शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

कोणी रिलॅक्स, तर कोणी टेन्शनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:41 IST

ठाणे जिल्ह्यात ११५०७७ विद्यार्थ्यांनी केली होती नाेंदणी स्नेहा पावसकर लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अन्य बोर्डांच्या ...

ठाणे जिल्ह्यात ११५०७७ विद्यार्थ्यांनी केली होती नाेंदणी

स्नेहा पावसकर

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अन्य बोर्डांच्या धर्तीवर महाराष्ट्र बोर्डानेही यंदाची दहावीची परीक्षा रद्द केली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय योग्य असला तरी अव्वल येण्याच्या, सर्वोत्तम गुण मिळवण्याच्या दृष्टीने वर्षभर कसून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये मात्र चिंता दिसते आहे. ठाणे जिल्ह्यातील एकूण ११५०७७ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

निकालासाठी कोणते निकष लावणार याबाबत आता विद्यार्थी चिंताग्रस्त आहेत.

दरवर्षी दहावीची परीक्षा म्हटली की, विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही तणावाचे वातावरण असते. परीक्षा आणि निकाल या दोन्ही गोष्टींकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असते. यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई, ठाण्यातील मुलांच्या तर वर्षभर शाळा सुरू झाल्या नाहीच, मात्र परीक्षांबाबतही संभ्रमाचे वातावरण होते. अखेर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनानेही दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षिता याला प्राधान्य दिल्याने काही पालक, विद्यार्थी खुश आहेत. ठाणे जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १०५७७८ आहे. निकालासाठीचे निकष लवकरच सरकार जाहीर करणार आहे. मात्र, वर्गात टॉप येण्यास इच्छुक, उत्तम काॅलेजमध्ये, अपेक्षित शाखेत प्रवेश मिळविण्याची इच्छा असणारे विद्यार्थी, पालक मात्र काहीसे विचारात आणि चिंतेत दिसत आहेत.

-----------

शाळा नसली तरी वर्षभर खूप अभ्यास केला. चांगले गुण मिळविण्याची अपेक्षा होती; पण आता काय निकष वापरतात माहीत नाही. त्यात मिळणाऱ्या गुणांनी चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळवताना खूप अडचणी येतील.

दिव्यांशी स्वामी, विद्यार्थिनी

-----------

निकालाचे निकष स्पष्ट झाल्याशिवाय काही कळणार नाही. अन्यथा अभ्यास करणारे व फारसा अभ्यास न करणाऱ्यांना जवळपास सारखे गुण दिले तर मग काय उपयोग राहील.

रणजिता महदुले, विद्यार्थिनी

-------------

दहावीच्या परीक्षांचे महत्त्व आपणच अवास्तव वाढविले आहे. ते येत्या काळात कमी होईल आणि झाले पाहिजे, तर दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग पाहता सरकारचा परीक्षेबाबतचा निर्णय योग्यच आहे. महामारीचा हा काळ पाहता यंदा आपण या परीक्षांच्या बाबतीत सरकार जे निर्णय घेईल ते मान्य केले पाहिजे आणि अभ्यास केलाच आहे, तर तसाच चांगला अभ्यास करून बारावीच्या परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळवून इच्छित ध्येय गाठा.

सुरेंद्र दिघे, शिक्षणतज्ज्ञ.

--------

तालुकानिहाय जिल्ह्यातील दहावीचे नोंदणीकृत विद्यार्थी

ठाणे महापालिका - २५७८४

नवी मुंबई - १३२५१

कल्याण-डोंबिवली, कल्याण ग्रामीण - १९९३३

उल्हासनगर - ४७७६

अंबरनाथ - ८७७०

मुरबाड - २७१६

शहापूर - ५०५२

भिवंडी, भिवंडी ग्रामीण - १३७६८

भाईंदर - ११७२८