शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

धूर, धुलीकण निकषांपेक्षा चौपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 03:02 IST

डम्पिंगला ६ मार्चला लागलेल्या आगीमुळे भडका उडाला. ती आटोक्यात आणण्यासाठी रात्रंदिवस कचऱ्यावर पाणी मारावे लागले.

कल्याण : आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला मार्चमध्ये लागलेल्या आगीच्या काळात हवेतील धूर व धुलीकणांचे प्रमाण हे जागतिक आरोग्य संघटनेने आखून दिलेल्या निकषांच्या तुलनेत चौपट होते. हवेची गुणवत्ता शून्य ते ५० दरम्यान अपेक्षित असताना ती २०० च्या घरात होती. याशिवाय, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार हवेतील गुणवत्ता ३७ ते ७१ आवश्यक आहे. परंतु, ती देखील १३२ इतकी होती, असा तपशील माहिती अधिकारात उघड झाला आहे.डम्पिंगला ६ मार्चला लागलेल्या आगीमुळे भडका उडाला. ती आटोक्यात आणण्यासाठी रात्रंदिवस कचऱ्यावर पाणी मारावे लागले. ७ मार्चला ती आणखी वाढल्याने शहरात धूरच धूर पसरला होता. तो नाकतोंडात गेल्याने नागरिक हैराण झाले होते. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला पाच दिवस लागले होते. आगीच्या काळात हवेतील प्रदूषण किती होते, याचा तपशील माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे मागितला होता. मंडळाच्या नऊ पानी अहवालानुसार हवेतील धूलिकण व धुराचे प्रमाण निषकांपेक्षा जास्त होते.७ मार्चला मंडळाने डम्पिंगवर जाऊन तेथील हवेची गुणवत्ता मोजली होती. आगीमुळे हवेचे प्रदूषण किती होते, असा मुद्दा घाणेकर यांनी उपस्थित केला असला, तरी कल्याण-डोंबिवली शहरांतील प्रदूषणास कचरा, वाहनातून बाहेर पडणारा धूर, औद्योगिक कारखाने, भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहनांची रहदारी या गोष्टीही जबाबदार आहेत. त्यावर प्रकाश टाकणारा एक व्हिडीओ कुणाल यादव, संतोष शिंदे आणि निखिल करंबेळकर यांनी तयार करून नागरिकांच्या माहितीसाठी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.वायुप्रदूषण रोखण्यासाठी घाणेकर यांनी काही उपाययोजना केडीएमसीला सुचवल्या आहेत. त्याला महिना उलटला असून महापालिकेने कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. डोंबिवलीतील कारखान्यांतील रासायनिक सांडपाण्यामुळे होणाºया प्रदूषणावर मात करण्यासाठी एमआयडीसीने परदेशी कंपनीकडून सविस्तर अहवाल तयार केला आहे. १०० कोटींचा हा प्रकल्प असून त्याची निविदा लवकरच काढली जाणार आहे.कल्याणमधील डम्पिंगचा मुद्दाही गंभीर आहे. कचरासमस्या ही पर्यावरणाशी संबंधित असल्याने त्याची याचिका राष्ट्रीय हरित लवादाकडे न्यायप्रविष्ट आहे. डम्पिंगची आग विझवण्यासाठी महापालिकेने पाइपद्वारे खाडीतून पाणी उचलले होते. कचºयाची दुर्गंधी रोखण्यासाठी उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. मात्र, त्यावर अद्याप उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे आजही सायंकाळी कल्याण रेल्वेस्थानकापर्यंत कचºयाचा उग्र दर्प जाणवतो.मार्चमधील आगीनंतरही प्रशासनाने ठोस उपाययोजना केलेली नाही. १२ एप्रिलला डम्पिंगला पुन्हा आग लागली. तेव्हाही नागरिक धुरामुळे हैराण झाले होते. प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने पाच कोटींची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे. मात्र, त्याचा आराखडा तयार केलेला नाही. तसेच नेमका हा खर्च कशावर करणार, हे देखील स्पष्ट केलेले नाही. प्रदूषणाचे मोजमाप करणारे यंत्र डोंबिवलीतील पिंपळेश्वर येथे बसवले आहे. कल्याणमध्येही ते बसवण्याची मागणी होत आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीसडम्पिंगच्या आगीनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुन्हा महापालिकेस नोटीस बजावली आहे. त्यात कचºयावर शास्त्रोक्त प्रक्रिया, कचºयाचे वर्गीकरण केले जात नाही. कचºयाची दुर्गंधी तसेच आग लागू नये, यासाठी कोणत्याच उपाययोजना केलेल्या नसल्याकडे लक्ष वेधले आहे. उपाययोजना करून त्याची अंमलबजावणी न केल्यास प्रदूषण नियंत्रण कायद्यान्वये कारवाई केली जाईल, असे त्यात म्हटले आहे.

टॅग्स :fireआग