शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वडवलीच्या तलावातील गाळ लोकसहभागातून काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:23 IST

अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या मध्यावर असलेल्या वडवली येथील तलावातील गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या मध्यावर असलेल्या वडवली येथील तलावातील गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. शासकीय यंत्रणेची मदत न घेता लोकसहभागातून दीड कोटींपेक्षा जास्त निधी खर्च करुन हा तलाव स्वच्छ करण्यात आला आहे. यंदाच्या पावसात हा तलाव भरल्यावर त्यांच्या सौंदर्यात भर पडणार आहे. मात्र या तलावाच्या शेजारी अंबरनाथ पालिकेचे मलशुध्दीकरण केंद्र असून या केंद्रातील मलवाहिनीला गळती लागल्याने सर्व दूषित पाणी हे थेट तलावात येत आहे. त्यामुळे ही फुटलेली मलवाहिनीची दुरुस्ती करण्याची गरज आहे.चिखलोली येथील शिवमंदिर तलाव गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होतो. या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने या तलावातील पाण्याची पातळी घटली होती. अनावश्यक वनस्पती निर्माण झाल्याने या तलावाच्या सुशोभिकरणाचा प्रस्तावही तयार करण्यात आला होता. मात्र पालिकेचा हा प्रस्ताव केवळ फाईलबंद राहिला. तलावाकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने या परिसरातील युवकांनी एकत्र येत तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले. मात्र एवढ्या मोठ्या तलावातील गाळ काढणे एका वर्षात शक्य नसल्याने दोन टप्प्यात हे काम करण्यात आले. २०१८मध्ये दीड महिना काम करुन निम्मा गाळ काढण्यात आला तर उर्वरित गाळ एप्रिल आणि मे महिन्यात काढण्यात आला. या तलावातील गाळ पूर्ण काढण्यात आला असून आता हा तलाव पूर्वीपेक्षात पाच ते सहा फूट खोल झाला आहे. काही ठिकाणी तर १० फूटापेक्षा जास्त खोलीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा हा तलाव आता १५ ते २० फूट खोल झाला आहे. या तलावातील गाळ काढून त्या परिसराचेही सुशोभिकरण केले गेले. या परिसरात आता विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली जाणार आहे. त्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या तलावातील पाणी थेट पंपाद्वारे प्रत्येक वृक्षाला जाईल, अशी व्यवस्था केली जाणार आहे.या तलावातील गाळ काढल्यानंतर या तलावात काही प्रमाणात दूषित पाण्याचा प्रवाह येत असल्याचे लक्षात आले आहे. तलावाच्या शेजारीच मलशुध्दीकरण केंद्र असल्याने याच केंद्रातील मैला पाणी तलावात येत आहे. तलावातील पाणी स्वच्छ रहावे यासाठी मलनिस्सारण वाहिनीची दुरुस्ती करण्याची गरज आहे. तलावातील गाळ काढण्याचे काम करणाऱ्या संस्था आणि संघटनांनी अंबरनाथ पालिकेकडे पाठपुरावा केला आहे. मात्र तरी त्याच्यावर कोणताच तोडगा निघालेला नाही. भुयारी गटाराची वाहिनी दुरुस्त न झाल्यास तलावात दूषित पाणी मिसळून रोगराई पसरण्याची व तलावाच्या कामावर बोळा फिरण्याची शक्यता आहे.तलावातील गाळ काढण्याचे काम करतांना त्या कामासाठी खर्च कसा करायचा हा प्रश्न पडला होता. मात्र सहकारी मित्र आणि शहरातील अनेक मान्यवरांनी काही प्रमाणात मदत केली. अपेक्षेपेक्षा दुप्पट खर्च झालेला असला तरी ते काम आज पूर्ण झाले याचे समाधान आहे.- तुकाराम म्हात्रे, जीबीडी ग्रुप प्रमुख.