शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत हॉटेल व्यवसायिकांची मूक निदर्शने; हॉटेल चालकांना वेळ वाढवून देण्याची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 16:27 IST

शासनाने इतर व्यवसायिकां प्रमाणे हॉटेल चालकांना वेळ वाढवून देण्याची मागणी अनेकांनी व्यक्त केली, त्यानंतर धामणकर नाका येथील दीपक हॉटेल बाहेर मूक निदर्शने करण्यात आली आहेत.

नितिन पंडीत

भिवंडी ( दि. ७ )  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना लावलेले निर्बंध ब्रेक द चैन च्या माध्यमातून कमी कमी करीत असताना सर्व व्यवसायिकांसाठी रात्री दहा वाजे पर्यंत सूट दिली असताना , हॉटेल परमिट रुम धारक व्यवसायिकांना सायंकाळी चार वाजे पर्यंत वेळ दिल्याने ती हॉटेल व्यवसायिकांसाठी अन्याय कारक असल्याने भिवंडीत शनिवारी भिवंडी हॉटेल अँड परमिट रुम ऑनर्स असोसिएशनचे अध्यक्ष भास्कर शेट्टी ,माजी अध्यक्ष सुंदर शेट्टी ,उपाध्यक्ष रामकृष्ण शेट्टी व सरचिटणीस प्रज्वल शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीस अनेक हॉटेल व्यवसायिकांनी हजेरी लावली होती. या बैठकीत शासनाने इतर व्यवसायिकां प्रमाणे हॉटेल चालकांना वेळ वाढवून देण्याची मागणी अनेकांनी व्यक्त केली, त्यानंतर धामणकर नाका येथील दीपक हॉटेल बाहेर मूक निदर्शने करण्यात आली आहेत.

परमिट रुम चालकां कडून शासन लायसन्स फी ही आगाऊ वसूल करीत असल्याने त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांवर आर्थिक भुर्दंड पडला असतानाच हॉटेल परमिट रुम मध्ये सायंकाळी सहा नंतर ग्राहक येत असताना त्याच वेळी व्यवसाय बंद ठेवण्यासाठी बंधन घातली जात असून त्यामुळे आधीच अडचणीत आलेला हॉटेल व्यवसायिक मेटाकुटीला आला असल्याची भावना भास्कर शेट्टी यांनी बोलून दाखवली . तर ज्याप्रमाणे राज्यात शेतकरी आत्महत्या करीत आहेत या नव्या निर्बंधां मुळे हॉटेल व्यवसायिकांच्या रूपाने नवे शेतकरी निर्माण केले असून आमच्यावर सुध्दा आत्महत्या करण्याची वेळ सरकारने आणली असल्याचा संताप व्यक्त करीत सार्वजनिक वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू असताना आमच्या वर बंधन लादली जात आहेत हे चुकीचे असल्याचा आरोप सरचिटणीस प्रज्वल शेट्टी यांनी केला आहे .

हॉटेल व्यवसायावर अनेक कुटुंब अवलंबून असल्याने या निर्बंधां मुळे व्यवसायिकांसह कामगारांवर सुध्दा उपासमारीची वेळ आली असल्याची खंत व्यक्त करीत हॉटेल व्यवसायिक कोरोना काळात सर्व नियमांचे पालन करीत आले असून यापुढे ही करणार आहेत. हॉटेल परमिट रुम मध्ये सायंकाळी ६ नंतर ८० टक्के व्यवसाय होत असून त्यावेळी बंद ठेवून दिवसा २० टक्के व्यवसाय करून आम्ही जगायचे कसे असा प्रश्न हॉटेल व्यवसायिकांनी या मूक आंदोलनावेळी उपस्थित केला आहे .

टॅग्स :hotelहॉटेलbhiwandiभिवंडी