शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
5
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
6
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
7
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
8
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
9
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
10
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
11
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
12
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
13
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
14
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
15
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
16
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
17
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
18
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
19
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
20
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

धूम्रपान करणारी युगुले लावतात आग, येऊरचा वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 03:12 IST

येऊरच्या जंगलात आठवडाभरात दोनवेळा आग लागण्याच्या घटना घडल्या असून येथे पार्ट्या करण्याकरिता जाणारी तरुणांची टोळकी किंवा आडोशाला बसून प्रेमालाप करतानाच धूम्रपान करणारी जोडपी यांच्या बेफिकिरीतून आग लागण्याच्या घटना घडत असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : येऊरच्या जंगलात आठवडाभरात दोनवेळा आग लागण्याच्या घटना घडल्या असून येथे पार्ट्या करण्याकरिता जाणारी तरुणांची टोळकी किंवा आडोशाला बसून प्रेमालाप करतानाच धूम्रपान करणारी जोडपी यांच्या बेफिकिरीतून आग लागण्याच्या घटना घडत असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याखेरीज, प्राण्यांची शिकार करणारे शिकारी सावज जाळ्यात येण्याकरिता हेतुत: आग लावतात, असेही निदर्शनास आले आहे.संजय गांधी राष्टÑीय उद्यान, येऊरचे जंगल आणि शहापूर, मुरबाड तालुक्यांतील अभयारण्यात पार्ट्या करण्याकरिता जाणारी तरुणांची टोळकी धूम्रपान करून थोटके वाळलेल्या गवतावर बिनदिक्कत फेकून देतात. याखेरीज, एकान्तवासाकरिता येथे येणाºया प्रेमीयुगुलांकडूनही धूम्रपान केले जाते आणि आग लागते. अनेक तरुणतरुणी येऊरच्या परिसरात एकान्तात जाऊन प्रेम करण्याबरोबरच धूम्रपान करतात, असे निदर्शनास आले आहे. सिगारेट पेटवल्यावर सहजपणे फेकून दिलेली काडी किंवा अर्धवट जळालेली सिगारेट सुकलेल्या गवतावर टाकल्याने जंगलातील वणव्याच्या घटना वाढत असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. येऊरच्या जंगलात जाऊन सशासारख्या प्राण्यांची शिकार करून मांस-मदिरेवर ताव मारण्याचे प्रकार वाढले आहेत. ससे पकडण्याकरिता ससा लपून बसलेल्या गवताला हेतुत: आग लावली जाते. यामुळे भयभीत झालेला ससा बाहेर येतो व मग त्याला मारले जाते. शिकारीकरिता लावलेली आग काहीवेळा हवेमुळे पसरते व मोठ्या प्रमाणावर वृक्ष व वनसंपदेची हानी करते, असे वनविभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.येऊरच्या जंगलातील ‘गोल्डन फार्म कण्ट्री’च्या जवळपास शनिवारी दुपारी वणवा पेटला. दोनचार दिवसांपूर्वी मुलुंड परिसरातील पाइपलाइनजवळ पडलेल्या ठिणगीतून संजय गांधी राष्टÑीय उद्यानाच्या परिसरात वणवा पेटून शेकडो वृक्ष जळून खाक झाले. मुंबई, ठाण्याच्या आसपास असलेल्या जंगलातील वणव्याच्या धुराच्या लोटांमुळे ठळक बातम्या होतात. मात्र, शहापूरच्या भातसा, तानसा अभयारण्यात व मुरबाड, माळशेजच्या जंगलात पर्यटकांच्या बेपर्वाईमुळे गेल्या काही दिवसांपासून वणव्याच्या घटना घडत आहेत. मागील दोन महिन्यांत वणव्याच्या शेकडो घटना घडल्याचे सूत्रांनी सांगितले. कडकडीत उन्हामुळे झाडांचा पालापाचोळा, गवत वाळलेले आहे. त्यावर एक ठिणगी पडण्याचा अवकाश लागलीच आग प्रज्वलित होते. आग लागल्यावर जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळणाºया प्राण्यांच्या पावलांसोबत आग अन्यत्र पसरते. मुरबाड, शहापूर आदी भागांत गेल्या काही वर्षांत रिसॉर्ट, बंगले यांचे पेव फुटले आहे. तेथे वरचेवर पार्ट्यांकरिता मुंबई, ठाण्यातून पर्यटक जातात. शिकार करून मांस खाण्याकरिता शिकारी बिनधास्त आग लावून मोकळे होतात. भातशेती करणाºया शेतकºयांकडून राबसाठी शेती जाळण्यात येते. यातील ठिणगी उडून वणवा लागतो, अशी माहिती वन्यजीव प्राणी संरक्षक अधिकारी ईशांत कांबळी यांनी सांगितले.हवा खायला येणाºयांचेही प्रबोधन हवेरात्रीबेरात्री जंगलात धूर दिसताच वनअधिकारी येऊरच्या जंगलात धाव घेतात. मात्र, जोपर्यंत पार्टी करणाºया पर्यटकांना आवर घातला जात नाही, तोपर्यंत आग लागण्याच्या घटना घडणारच, असे वनीच्यापाड्यातील रहिवासी लक्ष्मण खंडारे व पाटीलपाड्यातील नरेश मोरगे यांनी सांगितले. वनअधिकारी जंगल परिसरात असलेल्या पाड्यांच्या रहिवाशांमध्ये वणवा लागू नये व लागल्यास तो रोखण्याबाबत जनजागृती करत असल्याचे खंडारे यांनी सांगितले. शहरातून जंगलाची हवा खाण्यासाठी येणाºयांमध्येही जनजागृती करण्याची गरज असल्याचे नितेश पांचोली यांनी सांगितले. सुदैवाने आतापर्यंत वणव्यात वन्य प्राण्यांचा जीव गेला नाही, असे पांचोली यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे