय निकष वापरतात माहीत नाही. त्यात मिळणाऱ्या गुणांनी चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळवताना खूप अडचणी येतील.

दिव्यांशी स्वामी, विद्यार्थिनी

-----------

निकालाचे निकष स्पष्ट झाल्याशिवाय काही कळणार नाही. अन्यथा अभ्यास करणारे व फारसा अभ्यास न करणाऱ्यांना जवळपास सारखे गुण दिले तर मग काय उपयोग राहील.

रणजिता महदुले, विद्यार्थिनी

-------------

दहावीच्या परीक्षांचे महत्त्व आपणच अवास्तव वाढविले आहे. ते येत्या काळात कमी होईल आणि झाले पाहिजे, तर दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग पाहता सरकारचा परीक्षेबाबतचा निर्णय योग्यच आहे. महामारीचा हा काळ पाहता यंदा आपण या परीक्षांच्या बाबतीत सरकार जे निर्णय घेईल ते मान्य केले पाहिजे आणि अभ्यास केलाच आहे, तर तसाच चांगला अभ्यास करून बारावीच्या परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळवून इच्छित ध्येय गाठा.

सुरेंद्र दिघे, शिक्षणतज्ज्ञ.

--------

तालुकानिहाय जिल्ह्यातील दहावीचे नोंदणीकृत विद्यार्थी

ठाणे महापालिका - २५७८४

नवी मुंबई - १३२५१

कल्याण-डोंबिवली, कल्याण ग्रामीण - १९९३३

उल्हासनगर - ४७७६

अंबरनाथ - ८७७०

मुरबाड - २७१६

शहापूर - ५०५२

भिवंडी, भिवंडी ग्रामीण - १३७६८

भाईंदर - ११७२८