शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

काही कवींच्या कविताही कळत नाही आणि तो कवीही कळत नाही : माधवी घारपुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 13:39 IST

ठाण्यात सुरू असलेल्या पुस्तक आदान प्रदान महोत्सवात सकाळच्या सत्रात पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. 

ठळक मुद्देकाही कवींच्या कविताही कळत नाही आणि तो कवीही कळत नाही : माधवी घारपुरेमराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वा. अ. रेगे सभागृहात पुस्तक आदान प्रदान महोत्सवधनश्री लेले लिखीत ‘सोनचाफ्याची फुले’ (द्वितीय आवृत्ती) या ललित लेख संग्रहाचे प्रकाशन

ठाणे: आजकाल २०० कविता लिहीणारे कवी देखील आहेत. पण त्याच्या कविताही कळत नाही आणि तो कवीही कळत नाही अशी टीका सुप्रसिद्ध लेखिका, व्याख्यात्या माधवी घारपुरे यांनी केले.  मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे आणि व्यास क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वा. अ. रेगे सभागृहात पुस्तक आदान प्रदान महोत्सवात निरुपणकार धनश्री लेले लिखीत ‘सोनचाफ्याची फुले’ (द्वितीय आवृत्ती) या ललित लेख संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

          ललित लेखन म्हणजे शब्दांचा उत्सव आणि दुकानाच्या बाहेर साड्या नेसवलेले पुतळे नव्हे तर संस्कार, विचार आणि भावना याचे प्रगतीकरण म्हणजे ललित लेखन असे मार्गदर्शनपर वक्तव्य घारपुरे यांनी पुढे बोलताना केले. त्या म्हणाल्या, आपण प्रत्येक जण लेखक आहोत, आपल्यात प्रतिभेचा अकुंर आहे पण तो कोणीतरी फुंकर घालून फुलवावा लागतो. गुलाब आणि मोगऱ्यापेक्षा सोनताफ्याला त्याच्या गुणधर्माने जास्त मान असतो, त्याची तुलना कोणत्याही फुलाशी नाही. हे फुल पुष्पगुच्छात दिसत नाही कारण त्याला स्वतंत्र ओळख आहे. या फुलाचे गुणधर्म या पुस्तकात दिसते. माणूस सहृदय असेल तर ललित लेखन जन्माला येते अशा शब्दांत लेखिका लेले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, ललित लेखनाची गुणवैशिष्ट्य मी पाहते आणि जेव्हा मी माझ्या पुस्तकाकडे पाहते तेव्हा मला या गुणवैशिष्ट्याची पारडे किती जड आहे हे दिसून येते. जसा गायकाला गळा असतो तसा लेखकाच्या हाताला नियमीत सराव असावा लागतो आणि मला खुप लांबचा पल्ला गाठायचा आहे. व्यास क्रिएशन्सचे संचालक निलेश गायकवाड यांनी प्रास्ताविक, मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या उपाध्यक्षा शीला मराठे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार श्री. वा. नेर्लेकर, अभिनेत्री दीप्ती भागवत, मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर उपस्थित होते. सुत्रसंचालन स्मिता पोंक्षे यांनी केले. ---------------------फोटो : पुस्तक प्रकाशन

टॅग्स :thaneठाणेliteratureसाहित्यcultureसांस्कृतिक