शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

धूम्रपान करणारी युगुले लावतात आग, येऊरचा वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 03:12 IST

येऊरच्या जंगलात आठवडाभरात दोनवेळा आग लागण्याच्या घटना घडल्या असून येथे पार्ट्या करण्याकरिता जाणारी तरुणांची टोळकी किंवा आडोशाला बसून प्रेमालाप करतानाच धूम्रपान करणारी जोडपी यांच्या बेफिकिरीतून आग लागण्याच्या घटना घडत असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : येऊरच्या जंगलात आठवडाभरात दोनवेळा आग लागण्याच्या घटना घडल्या असून येथे पार्ट्या करण्याकरिता जाणारी तरुणांची टोळकी किंवा आडोशाला बसून प्रेमालाप करतानाच धूम्रपान करणारी जोडपी यांच्या बेफिकिरीतून आग लागण्याच्या घटना घडत असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याखेरीज, प्राण्यांची शिकार करणारे शिकारी सावज जाळ्यात येण्याकरिता हेतुत: आग लावतात, असेही निदर्शनास आले आहे.संजय गांधी राष्टÑीय उद्यान, येऊरचे जंगल आणि शहापूर, मुरबाड तालुक्यांतील अभयारण्यात पार्ट्या करण्याकरिता जाणारी तरुणांची टोळकी धूम्रपान करून थोटके वाळलेल्या गवतावर बिनदिक्कत फेकून देतात. याखेरीज, एकान्तवासाकरिता येथे येणाºया प्रेमीयुगुलांकडूनही धूम्रपान केले जाते आणि आग लागते. अनेक तरुणतरुणी येऊरच्या परिसरात एकान्तात जाऊन प्रेम करण्याबरोबरच धूम्रपान करतात, असे निदर्शनास आले आहे. सिगारेट पेटवल्यावर सहजपणे फेकून दिलेली काडी किंवा अर्धवट जळालेली सिगारेट सुकलेल्या गवतावर टाकल्याने जंगलातील वणव्याच्या घटना वाढत असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. येऊरच्या जंगलात जाऊन सशासारख्या प्राण्यांची शिकार करून मांस-मदिरेवर ताव मारण्याचे प्रकार वाढले आहेत. ससे पकडण्याकरिता ससा लपून बसलेल्या गवताला हेतुत: आग लावली जाते. यामुळे भयभीत झालेला ससा बाहेर येतो व मग त्याला मारले जाते. शिकारीकरिता लावलेली आग काहीवेळा हवेमुळे पसरते व मोठ्या प्रमाणावर वृक्ष व वनसंपदेची हानी करते, असे वनविभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.येऊरच्या जंगलातील ‘गोल्डन फार्म कण्ट्री’च्या जवळपास शनिवारी दुपारी वणवा पेटला. दोनचार दिवसांपूर्वी मुलुंड परिसरातील पाइपलाइनजवळ पडलेल्या ठिणगीतून संजय गांधी राष्टÑीय उद्यानाच्या परिसरात वणवा पेटून शेकडो वृक्ष जळून खाक झाले. मुंबई, ठाण्याच्या आसपास असलेल्या जंगलातील वणव्याच्या धुराच्या लोटांमुळे ठळक बातम्या होतात. मात्र, शहापूरच्या भातसा, तानसा अभयारण्यात व मुरबाड, माळशेजच्या जंगलात पर्यटकांच्या बेपर्वाईमुळे गेल्या काही दिवसांपासून वणव्याच्या घटना घडत आहेत. मागील दोन महिन्यांत वणव्याच्या शेकडो घटना घडल्याचे सूत्रांनी सांगितले. कडकडीत उन्हामुळे झाडांचा पालापाचोळा, गवत वाळलेले आहे. त्यावर एक ठिणगी पडण्याचा अवकाश लागलीच आग प्रज्वलित होते. आग लागल्यावर जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळणाºया प्राण्यांच्या पावलांसोबत आग अन्यत्र पसरते. मुरबाड, शहापूर आदी भागांत गेल्या काही वर्षांत रिसॉर्ट, बंगले यांचे पेव फुटले आहे. तेथे वरचेवर पार्ट्यांकरिता मुंबई, ठाण्यातून पर्यटक जातात. शिकार करून मांस खाण्याकरिता शिकारी बिनधास्त आग लावून मोकळे होतात. भातशेती करणाºया शेतकºयांकडून राबसाठी शेती जाळण्यात येते. यातील ठिणगी उडून वणवा लागतो, अशी माहिती वन्यजीव प्राणी संरक्षक अधिकारी ईशांत कांबळी यांनी सांगितले.हवा खायला येणाºयांचेही प्रबोधन हवेरात्रीबेरात्री जंगलात धूर दिसताच वनअधिकारी येऊरच्या जंगलात धाव घेतात. मात्र, जोपर्यंत पार्टी करणाºया पर्यटकांना आवर घातला जात नाही, तोपर्यंत आग लागण्याच्या घटना घडणारच, असे वनीच्यापाड्यातील रहिवासी लक्ष्मण खंडारे व पाटीलपाड्यातील नरेश मोरगे यांनी सांगितले. वनअधिकारी जंगल परिसरात असलेल्या पाड्यांच्या रहिवाशांमध्ये वणवा लागू नये व लागल्यास तो रोखण्याबाबत जनजागृती करत असल्याचे खंडारे यांनी सांगितले. शहरातून जंगलाची हवा खाण्यासाठी येणाºयांमध्येही जनजागृती करण्याची गरज असल्याचे नितेश पांचोली यांनी सांगितले. सुदैवाने आतापर्यंत वणव्यात वन्य प्राण्यांचा जीव गेला नाही, असे पांचोली यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे