शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

झोपडपट्टीवासीयांना मिळणार पक्की घरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 23:58 IST

भाईंदर पालिका : इमारती बांधण्याचा दिला आदेश

मीरा रोड : गेल्या १० वर्षांपासून रखडलेल्या काशिमीरा येथील झोपडपट्टीवासीयांना पक्की घरे देण्याच्या बीएसयूपी योजनेतील तीन इमारतींच्या बांधकाम निविदा मंजुरीचा प्रस्ताव रद्द करणाऱ्या भाजपला नगरविकास विभागाने दणका दिला आहे. सत्ताधाऱ्यांचा स्थायी समितीतील प्रस्ताव रद्द करण्याचा ठराव सरकारने रद्द केल्याने आता महापालिकेने ९६० सदनिकांच्या तीन इमारती बांधण्याचा कार्यादेश ठेकेदारास दिला आहे.

काँग्रेस आघाडीच्या केंद्र सरकारच्या काळात बीएसयूपी योजने अंतर्गत मीरा भार्इंदर महापालिकेने २००९ मध्ये काशीचर्च झोपडपट्टीमधील ४७१ आणि जनता नगर झोपडीधारकांना पक्की घरे देण्याचा ठराव केला होता. त्यातील २ हजार १६० घरे पाडून त्यातील रहिवाशांना पालिकेने संक्रमण शिबिरात पाठविले. परंतु विविध कारणे आणि पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे ही योजना बारगळली. त्यातही नरेंद्र मोदी सरकारने योजना बंद केल्याने अखेर पालिकेने एमएमआरडीएकडून १५० कोटींचे कर्ज उभारून योजना पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. नागरिकांमध्ये संताप आणि टीकेची झोड उठताच भाजप अडचणीत आली. सरकार आपला ठराव निलंबित करणार याची कुणकुण लागताच जून अखेरीस भाजपने पुन्हा स्थायी समितीत ३ इमारतींच्या बांधकामांची निविदा मंजूर करण्याचा ठराव मान्य केला. ज्या ठेकेदारास काळ्या यादीत टाका असा ठराव केला होता त्यालाच ठेका देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्याची नामुश्की सत्ताधाºयांवर आली. परंतु सरकारने १५ सप्टेंबरच्या आदेशाने स्थायी समितीने मार्चमध्ये निविदा मंजुरीचा रद्द केलेला ठराव अखेर रद्द केला. हा ठराव लोकहिताच्या विरोधातील असल्याने तो रद्द केल्याचे सरकारने स्पष्ट करत प्रशासनाचा प्रस्ताव मान्य केला. पालिकेने २४ सप्टेंबर रोजी तीन इमारती बांधण्याचे कार्यादेश दिले. ११८ कोटी १६ लाख ५७ हजार रुपयांचे हे तीन इमारतींचे काम असून दोन वर्षांत बांधून मिळणार आहेत. प्रत्येकी १६ मजल्यांच्या इमारती आहेत. या इमारतींमुळे नागरिकांना दिलासा मिळाणार आहे.आपल्या ठेकेदाराला काम न मिळाल्याने भाजपचे काही नेते, अस्वस्थ झाले आहेत. या ठेकेदाराला त्रास दिला किंवा कामात अडथळा आणल्यास भाजप नेत्यांच्या घरावर मोर्चे काढू, असा इशारा आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

टॅग्स :thaneठाणे