शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आरटीई प्रवेशाची सहावी फेरी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 05:18 IST

पाचव्या फेरीसाठी विद्यार्थ्यांची निवड : पालकांचा प्रतिसाद कमी

ठाणे : दर्जेदार इंग्रजी शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये शिक्षणाचा हक्क (आरटीई) कायद्यांतर्गत २५ टक्के जागा आरक्षित आहेत. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यातील ६४० शाळांमध्ये १६ हजार ५४६ जागा राखीव आहेत. त्यापैकी आतापर्यंतच्या चौथ्या फेरीअखेर सुमारे सहा हजार ३५८ जागांवर प्रवेश झाले. याप्रमाणेच केजी ते पहिलीच्या प्रवेशासाठी पाचव्या फेरीत १५९ विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यांचे प्रवेश सुरू आहेत. पालकांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे प्रवेशासाठीची सहावी फेरी घेतली जाणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

पाचव्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची मुदत संपलेली आहे. त्यामुळे पालकांनी त्वरित संबंधित शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. प्रवेशासाठी निवड झालेल्या १५९ विद्यार्थ्यांपैकी प्रायमरी केजीसाठी ३६ विद्यार्थी, ज्युनिअर केजीसाठी ११४, सिनिअर केजीसाठी तीन आणि पहिलीसाठी सहा विद्यार्थ्यांची निवड केली आहे. त्यांचे प्रवेश संबंधित शाळांमध्ये घेतले जात आहेत. पालकांनी बालकांचे प्रवेश त्वरित घेण्याची अपेक्षा शिक्षण विभागाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. पालकांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे प्रवेश प्रक्रिया थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आता सहावी प्रवेश फेरी होणार नसल्याचे सांगितले जात आहे. जिल्हाभरात अद्याप ११ हजार ४७० जागा रिक्त आहेत. प्रवेशास विलंब झाल्यामुळे पालकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आले.

लाखो रुपये खर्च करून दर्जेदार शिक्षण देणाºया इंग्रजी व अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये मुलांचे केजी ते पहिलीच्या वर्गाचे प्रवेश श्रीमंत पालक घेतात. आर्थिक दुर्बल घटक, मागासवर्गीय परिवारातील मुलामुलींनादेखील या शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्यासाठी जिल्ह्यातील शाळांमध्ये प्रवेश राखीव ठेवले आहेत. मात्र, शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही या राखीव जागांची प्रवेश प्रक्रिया सुरूच आहे. त्यास पालकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याची बाब चौथ्या फेरीअखेरही उघड झाली. या फेरीमध्ये २७६ बालकांचे प्रवेश निश्चित केले होते. त्यापैकी केवळ ६७ बालकांचे प्रवेश घेण्यात आले. उर्वरित पाच अर्ज फेटाळले असून २०६ बालकांच्या आईवडिलांनी संबंधित शाळांमध्ये संपर्कच साधला नसल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले.अद्याप ११ हजार ३११ प्रवेश शिल्लकच्प्लेग्रुप, प्रीकेजी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी आणि फर्स्ट म्हणजे पहिलीच्या वर्गात या २५ टक्के आरक्षणातून बालकांना मोफत प्रवेश आहे.च् शिक्षणाचा हक्क या कायद्याखाली जिल्ह्यातील दर्जेदार शिक्षण देणाºया ६४० शाळांमध्ये या ११ हजार ४७० जागा आजपर्यंत शिल्लक आहेत. पहिल्या दोन फेºयांद्वारे पाच हजार ३५२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत.च्आता तिसºया फेरीअखेर निवडलेल्या ९३९ पैकी ३४५ जणांचे प्रवेश झाले. उर्वरित ४७६ जणांनी प्रवेश घेतला नाही. आता चौथ्या फेरीत केवळ ६७ बालकांचे प्रवेश झाले आहेत.च्या पाचव्या फेरीतील सर्व प्रवेश झाले, तरीही यंदा ११ हजार ३११ प्रवेश शिल्लक राहणार आहेत. पालकांचा प्रतिसादमिळत नसल्यामुळे या पाचव्या फेरीतील प्रवेशानंतर यंदाच्या आरटीईचे प्रवेश थांबवण्याच्या हालचाली सुरू झाल्याआहेत. 

टॅग्स :thaneठाणे