शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

सूर्यमाळ आश्रमशाळा निकृष्ट; सात कोटी आठ लाख खर्च जाणार वाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 00:01 IST

धकाम करणाऱ्या नाशिक येथील वैष्णवी इफास्ट्रक्चर्स ही बांधकाम एजन्सी व या बांधकाम प्रकरणातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई होत नसल्याने पाणी कुठे मुरते आहे असा प्रश्न पडला आहे.

मोखाडा : अंदाजपत्रकीय रक्कमेपेक्षा १ कोटी रु पये वाढीव खर्च करून देखील झालेल्या निकृष्ट बांधकामामुळे सूर्यमाळ आश्रमशाळेच्या उभारणीचे हे प्रकरण चर्चेमध्ये आले आहे. दरम्यान, हे बांधकाम करणाऱ्या नाशिक येथील वैष्णवी इफास्ट्रक्चर्स ही बांधकाम एजन्सी व या बांधकाम प्रकरणातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई होत नसल्याने पाणी कुठे मुरते आहे असा प्रश्न पडला आहे.कुठे पत्रेच फुटलेत तर, कुठे त्यातून पाणी झिरपतेय यामुळे ओल्या झालेल्या लाद्यांवर कशाबशा गाद्या टाकुन झोपायचे, शेजारी तुटक्या फुटक्या पत्र्याच्या पेट्या कोपºयात सरकवकलेल्या पहावयास मिळातात. आगोदरच ओल्या असणाºया लाद्या व भिंती त्यात कपडे सुकविणे अशक्यच यामुळे अनेकांना त्वचारोग झाल्याचे विद्यार्थी सांगतात. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने खिडकीतून पाण्याचे शिंतोडे येतात. अशा वातावरणात जेवण, अभ्यास व झोपणे शक्य आहे का असा सवाल विचारला जात आहे.तालुक्यातील सुर्यमाळ आश्रमशाळेच्या इमारतीचे काम या गावात सुरु आहे. मात्र, पाच वर्ष होऊनही ते पूर्ण होत नसल्याने विद्यार्थ्यांना नरक यातना सोसाव्या लागत आहेत. २०१३ मध्ये नाशिक येथील वैष्णवी इफास्ट्रक्चर्स ने नवीन इमारतीचे बांधकाम हाती घेतले व या इमारतीच्या बांधकामावर ७ कोटी ८ लाख खर्च झाला असताना अर्धेच काम झाल्याचे चित्र आहे. डोंबिवली येथील सरकारमान्य ई स्टकचर प्रा. लिमिटेड या तंत्र निकेतनने या वास्तूचे स्टकचर आॅडीट करून ते निकृष्ट असल्याचा निर्वाळा दिला आहे. असे असतानाही शाखा अभियंता एस. एस. पाटील यांनी हे काम सुरूच ठेवले आहे.दरम्यान, या प्रकरणी ८ सप्टेंबर २०१७ रोजी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. दुसºयांदा २०फेब्रुवारी २०१८ रोजी तो पुन्हा उपस्थित करण्यात आला. त्यावेळी संबंधित अधिकाºयाने येथील सोईसुविधा व या कामाबाबत खोटी करणारी माहिती देऊन शासनाची दिशाभूल केली.येवढे होऊनही या बेजबाबदार अधिकाºयांवर कारवाईचा बडगा न उगारता तसेच अशा भ्रष्ट ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून दोषींवर फौजदारी कारवाई करणे अपेक्षित असताना फक्त कारवाई करु ती होईल अशा बाजार गप्पा सुरु असल्याने संताप व्यक्त होत आहे.कालावधी वाढत असल्याने खर्चही वाढतो आहेजव्हार प्रकल्प कार्यालयांतर्गत १३ आश्रमशाळांच्या इमारतीच्या नुतनीकरणाचे काम पुर्ण झाले आहे. मात्र, सुर्यमाळ आणि पळसुंडा येथील काम ठेकेदार आणि बांधकाम अधिकारी यांच्यामुळे रखडले आहे.यातील पळसुंडा आश्रमशाळेचे बांधकाम जवळपास ७ वर्षापासून सुरु असल्याने कालावधी वाढत आहे व त्यामुळे खर्चाचा आकडाही वाढविला जात आहे. यात ठेकेदार व अधिकाºयांचे खिशे गरम होत आहेत.मुलामुलींचे वसतिगृहाचे स्ट्रक्चरल आॅडीट केले असून त्यामध्ये बांधकाम निकृष्ट असल्याचे आढळून आले आहे. ते बांधकाम पाडण्याची प्रक्रि या सुरू केली आहे.- आर. एस. पवार, कार्यकारी अभियंताया इमारतीची पहाणी जिल्हाधिकारी यांनर केली असून कार्यकारी अभियंता यांना संबंधितठेकेदार व अधिकाºयांवर फौजदारी कारवाई बाबत आदेश दिले आहेत. कारवाई केली जाईल- अजितकुंभार, प्रकल्प अधिकारी, जव्हार

टॅग्स :thaneठाणेpalgharपालघर