शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

धूम्रपान करणारी युगुले लावतात आग, येऊरचा वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 03:12 IST

येऊरच्या जंगलात आठवडाभरात दोनवेळा आग लागण्याच्या घटना घडल्या असून येथे पार्ट्या करण्याकरिता जाणारी तरुणांची टोळकी किंवा आडोशाला बसून प्रेमालाप करतानाच धूम्रपान करणारी जोडपी यांच्या बेफिकिरीतून आग लागण्याच्या घटना घडत असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : येऊरच्या जंगलात आठवडाभरात दोनवेळा आग लागण्याच्या घटना घडल्या असून येथे पार्ट्या करण्याकरिता जाणारी तरुणांची टोळकी किंवा आडोशाला बसून प्रेमालाप करतानाच धूम्रपान करणारी जोडपी यांच्या बेफिकिरीतून आग लागण्याच्या घटना घडत असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याखेरीज, प्राण्यांची शिकार करणारे शिकारी सावज जाळ्यात येण्याकरिता हेतुत: आग लावतात, असेही निदर्शनास आले आहे.संजय गांधी राष्टÑीय उद्यान, येऊरचे जंगल आणि शहापूर, मुरबाड तालुक्यांतील अभयारण्यात पार्ट्या करण्याकरिता जाणारी तरुणांची टोळकी धूम्रपान करून थोटके वाळलेल्या गवतावर बिनदिक्कत फेकून देतात. याखेरीज, एकान्तवासाकरिता येथे येणाºया प्रेमीयुगुलांकडूनही धूम्रपान केले जाते आणि आग लागते. अनेक तरुणतरुणी येऊरच्या परिसरात एकान्तात जाऊन प्रेम करण्याबरोबरच धूम्रपान करतात, असे निदर्शनास आले आहे. सिगारेट पेटवल्यावर सहजपणे फेकून दिलेली काडी किंवा अर्धवट जळालेली सिगारेट सुकलेल्या गवतावर टाकल्याने जंगलातील वणव्याच्या घटना वाढत असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. येऊरच्या जंगलात जाऊन सशासारख्या प्राण्यांची शिकार करून मांस-मदिरेवर ताव मारण्याचे प्रकार वाढले आहेत. ससे पकडण्याकरिता ससा लपून बसलेल्या गवताला हेतुत: आग लावली जाते. यामुळे भयभीत झालेला ससा बाहेर येतो व मग त्याला मारले जाते. शिकारीकरिता लावलेली आग काहीवेळा हवेमुळे पसरते व मोठ्या प्रमाणावर वृक्ष व वनसंपदेची हानी करते, असे वनविभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.येऊरच्या जंगलातील ‘गोल्डन फार्म कण्ट्री’च्या जवळपास शनिवारी दुपारी वणवा पेटला. दोनचार दिवसांपूर्वी मुलुंड परिसरातील पाइपलाइनजवळ पडलेल्या ठिणगीतून संजय गांधी राष्टÑीय उद्यानाच्या परिसरात वणवा पेटून शेकडो वृक्ष जळून खाक झाले. मुंबई, ठाण्याच्या आसपास असलेल्या जंगलातील वणव्याच्या धुराच्या लोटांमुळे ठळक बातम्या होतात. मात्र, शहापूरच्या भातसा, तानसा अभयारण्यात व मुरबाड, माळशेजच्या जंगलात पर्यटकांच्या बेपर्वाईमुळे गेल्या काही दिवसांपासून वणव्याच्या घटना घडत आहेत. मागील दोन महिन्यांत वणव्याच्या शेकडो घटना घडल्याचे सूत्रांनी सांगितले. कडकडीत उन्हामुळे झाडांचा पालापाचोळा, गवत वाळलेले आहे. त्यावर एक ठिणगी पडण्याचा अवकाश लागलीच आग प्रज्वलित होते. आग लागल्यावर जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळणाºया प्राण्यांच्या पावलांसोबत आग अन्यत्र पसरते. मुरबाड, शहापूर आदी भागांत गेल्या काही वर्षांत रिसॉर्ट, बंगले यांचे पेव फुटले आहे. तेथे वरचेवर पार्ट्यांकरिता मुंबई, ठाण्यातून पर्यटक जातात. शिकार करून मांस खाण्याकरिता शिकारी बिनधास्त आग लावून मोकळे होतात. भातशेती करणाºया शेतकºयांकडून राबसाठी शेती जाळण्यात येते. यातील ठिणगी उडून वणवा लागतो, अशी माहिती वन्यजीव प्राणी संरक्षक अधिकारी ईशांत कांबळी यांनी सांगितले.हवा खायला येणाºयांचेही प्रबोधन हवेरात्रीबेरात्री जंगलात धूर दिसताच वनअधिकारी येऊरच्या जंगलात धाव घेतात. मात्र, जोपर्यंत पार्टी करणाºया पर्यटकांना आवर घातला जात नाही, तोपर्यंत आग लागण्याच्या घटना घडणारच, असे वनीच्यापाड्यातील रहिवासी लक्ष्मण खंडारे व पाटीलपाड्यातील नरेश मोरगे यांनी सांगितले. वनअधिकारी जंगल परिसरात असलेल्या पाड्यांच्या रहिवाशांमध्ये वणवा लागू नये व लागल्यास तो रोखण्याबाबत जनजागृती करत असल्याचे खंडारे यांनी सांगितले. शहरातून जंगलाची हवा खाण्यासाठी येणाºयांमध्येही जनजागृती करण्याची गरज असल्याचे नितेश पांचोली यांनी सांगितले. सुदैवाने आतापर्यंत वणव्यात वन्य प्राण्यांचा जीव गेला नाही, असे पांचोली यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे