शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण तहसीलकडून दाखल्यांसाठी एसएमएस

By admin | Updated: July 29, 2014 00:28 IST

विद्यार्थी, नागरिक, महिला आदींना त्यांच्या विविध दाखल्यांसाठी दररोज तहसील कार्यालयात खेटे मारावे लागतात.

वरपगाव : विद्यार्थी, नागरिक, महिला आदींना त्यांच्या विविध दाखल्यांसाठी दररोज तहसील कार्यालयात खेटे मारावे लागतात. यातूनही दलालांच्या तावडीत सापडल्यावर नागरिकांची लूट होते. हे टाळण्यासाठी कल्याणचे तहसीलदार किरण सरवसे यांनी १ आॅगस्ट या महसूल दिनापासून तालुक्यात दाखल्यांसाठी एसएमएस सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे़ यामुळे नागरिकांच्या वेळेचा व पैशांचा अपव्यय टाळता येणार आहे. हा प्रयोग राज्यात प्रथमच होत असल्याचे तहसीलदारांचे म्हणणे आहे. टोकन देऊन पुढील प्रक्रिया पार पडणार असल्याने कार्यालयातील गर्दी टळून सर्वांना वेळेत दाखले मिळण्यास मदत होणार आहे.कल्याण तहसीलअंतर्गत १२४ महसुली गावे, २८ तलाठी सजे, पाच मंडळ कार्यालये असून २० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. संजय गांधी, पुरवठा विभाग, बिगरशेती आदी प्रमुख विभाग येथे आहेत. कार्यालयातील सेतू सुविधेच्या माध्यमातून आतापर्यंत ३० ते ४० हजार दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी १४ शिबिरे घेण्यात आली. जातीचे दाखले, डोमिसाइल, वास्तव्याचे दाखले, ज्येष्ठ नागरिक दाखले, उत्पन्नाचे दाखले आदींसह विविध दाखल्यांसाठी सेतू कार्यालयासमोरील गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दलालांची गर्दी वाढली होती. त्यावर उपाय म्हणून तहसील कार्यालयाने हा उपाय शोधून काढला आहे़ (वार्ताहर)