शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
2
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
3
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
4
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
5
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
6
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
7
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
8
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
9
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
10
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
11
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
12
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
13
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
14
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
15
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
16
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
17
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
18
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
19
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स

धूर, धुलीकण निकषांपेक्षा चौपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 03:02 IST

डम्पिंगला ६ मार्चला लागलेल्या आगीमुळे भडका उडाला. ती आटोक्यात आणण्यासाठी रात्रंदिवस कचऱ्यावर पाणी मारावे लागले.

कल्याण : आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला मार्चमध्ये लागलेल्या आगीच्या काळात हवेतील धूर व धुलीकणांचे प्रमाण हे जागतिक आरोग्य संघटनेने आखून दिलेल्या निकषांच्या तुलनेत चौपट होते. हवेची गुणवत्ता शून्य ते ५० दरम्यान अपेक्षित असताना ती २०० च्या घरात होती. याशिवाय, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार हवेतील गुणवत्ता ३७ ते ७१ आवश्यक आहे. परंतु, ती देखील १३२ इतकी होती, असा तपशील माहिती अधिकारात उघड झाला आहे.डम्पिंगला ६ मार्चला लागलेल्या आगीमुळे भडका उडाला. ती आटोक्यात आणण्यासाठी रात्रंदिवस कचऱ्यावर पाणी मारावे लागले. ७ मार्चला ती आणखी वाढल्याने शहरात धूरच धूर पसरला होता. तो नाकतोंडात गेल्याने नागरिक हैराण झाले होते. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला पाच दिवस लागले होते. आगीच्या काळात हवेतील प्रदूषण किती होते, याचा तपशील माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे मागितला होता. मंडळाच्या नऊ पानी अहवालानुसार हवेतील धूलिकण व धुराचे प्रमाण निषकांपेक्षा जास्त होते.७ मार्चला मंडळाने डम्पिंगवर जाऊन तेथील हवेची गुणवत्ता मोजली होती. आगीमुळे हवेचे प्रदूषण किती होते, असा मुद्दा घाणेकर यांनी उपस्थित केला असला, तरी कल्याण-डोंबिवली शहरांतील प्रदूषणास कचरा, वाहनातून बाहेर पडणारा धूर, औद्योगिक कारखाने, भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहनांची रहदारी या गोष्टीही जबाबदार आहेत. त्यावर प्रकाश टाकणारा एक व्हिडीओ कुणाल यादव, संतोष शिंदे आणि निखिल करंबेळकर यांनी तयार करून नागरिकांच्या माहितीसाठी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.वायुप्रदूषण रोखण्यासाठी घाणेकर यांनी काही उपाययोजना केडीएमसीला सुचवल्या आहेत. त्याला महिना उलटला असून महापालिकेने कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. डोंबिवलीतील कारखान्यांतील रासायनिक सांडपाण्यामुळे होणाºया प्रदूषणावर मात करण्यासाठी एमआयडीसीने परदेशी कंपनीकडून सविस्तर अहवाल तयार केला आहे. १०० कोटींचा हा प्रकल्प असून त्याची निविदा लवकरच काढली जाणार आहे.कल्याणमधील डम्पिंगचा मुद्दाही गंभीर आहे. कचरासमस्या ही पर्यावरणाशी संबंधित असल्याने त्याची याचिका राष्ट्रीय हरित लवादाकडे न्यायप्रविष्ट आहे. डम्पिंगची आग विझवण्यासाठी महापालिकेने पाइपद्वारे खाडीतून पाणी उचलले होते. कचºयाची दुर्गंधी रोखण्यासाठी उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. मात्र, त्यावर अद्याप उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे आजही सायंकाळी कल्याण रेल्वेस्थानकापर्यंत कचºयाचा उग्र दर्प जाणवतो.मार्चमधील आगीनंतरही प्रशासनाने ठोस उपाययोजना केलेली नाही. १२ एप्रिलला डम्पिंगला पुन्हा आग लागली. तेव्हाही नागरिक धुरामुळे हैराण झाले होते. प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने पाच कोटींची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे. मात्र, त्याचा आराखडा तयार केलेला नाही. तसेच नेमका हा खर्च कशावर करणार, हे देखील स्पष्ट केलेले नाही. प्रदूषणाचे मोजमाप करणारे यंत्र डोंबिवलीतील पिंपळेश्वर येथे बसवले आहे. कल्याणमध्येही ते बसवण्याची मागणी होत आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीसडम्पिंगच्या आगीनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुन्हा महापालिकेस नोटीस बजावली आहे. त्यात कचºयावर शास्त्रोक्त प्रक्रिया, कचºयाचे वर्गीकरण केले जात नाही. कचºयाची दुर्गंधी तसेच आग लागू नये, यासाठी कोणत्याच उपाययोजना केलेल्या नसल्याकडे लक्ष वेधले आहे. उपाययोजना करून त्याची अंमलबजावणी न केल्यास प्रदूषण नियंत्रण कायद्यान्वये कारवाई केली जाईल, असे त्यात म्हटले आहे.

टॅग्स :fireआग