शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

डम्पिंग ग्राउंडवर मातीचा भराव; ४५ लाखांची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 23:50 IST

आग विझविण्यासाठी अंबरनाथ पालिकेचे प्रयत्न

अंबरनाथ : अंबरनाथ पालिकेचे डम्पिंग ग्राऊंड हे सातत्याने पेटत असल्याने त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी डम्पिंगवर मातीचा भराव करण्याचे काम सुरू केले आहे. तसेच कचऱ्यामधून निघणारा गॅस बाहेर काढण्यासाठी लोखंडी पाईप टाकण्याचे काम सुरू केले आहे. डम्पिंगवरील उपाययोजनेसाठी पालिकेने ४५ लाखांची तरतूदही केली आहे.अंबरनाथ नगरपालिकेचे डम्पिंग ग्राऊंड फॉरेस्ट नाक्यावर असून या ठिकाणी टाकण्यात येणाºया कचºयावर प्रक्रिया होत नसल्याने या ठिकाणी कचºयाला आग लावण्याचे प्रकार वाढले होते. डम्पिंगला सतत आग लागत असल्याने त्याच्या धुराचा त्रास परिसरातील रहिवाशांना होत आहे. अनेक सोसायटी या धुरामुळे त्रस्त आहेत. गेली अनेक वर्ष दुर्गंधीचा त्रास सहन केल्यावर मागील दोन वर्षांपासून नागरिकांना धुराचाही त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवर तोडगा निघत नसल्याने नागरिकांनी पालिकेच्या विरोधात आंदोलनही केले होेते. मात्र ही समस्या सातत्याने वाढत असल्याने या डम्पिंगचा प्रश्न सोडविण्यासाठी पालिकेने डम्पिंगच्या कचºयावर मातीचा भराव करण्याचे काम सुरू केले आहे. तसेच कचºयातून निघणारा गॅस बाहेर काढण्यासाठी लोखंडी पाईप टाकण्याचे काम सुरू केले आहे. डम्पिंगवर मातीचा भराव करण्यासाठी ३० लाखांची तर पाईप टाकण्यासाठी १५ लाखांची असे एकूण ४५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. युध्दपातळीवर हे काम सुरू झाले असून काही प्रमाणात त्रास देखील कमी झाला आहे.मागील १५ दिवसांपासून पालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडवर मातीचा भराव करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. मात्र ज्या ठिकाणी अजूनही मातीचा भराव झालेला नाही त्या ठिकाणी आगीचे सत्र सुरू आहे. मात्र आगीचे प्रमाण कमी झाल्याने नागरिकांना होणारा त्रास पूर्वीपेक्षा कमी झाला आहे. मात्र रस्त्याच्याजवळ असलेला कचरा अजूनही पेटत असल्याने त्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्याची गरज व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे डम्पिंग ग्राऊंडवर येणारा कचरा कसा कमी होईल यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले आहे.उपाययोजना सुरूओला आणि सुका कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. मुख्याधिकारी देविदास पवार यांनी मंगळवारी पुन्हा डम्पिंगची पाहणी केली. या ठिकाणी सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतल्यावर प्रभागातील कचरा वर्गीकरण प्रकल्पांना भेट दिली. घंटागाडी चालकांनाही कचरा संकलित करताना योग्य प्रकारे कचरा हाताळण्याचा सल्ला दिला. पालिकेच्यावतीने प्रभागानुसार कचरा संकलनासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचा परिणाम येत्या काही दिवसात दिसेल अशी प्रतिक्रीया मुख्याधिकारी पवार यांनी दिली.

टॅग्स :ambernathअंबरनाथdumpingकचराGarbage Disposal Issueकचरा प्रश्न