शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धूर, धुलीकण निकषांपेक्षा चौपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 03:02 IST

डम्पिंगला ६ मार्चला लागलेल्या आगीमुळे भडका उडाला. ती आटोक्यात आणण्यासाठी रात्रंदिवस कचऱ्यावर पाणी मारावे लागले.

कल्याण : आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला मार्चमध्ये लागलेल्या आगीच्या काळात हवेतील धूर व धुलीकणांचे प्रमाण हे जागतिक आरोग्य संघटनेने आखून दिलेल्या निकषांच्या तुलनेत चौपट होते. हवेची गुणवत्ता शून्य ते ५० दरम्यान अपेक्षित असताना ती २०० च्या घरात होती. याशिवाय, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार हवेतील गुणवत्ता ३७ ते ७१ आवश्यक आहे. परंतु, ती देखील १३२ इतकी होती, असा तपशील माहिती अधिकारात उघड झाला आहे.डम्पिंगला ६ मार्चला लागलेल्या आगीमुळे भडका उडाला. ती आटोक्यात आणण्यासाठी रात्रंदिवस कचऱ्यावर पाणी मारावे लागले. ७ मार्चला ती आणखी वाढल्याने शहरात धूरच धूर पसरला होता. तो नाकतोंडात गेल्याने नागरिक हैराण झाले होते. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला पाच दिवस लागले होते. आगीच्या काळात हवेतील प्रदूषण किती होते, याचा तपशील माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे मागितला होता. मंडळाच्या नऊ पानी अहवालानुसार हवेतील धूलिकण व धुराचे प्रमाण निषकांपेक्षा जास्त होते.७ मार्चला मंडळाने डम्पिंगवर जाऊन तेथील हवेची गुणवत्ता मोजली होती. आगीमुळे हवेचे प्रदूषण किती होते, असा मुद्दा घाणेकर यांनी उपस्थित केला असला, तरी कल्याण-डोंबिवली शहरांतील प्रदूषणास कचरा, वाहनातून बाहेर पडणारा धूर, औद्योगिक कारखाने, भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहनांची रहदारी या गोष्टीही जबाबदार आहेत. त्यावर प्रकाश टाकणारा एक व्हिडीओ कुणाल यादव, संतोष शिंदे आणि निखिल करंबेळकर यांनी तयार करून नागरिकांच्या माहितीसाठी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.वायुप्रदूषण रोखण्यासाठी घाणेकर यांनी काही उपाययोजना केडीएमसीला सुचवल्या आहेत. त्याला महिना उलटला असून महापालिकेने कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. डोंबिवलीतील कारखान्यांतील रासायनिक सांडपाण्यामुळे होणाºया प्रदूषणावर मात करण्यासाठी एमआयडीसीने परदेशी कंपनीकडून सविस्तर अहवाल तयार केला आहे. १०० कोटींचा हा प्रकल्प असून त्याची निविदा लवकरच काढली जाणार आहे.कल्याणमधील डम्पिंगचा मुद्दाही गंभीर आहे. कचरासमस्या ही पर्यावरणाशी संबंधित असल्याने त्याची याचिका राष्ट्रीय हरित लवादाकडे न्यायप्रविष्ट आहे. डम्पिंगची आग विझवण्यासाठी महापालिकेने पाइपद्वारे खाडीतून पाणी उचलले होते. कचºयाची दुर्गंधी रोखण्यासाठी उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. मात्र, त्यावर अद्याप उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे आजही सायंकाळी कल्याण रेल्वेस्थानकापर्यंत कचºयाचा उग्र दर्प जाणवतो.मार्चमधील आगीनंतरही प्रशासनाने ठोस उपाययोजना केलेली नाही. १२ एप्रिलला डम्पिंगला पुन्हा आग लागली. तेव्हाही नागरिक धुरामुळे हैराण झाले होते. प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने पाच कोटींची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे. मात्र, त्याचा आराखडा तयार केलेला नाही. तसेच नेमका हा खर्च कशावर करणार, हे देखील स्पष्ट केलेले नाही. प्रदूषणाचे मोजमाप करणारे यंत्र डोंबिवलीतील पिंपळेश्वर येथे बसवले आहे. कल्याणमध्येही ते बसवण्याची मागणी होत आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीसडम्पिंगच्या आगीनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुन्हा महापालिकेस नोटीस बजावली आहे. त्यात कचºयावर शास्त्रोक्त प्रक्रिया, कचºयाचे वर्गीकरण केले जात नाही. कचºयाची दुर्गंधी तसेच आग लागू नये, यासाठी कोणत्याच उपाययोजना केलेल्या नसल्याकडे लक्ष वेधले आहे. उपाययोजना करून त्याची अंमलबजावणी न केल्यास प्रदूषण नियंत्रण कायद्यान्वये कारवाई केली जाईल, असे त्यात म्हटले आहे.

टॅग्स :fireआग