शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

डम्पिंग ग्राउंडवर मातीचा भराव; ४५ लाखांची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 23:50 IST

आग विझविण्यासाठी अंबरनाथ पालिकेचे प्रयत्न

अंबरनाथ : अंबरनाथ पालिकेचे डम्पिंग ग्राऊंड हे सातत्याने पेटत असल्याने त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी डम्पिंगवर मातीचा भराव करण्याचे काम सुरू केले आहे. तसेच कचऱ्यामधून निघणारा गॅस बाहेर काढण्यासाठी लोखंडी पाईप टाकण्याचे काम सुरू केले आहे. डम्पिंगवरील उपाययोजनेसाठी पालिकेने ४५ लाखांची तरतूदही केली आहे.अंबरनाथ नगरपालिकेचे डम्पिंग ग्राऊंड फॉरेस्ट नाक्यावर असून या ठिकाणी टाकण्यात येणाºया कचºयावर प्रक्रिया होत नसल्याने या ठिकाणी कचºयाला आग लावण्याचे प्रकार वाढले होते. डम्पिंगला सतत आग लागत असल्याने त्याच्या धुराचा त्रास परिसरातील रहिवाशांना होत आहे. अनेक सोसायटी या धुरामुळे त्रस्त आहेत. गेली अनेक वर्ष दुर्गंधीचा त्रास सहन केल्यावर मागील दोन वर्षांपासून नागरिकांना धुराचाही त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवर तोडगा निघत नसल्याने नागरिकांनी पालिकेच्या विरोधात आंदोलनही केले होेते. मात्र ही समस्या सातत्याने वाढत असल्याने या डम्पिंगचा प्रश्न सोडविण्यासाठी पालिकेने डम्पिंगच्या कचºयावर मातीचा भराव करण्याचे काम सुरू केले आहे. तसेच कचºयातून निघणारा गॅस बाहेर काढण्यासाठी लोखंडी पाईप टाकण्याचे काम सुरू केले आहे. डम्पिंगवर मातीचा भराव करण्यासाठी ३० लाखांची तर पाईप टाकण्यासाठी १५ लाखांची असे एकूण ४५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. युध्दपातळीवर हे काम सुरू झाले असून काही प्रमाणात त्रास देखील कमी झाला आहे.मागील १५ दिवसांपासून पालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडवर मातीचा भराव करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. मात्र ज्या ठिकाणी अजूनही मातीचा भराव झालेला नाही त्या ठिकाणी आगीचे सत्र सुरू आहे. मात्र आगीचे प्रमाण कमी झाल्याने नागरिकांना होणारा त्रास पूर्वीपेक्षा कमी झाला आहे. मात्र रस्त्याच्याजवळ असलेला कचरा अजूनही पेटत असल्याने त्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्याची गरज व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे डम्पिंग ग्राऊंडवर येणारा कचरा कसा कमी होईल यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले आहे.उपाययोजना सुरूओला आणि सुका कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. मुख्याधिकारी देविदास पवार यांनी मंगळवारी पुन्हा डम्पिंगची पाहणी केली. या ठिकाणी सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतल्यावर प्रभागातील कचरा वर्गीकरण प्रकल्पांना भेट दिली. घंटागाडी चालकांनाही कचरा संकलित करताना योग्य प्रकारे कचरा हाताळण्याचा सल्ला दिला. पालिकेच्यावतीने प्रभागानुसार कचरा संकलनासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचा परिणाम येत्या काही दिवसात दिसेल अशी प्रतिक्रीया मुख्याधिकारी पवार यांनी दिली.

टॅग्स :ambernathअंबरनाथdumpingकचराGarbage Disposal Issueकचरा प्रश्न