शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

सोळा हजार शिक्षकांच्या गैरहजेरीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 03:00 IST

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी २९ एप्रिलला मतदान होणार आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक विभागाची यंत्रणा सज्ज झाली आहे. परंतु विनाअनुदानित शाळांचे १६ हजार शिक्षक अद्यापही निवडणुकीच्या कामात सहभागी झाले नसल्याची बाब समोर आली आहे. या विनाअनुदानित शाळांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून, बुधवारी त्यावर सुनावणी होणार आहे. हे शिक्षकनिवडणूक कामास मिळाले नाही, तर निवडणूक विभागापुढे निवडणुकीचे कामकाज हातळण्याचे मोठे आव्हान उभे राहणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी २९ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यानुसार मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. निवडणुकीचे कामकाज पाहण्यासाठी ६० हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांचा फौजफाटा अपेक्षित धरण्यात आला होता. परंतु त्यातून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आधीच वगळण्यात आले असल्याने, आता निवडणूक विभागाकडे ४८ हजारांच्या आसपास ताफा शिल्लक राहिला आहे. त्यातूनही या कामासाठी अद्याप काही लोकांनी हजेरी लावली नसल्याने अशांना नोटीसासुध्दा बजावण्यात आलेल्या आहेत.

दरम्यान, याकामी महापालिका, जिल्हापरिषद, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनाही पाचारण करण्यात आले आहे. परंतु विनाअनुदानित शाळांमधील तब्बल १६ हजारांच्या आसपास शिक्षकांनी अद्यापही या कामासाठी हजेरी लावलेली नाही. आम्ही शासनाचा भाग येत नसल्याने, या कामातून आम्हाला वगळण्यात यावे, या मागणीसाठी विनाअनुदानित शाळांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार या शाळा विनाअनुदानित असल्या, तरी त्यांमधील शिक्षकांना शासनाच्या नियमानुसारच वेतन अदा होत असते, त्यांना ज्या सोयीसुविधा मिळतात, त्या शासनाच्या योजनांमधूनच मिळत असतात. एखाद्या शिक्षकावर अन्याय जरी झाला, तर तो शासनाकडेच धाव घेत असतो. त्यामुळे या राष्टÑीय कामात त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

शिक्षकांना केवळ ३० तासांचे निवडणूक काम असते. तेही करण्यास शिक्षक नकार देत असतील, तर चुकीचे असल्याचेही जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. निवडणुकीच्या कामकाजातून अत्यावश्यक सेवेतील सुमारे ८५०० कर्मचाऱ्यांना आधीच या कामातून मुक्त करण्यात आले आहे. त्यात या १६ हजार शिक्षकांनी असहकार पुकारला, तर निवडणुकीच्या कामकाजावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.निवडणूक कामाला दांडी मारणाºया ५ हजार ४०० कर्मचाºयांना नोटिसाच्लोकसभा निवडणुकीसाठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज असले, तरी निवडणुकीचे कामकाज करण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ अद्यापही उपलब्ध होत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कामाला गैरहजर राहणाºया ५ हजार ४०० जणांना जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तरीही हजर न राहिल्यास निवडणूक कायद्याअंतर्गत प्रशासकीय आणि फौजदारी कारवाईही करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांनी दिली.च्ठाणे जिल्ह्णात आता खºया अर्थाने लोकसभेची धामधुम सुरु झाली आहे. त्यानुसार निवडणूक यंत्रणा यासाठी सज्ज झाली आहे. निवडणुकीच्या कामासाठी ६० हजारांच्या आसपास कर्मचाºयांची आवश्यकता आहे. ठाणे जिल्ह्यात ६ हजार ४८८ मतदान केंद्रे असून १ जानेवारी २०१९ च्या अंतिम मतदारयादीप्रमाणे ६० लाख ९३ हजार ८७ मतदार आहेत.च्निवडणूक कामासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाºयांमध्ये २०० व्हिडीओग्राफर, ७२ भरारी पथके, ८६७ झोनल अधिकारी आणि तितकेच उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवणारे अधिकारी असणार आहेत.च्यंदाच्या निवडणुकीसाठी मतदारसंख्या तसेच मतदानकेंद्राचीही संख्या वाढल्याने मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता आहे.च्जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाºयांसह शासकीय व निमशासकीय कर्मचाºयांना निवडणुकीच्या कामाचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु अनेक अधिकारी आणि कर्मचारी या कामासाठी आजही हजर झालेले नाहीत. अशा कामचुकार ५ हजार ४०० अधिकारी, कर्मचाºयांना जिल्हा निवडणूक विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. 

टॅग्स :ElectionनिवडणूकTeacherशिक्षकthaneठाणे