शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
2
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
3
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
4
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
5
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
6
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
7
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
8
Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली
9
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
10
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
11
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी
12
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
13
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
14
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
15
Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages, Status आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
16
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
17
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
18
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
19
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
20
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू

वडवलीच्या तलावातील गाळ लोकसहभागातून काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:23 IST

अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या मध्यावर असलेल्या वडवली येथील तलावातील गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या मध्यावर असलेल्या वडवली येथील तलावातील गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. शासकीय यंत्रणेची मदत न घेता लोकसहभागातून दीड कोटींपेक्षा जास्त निधी खर्च करुन हा तलाव स्वच्छ करण्यात आला आहे. यंदाच्या पावसात हा तलाव भरल्यावर त्यांच्या सौंदर्यात भर पडणार आहे. मात्र या तलावाच्या शेजारी अंबरनाथ पालिकेचे मलशुध्दीकरण केंद्र असून या केंद्रातील मलवाहिनीला गळती लागल्याने सर्व दूषित पाणी हे थेट तलावात येत आहे. त्यामुळे ही फुटलेली मलवाहिनीची दुरुस्ती करण्याची गरज आहे.चिखलोली येथील शिवमंदिर तलाव गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होतो. या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने या तलावातील पाण्याची पातळी घटली होती. अनावश्यक वनस्पती निर्माण झाल्याने या तलावाच्या सुशोभिकरणाचा प्रस्तावही तयार करण्यात आला होता. मात्र पालिकेचा हा प्रस्ताव केवळ फाईलबंद राहिला. तलावाकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने या परिसरातील युवकांनी एकत्र येत तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले. मात्र एवढ्या मोठ्या तलावातील गाळ काढणे एका वर्षात शक्य नसल्याने दोन टप्प्यात हे काम करण्यात आले. २०१८मध्ये दीड महिना काम करुन निम्मा गाळ काढण्यात आला तर उर्वरित गाळ एप्रिल आणि मे महिन्यात काढण्यात आला. या तलावातील गाळ पूर्ण काढण्यात आला असून आता हा तलाव पूर्वीपेक्षात पाच ते सहा फूट खोल झाला आहे. काही ठिकाणी तर १० फूटापेक्षा जास्त खोलीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा हा तलाव आता १५ ते २० फूट खोल झाला आहे. या तलावातील गाळ काढून त्या परिसराचेही सुशोभिकरण केले गेले. या परिसरात आता विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली जाणार आहे. त्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या तलावातील पाणी थेट पंपाद्वारे प्रत्येक वृक्षाला जाईल, अशी व्यवस्था केली जाणार आहे.या तलावातील गाळ काढल्यानंतर या तलावात काही प्रमाणात दूषित पाण्याचा प्रवाह येत असल्याचे लक्षात आले आहे. तलावाच्या शेजारीच मलशुध्दीकरण केंद्र असल्याने याच केंद्रातील मैला पाणी तलावात येत आहे. तलावातील पाणी स्वच्छ रहावे यासाठी मलनिस्सारण वाहिनीची दुरुस्ती करण्याची गरज आहे. तलावातील गाळ काढण्याचे काम करणाऱ्या संस्था आणि संघटनांनी अंबरनाथ पालिकेकडे पाठपुरावा केला आहे. मात्र तरी त्याच्यावर कोणताच तोडगा निघालेला नाही. भुयारी गटाराची वाहिनी दुरुस्त न झाल्यास तलावात दूषित पाणी मिसळून रोगराई पसरण्याची व तलावाच्या कामावर बोळा फिरण्याची शक्यता आहे.तलावातील गाळ काढण्याचे काम करतांना त्या कामासाठी खर्च कसा करायचा हा प्रश्न पडला होता. मात्र सहकारी मित्र आणि शहरातील अनेक मान्यवरांनी काही प्रमाणात मदत केली. अपेक्षेपेक्षा दुप्पट खर्च झालेला असला तरी ते काम आज पूर्ण झाले याचे समाधान आहे.- तुकाराम म्हात्रे, जीबीडी ग्रुप प्रमुख.