शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

‘महावितरण’चे शटडाउन : कल्याण-डोंबिवली होणार घामाघूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 06:15 IST

पावसाळ्यापूर्वीच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी महावितरण कंपनीतर्फे शुक्रवारी कल्याण-डोंबिवलीत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. विविध उपकेंद्रांवरून होणारा वीजपुरवठा तीन ते चार तास खंडित केला जाणार आहे.

कल्याण - पावसाळ्यापूर्वीच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी महावितरण कंपनीतर्फे शुक्रवारी कल्याण-डोंबिवलीत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. विविध उपकेंद्रांवरून होणारा वीजपुरवठा तीन ते चार तास खंडित केला जाणार आहे. मात्र, ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल ‘महावितरण’ने दिलगिरी व्यक्त केली आहे.कल्याणमधील बारावे उपकेंद्रातून बारावे आणि गोदरेज हिल फीडरवरून होणारा वीजपुरवठा शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान बंद राहणार आहे. याअंतर्गत येणाºया गोदरेज पार्क, शंखेश्वर प्रेसिडेन्सी, बारावेगाव, नीरज सिटी, मंत्री लॅक्शन, टावरीपाडा, खडकपाडा, गोदरेज हिल, राधानगर ते गोल्डन पार्क आदी ठिकाणचा वीजपुरवठा खंडित होईल.खडकपाडा फीडरवरून होणारा वीजपुरवठा सकाळी ११ ते दुपारी ३ दरम्यान बंद राहील. त्यामुळे साई चौक, साई संकुल, चंद्रेश गॅलेक्सी, राधानगर, वायलेनगर, महावीरनगरी, तारांगण, मोहन हाइट्स, मोहन प्राइड, मोहन पॅराडाइज, वनश्री, गोल्डन पार्क, बेतुरकरपाडा, फ्लॉवर व्हॅली, हीना पार्क, मनीषानगर या ठिकाणी वीज नसेल. ‘तेजश्री’ उपकेंद्रातून कर्णिक रोड, रामदासवाडी या फीडरवर होणारा वीजपुरवठा सकाळी १० ते दुपारी २ बंद राहणार आहे.कर्णिक रोड फीडर भागातील ठाणगेवाडी, साई मंदिर, रामबाग लेन नं. ४, गुरुद्वारा, कर्णिक रोड, कमिशनर बंगला तर रामदासवाडी फीडरवरील दत्तात्रेय कॉलनी, भवानीनगर, संपदा रुग्णालय, आरटीओ, रामदासवाडी येथे वीज नसेल.मोहने उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा सकाळी १० ते दुपारी २ बंद राहणार असल्याने मोहने ३ फीडरवरील उच्चदाब ग्राहक ‘स्टेम’ वॉटर सप्लायचा वीजपुरवठा बंद राहणार आहे.सात तास वीज नाहीडोंबिवलीतील एमआयडीसी, आनंदनगर, बाजीप्रभू या अखत्यारीतील गोग्रासवाडी, कºहाडे ब्राह्मण सभागृह, डोंबिवली पश्चिम, स्टार कॉलनी, महावीरनगर, गावदेवी मंदिर, पांडुरंगवाडी, नांदिवली, पी अ‍ॅण्ड टी कॉलनी, गांधीनगर, ठाकुर्ली या परिसरात शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २, असे तीन तास तर उमेशनगर, नवापाडा याठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असा सात तास वीजपुरवठा खंडित राहणार आहे.उद्याही दुरुस्तीचे कामदेखभाल दुरुस्तीचे काम काही भागांमध्ये शनिवारीही केले जाणार आहे. दुर्गाडी आणि वल्लीपीर उपकेंद्रातून बंदररोड फीडरवर होणारा वीजपुरवठा सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे दूधनाका, रेतीबंदर परिसर, कोळीवाडा ते वलीपीर मशिदीपर्यंत त्या कालावधीत वीज नसेल. तर, पत्रीपूल फीडरवरील वीजपुरवठा सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीत बंद राहील. यात पत्रीपुलाजवळील परिसर, वल्लीपीर रोड, वल्लीपीर तलावाचा विभाग येतो.

टॅग्स :electricityवीजnewsबातम्या