शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोणी रिलॅक्स, तर कोणी टेन्शनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:41 IST

ठाणे जिल्ह्यात ११५०७७ विद्यार्थ्यांनी केली होती नाेंदणी स्नेहा पावसकर लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अन्य बोर्डांच्या ...

ठाणे जिल्ह्यात ११५०७७ विद्यार्थ्यांनी केली होती नाेंदणी

स्नेहा पावसकर

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अन्य बोर्डांच्या धर्तीवर महाराष्ट्र बोर्डानेही यंदाची दहावीची परीक्षा रद्द केली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय योग्य असला तरी अव्वल येण्याच्या, सर्वोत्तम गुण मिळवण्याच्या दृष्टीने वर्षभर कसून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये मात्र चिंता दिसते आहे. ठाणे जिल्ह्यातील एकूण ११५०७७ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

निकालासाठी कोणते निकष लावणार याबाबत आता विद्यार्थी चिंताग्रस्त आहेत.

दरवर्षी दहावीची परीक्षा म्हटली की, विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही तणावाचे वातावरण असते. परीक्षा आणि निकाल या दोन्ही गोष्टींकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असते. यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई, ठाण्यातील मुलांच्या तर वर्षभर शाळा सुरू झाल्या नाहीच, मात्र परीक्षांबाबतही संभ्रमाचे वातावरण होते. अखेर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनानेही दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षिता याला प्राधान्य दिल्याने काही पालक, विद्यार्थी खुश आहेत. ठाणे जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १०५७७८ आहे. निकालासाठीचे निकष लवकरच सरकार जाहीर करणार आहे. मात्र, वर्गात टॉप येण्यास इच्छुक, उत्तम काॅलेजमध्ये, अपेक्षित शाखेत प्रवेश मिळविण्याची इच्छा असणारे विद्यार्थी, पालक मात्र काहीसे विचारात आणि चिंतेत दिसत आहेत.

-----------

शाळा नसली तरी वर्षभर खूप अभ्यास केला. चांगले गुण मिळविण्याची अपेक्षा होती; पण आता काय निकष वापरतात माहीत नाही. त्यात मिळणाऱ्या गुणांनी चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळवताना खूप अडचणी येतील.

दिव्यांशी स्वामी, विद्यार्थिनी

-----------

निकालाचे निकष स्पष्ट झाल्याशिवाय काही कळणार नाही. अन्यथा अभ्यास करणारे व फारसा अभ्यास न करणाऱ्यांना जवळपास सारखे गुण दिले तर मग काय उपयोग राहील.

रणजिता महदुले, विद्यार्थिनी

-------------

दहावीच्या परीक्षांचे महत्त्व आपणच अवास्तव वाढविले आहे. ते येत्या काळात कमी होईल आणि झाले पाहिजे, तर दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग पाहता सरकारचा परीक्षेबाबतचा निर्णय योग्यच आहे. महामारीचा हा काळ पाहता यंदा आपण या परीक्षांच्या बाबतीत सरकार जे निर्णय घेईल ते मान्य केले पाहिजे आणि अभ्यास केलाच आहे, तर तसाच चांगला अभ्यास करून बारावीच्या परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळवून इच्छित ध्येय गाठा.

सुरेंद्र दिघे, शिक्षणतज्ज्ञ.

--------

तालुकानिहाय जिल्ह्यातील दहावीचे नोंदणीकृत विद्यार्थी

ठाणे महापालिका - २५७८४

नवी मुंबई - १३२५१

कल्याण-डोंबिवली, कल्याण ग्रामीण - १९९३३

उल्हासनगर - ४७७६

अंबरनाथ - ८७७०

मुरबाड - २७१६

शहापूर - ५०५२

भिवंडी, भिवंडी ग्रामीण - १३७६८

भाईंदर - ११७२८