शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पाणीकपातीतून भाईंदरला वगळा

By admin | Updated: November 9, 2015 02:34 IST

शहरात सद्य:स्थितीत कोणतीही पाणीकपात लागू नसताना त्याची माहिती नागरिकांना मिळू लागल्याने पाणीसमस्यांच्या गर्तेत सापडलेल्या मीरा-भार्इंदरकरांना

भार्इंदर : शहरात सद्य:स्थितीत कोणतीही पाणीकपात लागू नसताना त्याची माहिती नागरिकांना मिळू लागल्याने पाणीसमस्यांच्या गर्तेत सापडलेल्या मीरा-भार्इंदरकरांना ऐन सणासुदीच्या दिवसांत पाणीकपातीची धास्ती लागली आहे. या संभाव्य वा लागू केलेल्या कपातीतून वगळण्याची मागणी मीरा-भार्इंदर काँग्रेस शहर जिल्हा कमिटीने पालिकेकडे केली आहे.झपाट्याने विकसित होत असलेल्या शहराला स्टेमकडून ३० व एमआयडीसीकडून ९६ असा एकूण १३६ एमएलडी पाणीपुरवठा दररोज होेत आहे. तो शहाड, टेमघर येथून होत असून पाणीपुरवठ्याच्या ठिकाणापासून शहर शेवटच्या टोकाला आहे. त्यामुळे प्रत्येक पाणीपुरवठ्यातील अंतर ३० ते ३५ तासांवर जात असून भार्इंदरमधील काही ठिकाणांसह मीरा रोड येथील शांतीनगर सृष्टी, नयानगर आदी परिसरांमध्ये सुमारे ५० ते ६० तासांच्या अंतराने पाणीपुरवठा होत आहे. शहराला सद्य:स्थितीत होणारा पाणीपुरवठा लोकसंख्येच्या तुलनेत अपुरा असतानाच शहरांतर्गत पाण्याचे होणारे असमान वाटप समान करणे अपेक्षित आहे. ज्या लोकवस्तींना पाणीपुरवठा होत नाही, त्या ठिकाणी टँकरद्वारे तो होत आहे. अशातच दर गुरुवारी व शुक्रवारी एमआयडीसीकडून तांत्रिक कारणास्तव शटडाऊन घेण्यात येणार असल्याने ४८ तासांसाठी तो खंडित केला जाणार असल्याची माहिती लोकांना देण्यात येत आहे. यामुळे या पाणीकपातीतून शहराला वगळण्याची मागणी काँग्रेसने प्रशासनाकडे केली आहे. गतवर्षी लघुपाटबंधारे विभागाने लागू केलेली १४ टक्के पाणीकपात रद्द केली होती. ती यंदा लागू करण्यात येऊ नये, अशा आशयाचे निवेदन उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांना दिले आहे. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष अनिल सावंत, गटनेते जुबेर इनामदार, नगरसेवक प्रमोद पाटील, दिनेश नलावडे, राजू वेतोस्कर, नगरसेविका सुनीता पाटील आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)