शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

समाजाने सामाजिक संस्थांच्या कामात सक्रिय सहभाग घ्यावा : शरद गांगल

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: April 22, 2024 17:18 IST

सार्वजनिक जीवनात बदल घडत असताना लोकाभिमुख स्वयंसेवी संस्था ही काळाची गरज आहे.

प्रज्ञा म्हात्रे,ठाणे : सार्वजनिक जीवनात बदल घडत असताना लोकाभिमुख स्वयंसेवी संस्था ही काळाची गरज आहे. जुन्या, अनुभवी संस्थांनी आपल्या कामाचे वर्तुळ विस्तारत नेले पाहिजे. समाजाने सामाजिक संस्थांच्या कामात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे; असे प्रतिपादन टीजेएसबी सहकारी बँकेचे अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय किर्तीचे मनुष्यबळ विकास तज्ज्ञ, विद्यार्थी विकास योजनेचे संस्थापक सदस्य शरद गांगल यांनी केले. 

ठाणे नौपाडा येथील ब्राह्मण सेवा संघाच्या ९१ व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष अतिथी म्हणून गांगल बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम आगवण, विश्वस्त संजीव ब्रम्हे, आनंद कुलकर्णी उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त संस्थेचे अमृत महोत्सवी सभासद, विशेष नैपुण्य प्राप्त सभासद आणि विद्यार्थी यांचा सत्कार शरद गांगल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना गांगल म्हणाले, ९१ वर्षे सातत्याने काम करणे आणि बदलांना सामोरे जाऊन टिकणे ही मोठी उपलब्धी आहे. 

संस्था स्थापनेची उद्दिष्ट सांभाळून संस्था व्यापक करणे हे कठीण काम असते. मात्र, निष्ठावान, समर्पित कार्यकर्ता संच असले तर संस्था वृद्धिंगत होतात असे सांगून शरद गांगल यांनी ब्राह्मण सेवा संघाच्या कार्याचे कौतुक केले. ब्राह्मण सेवा संघासारख्या संस्था उपयुक्त आहेत असे ते म्हणाले. ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम आगवण यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाला संस्थेचे सभासद, हितचिंतक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणे