शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

झोपडपट्टीवासीयांना मिळणार पक्की घरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 23:58 IST

भाईंदर पालिका : इमारती बांधण्याचा दिला आदेश

मीरा रोड : गेल्या १० वर्षांपासून रखडलेल्या काशिमीरा येथील झोपडपट्टीवासीयांना पक्की घरे देण्याच्या बीएसयूपी योजनेतील तीन इमारतींच्या बांधकाम निविदा मंजुरीचा प्रस्ताव रद्द करणाऱ्या भाजपला नगरविकास विभागाने दणका दिला आहे. सत्ताधाऱ्यांचा स्थायी समितीतील प्रस्ताव रद्द करण्याचा ठराव सरकारने रद्द केल्याने आता महापालिकेने ९६० सदनिकांच्या तीन इमारती बांधण्याचा कार्यादेश ठेकेदारास दिला आहे.

काँग्रेस आघाडीच्या केंद्र सरकारच्या काळात बीएसयूपी योजने अंतर्गत मीरा भार्इंदर महापालिकेने २००९ मध्ये काशीचर्च झोपडपट्टीमधील ४७१ आणि जनता नगर झोपडीधारकांना पक्की घरे देण्याचा ठराव केला होता. त्यातील २ हजार १६० घरे पाडून त्यातील रहिवाशांना पालिकेने संक्रमण शिबिरात पाठविले. परंतु विविध कारणे आणि पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे ही योजना बारगळली. त्यातही नरेंद्र मोदी सरकारने योजना बंद केल्याने अखेर पालिकेने एमएमआरडीएकडून १५० कोटींचे कर्ज उभारून योजना पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. नागरिकांमध्ये संताप आणि टीकेची झोड उठताच भाजप अडचणीत आली. सरकार आपला ठराव निलंबित करणार याची कुणकुण लागताच जून अखेरीस भाजपने पुन्हा स्थायी समितीत ३ इमारतींच्या बांधकामांची निविदा मंजूर करण्याचा ठराव मान्य केला. ज्या ठेकेदारास काळ्या यादीत टाका असा ठराव केला होता त्यालाच ठेका देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्याची नामुश्की सत्ताधाºयांवर आली. परंतु सरकारने १५ सप्टेंबरच्या आदेशाने स्थायी समितीने मार्चमध्ये निविदा मंजुरीचा रद्द केलेला ठराव अखेर रद्द केला. हा ठराव लोकहिताच्या विरोधातील असल्याने तो रद्द केल्याचे सरकारने स्पष्ट करत प्रशासनाचा प्रस्ताव मान्य केला. पालिकेने २४ सप्टेंबर रोजी तीन इमारती बांधण्याचे कार्यादेश दिले. ११८ कोटी १६ लाख ५७ हजार रुपयांचे हे तीन इमारतींचे काम असून दोन वर्षांत बांधून मिळणार आहेत. प्रत्येकी १६ मजल्यांच्या इमारती आहेत. या इमारतींमुळे नागरिकांना दिलासा मिळाणार आहे.आपल्या ठेकेदाराला काम न मिळाल्याने भाजपचे काही नेते, अस्वस्थ झाले आहेत. या ठेकेदाराला त्रास दिला किंवा कामात अडथळा आणल्यास भाजप नेत्यांच्या घरावर मोर्चे काढू, असा इशारा आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

टॅग्स :thaneठाणे