शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सूर्यमाळ आश्रमशाळा निकृष्ट; सात कोटी आठ लाख खर्च जाणार वाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 00:01 IST

धकाम करणाऱ्या नाशिक येथील वैष्णवी इफास्ट्रक्चर्स ही बांधकाम एजन्सी व या बांधकाम प्रकरणातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई होत नसल्याने पाणी कुठे मुरते आहे असा प्रश्न पडला आहे.

मोखाडा : अंदाजपत्रकीय रक्कमेपेक्षा १ कोटी रु पये वाढीव खर्च करून देखील झालेल्या निकृष्ट बांधकामामुळे सूर्यमाळ आश्रमशाळेच्या उभारणीचे हे प्रकरण चर्चेमध्ये आले आहे. दरम्यान, हे बांधकाम करणाऱ्या नाशिक येथील वैष्णवी इफास्ट्रक्चर्स ही बांधकाम एजन्सी व या बांधकाम प्रकरणातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई होत नसल्याने पाणी कुठे मुरते आहे असा प्रश्न पडला आहे.कुठे पत्रेच फुटलेत तर, कुठे त्यातून पाणी झिरपतेय यामुळे ओल्या झालेल्या लाद्यांवर कशाबशा गाद्या टाकुन झोपायचे, शेजारी तुटक्या फुटक्या पत्र्याच्या पेट्या कोपºयात सरकवकलेल्या पहावयास मिळातात. आगोदरच ओल्या असणाºया लाद्या व भिंती त्यात कपडे सुकविणे अशक्यच यामुळे अनेकांना त्वचारोग झाल्याचे विद्यार्थी सांगतात. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने खिडकीतून पाण्याचे शिंतोडे येतात. अशा वातावरणात जेवण, अभ्यास व झोपणे शक्य आहे का असा सवाल विचारला जात आहे.तालुक्यातील सुर्यमाळ आश्रमशाळेच्या इमारतीचे काम या गावात सुरु आहे. मात्र, पाच वर्ष होऊनही ते पूर्ण होत नसल्याने विद्यार्थ्यांना नरक यातना सोसाव्या लागत आहेत. २०१३ मध्ये नाशिक येथील वैष्णवी इफास्ट्रक्चर्स ने नवीन इमारतीचे बांधकाम हाती घेतले व या इमारतीच्या बांधकामावर ७ कोटी ८ लाख खर्च झाला असताना अर्धेच काम झाल्याचे चित्र आहे. डोंबिवली येथील सरकारमान्य ई स्टकचर प्रा. लिमिटेड या तंत्र निकेतनने या वास्तूचे स्टकचर आॅडीट करून ते निकृष्ट असल्याचा निर्वाळा दिला आहे. असे असतानाही शाखा अभियंता एस. एस. पाटील यांनी हे काम सुरूच ठेवले आहे.दरम्यान, या प्रकरणी ८ सप्टेंबर २०१७ रोजी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. दुसºयांदा २०फेब्रुवारी २०१८ रोजी तो पुन्हा उपस्थित करण्यात आला. त्यावेळी संबंधित अधिकाºयाने येथील सोईसुविधा व या कामाबाबत खोटी करणारी माहिती देऊन शासनाची दिशाभूल केली.येवढे होऊनही या बेजबाबदार अधिकाºयांवर कारवाईचा बडगा न उगारता तसेच अशा भ्रष्ट ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून दोषींवर फौजदारी कारवाई करणे अपेक्षित असताना फक्त कारवाई करु ती होईल अशा बाजार गप्पा सुरु असल्याने संताप व्यक्त होत आहे.कालावधी वाढत असल्याने खर्चही वाढतो आहेजव्हार प्रकल्प कार्यालयांतर्गत १३ आश्रमशाळांच्या इमारतीच्या नुतनीकरणाचे काम पुर्ण झाले आहे. मात्र, सुर्यमाळ आणि पळसुंडा येथील काम ठेकेदार आणि बांधकाम अधिकारी यांच्यामुळे रखडले आहे.यातील पळसुंडा आश्रमशाळेचे बांधकाम जवळपास ७ वर्षापासून सुरु असल्याने कालावधी वाढत आहे व त्यामुळे खर्चाचा आकडाही वाढविला जात आहे. यात ठेकेदार व अधिकाºयांचे खिशे गरम होत आहेत.मुलामुलींचे वसतिगृहाचे स्ट्रक्चरल आॅडीट केले असून त्यामध्ये बांधकाम निकृष्ट असल्याचे आढळून आले आहे. ते बांधकाम पाडण्याची प्रक्रि या सुरू केली आहे.- आर. एस. पवार, कार्यकारी अभियंताया इमारतीची पहाणी जिल्हाधिकारी यांनर केली असून कार्यकारी अभियंता यांना संबंधितठेकेदार व अधिकाºयांवर फौजदारी कारवाई बाबत आदेश दिले आहेत. कारवाई केली जाईल- अजितकुंभार, प्रकल्प अधिकारी, जव्हार

टॅग्स :thaneठाणेpalgharपालघर