शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

ठाण्यातून कर्जत, कसाऱ्यासाठी शटल सेवा होऊ शकते सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 08:41 IST

विनायक थत्ते यांचे मत : मेल, एक्स्प्रेस गाड्यांकरिता चार मार्गिका का केल्या राखीव?

अनिकेत घमंडीडोंबिवली : ठाणे स्थानकातून कर्जत, कसाऱ्याकडे गाड्या परत फिरवण्यासाठी प्लॅटफॉर्म क्र. तीन उपलब्ध आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक २ व ४ वरूनही शटल सेवा सुरू करण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक ६, ७ व ८ वरूनही कर्जत, कसाऱ्याच्या दिशेने गाड्या सोडल्या जाऊ शकतात.  या तिन्ही प्लॅटफॉर्मवर होम सिग्नल आहे. गाडी कल्याणच्या दिशेने पाठविण्यासाठी क्रॉसओव्हरदेखील असल्याचे मत रेल्वे समस्यांचे अभ्यासक विनायक थत्ते यांनी व्यक्त केले. 

‘ठाण्यातून कर्जत, कसारा मार्गावर शटल सेवा चालवा’ या ‘लोकमत’मधील वृत्ताची अनेक रेल्वे अभ्यासकांनी नोंद घेतली. ठाण्यातून ही वाहतूक कशी वाढवता येईल, याची माहिती त्यांनी दिली. थत्ते म्हणाले की, कल्याणवरून येणाऱ्या धिम्या लोकलसाठी अप धिम्या ट्रॅकवर  ठाणे स्टेशनच्या दिशेने सिडको बस स्टॉपच्या सबवेवरून प्लॅटफॉर्म क्र. २ वर एक क्रॉसओव्हर टाकल्यास, ठाण्यातील प्लॅटफॉर्म क्रमांक चारवरील होम सिग्नलच्या नॉर्मल सिग्नलमध्ये बदल केल्यास, आपत्कालीन स्थितीत  कल्याणच्या दिशेने ठाण्याहून लोकल परत कसाऱ्याकडे पाठविण्यास प्लॅटफॉर्म क्रमांक तीनप्रमाणेच प्लॅटफॉर्म क्रमांक दोन व चार वापरता येऊ शकतील.

प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवरून आपत्कालीन स्थितीत मेल एक्स्प्रेस गाड्या किंवा लोकल, स्लो ट्रॅकवर आणण्यासाठी खाडी पुलावर क्रॉसिंग आहे.  अतिरिक्त मार्गिकेमुळे ज्यावेळी मुंबई येथून मेल एक्स्प्रेस गाड्या सुटतात किंवा मुंबईकडे येतात त्याच स्लॉटमध्ये  मध्य रेल्वेला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या किंवा लोकमान्य टिळक टर्मिनस येथे येणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बनवणे शक्य झाले. त्यामुळे सर्व मेल एक्स्प्रेस गाड्या पारसिक टनेल येथून जातील या त्यांच्याच आश्वासनाला त्यांनी हरताळ फासला. 

उपनगरीय लोकल प्रवाशांच्या समस्यांमध्ये वाढ

मध्य रेल्वेने दोन वर्षांपूर्वी १२ तास, २४ तास, ३६ तास व सगळ्यात शेवटी ७२ तासांचा ब्लॉक घेऊन ठाणे ते दिवामधील पाचव्या व सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण केले.  त्यावेळी मध्य रेल्वेच्या प्रशासनाने सर्व मेल एक्स्प्रेस गाड्या या पारसिक बोगद्यातून रवाना होतील व त्यामुळे ठाणे ते कल्याणदरम्यान लोकल सेवेसाठी चार मार्गिका उपलब्ध असतील, असा दावा केला होता.  चार मार्गिकांचा उपयोग लोकल प्रवाशांना करून देण्याऐवजी चार मार्गिका मेल एक्स्प्रेस गाड्यांसाठी राखीव झाल्या व फक्त दोन मार्गिका लोकल गाड्यांसाठी उपलब्ध झाल्या. त्यामुळे उपनगरी लोकल प्रवाशांच्या समस्यांमध्ये वाढ झाली.

वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांमुळे त्यात अजून भर पडणार आहे. ज्यावेळी पाचवी व सहावी मार्गिका अस्तित्वातच नव्हती. त्यावेळी मध्य रेल्वेला अशा प्रकारे वेळापत्रक तयार करता आले नसते. कारण, जलद लोकलसाठी तसेच मुंबई व लोकमान्य टिळक टर्मिनल येथून सुटणाऱ्या मेल एक्स्प्रेस गाड्यांसाठी पारसिक टनेल हा एकमेव पर्याय उपलब्ध होता.  -विनायक थत्ते, रेल्वे समस्यांचे अभ्यासक

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकल