शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

व्यवसायाचा ‘श्रीगणेशा’, मुख्य बाजारपेठ चार महिन्यांनंतर गजबजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 00:25 IST

पोलीस आणि महापालिकेकडून मार्केट परिसरातही नागरिकांनी गर्दी करूनये, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, अशा घोषणा दिल्या जात होत्या.

ठाणे : ठाणे महापालिकेने चार महिन्यांनंतर शनिवारपासून शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडील दुकाने दिवसभर उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शनिवारी दुकाने उघडताच नागरिकांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी गर्दी केल्याने मुख्य बाजारपेठ गजबजल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र, पोलीस आणि महापालिकेकडून मार्केट परिसरातही नागरिकांनी गर्दी करूनये, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, अशा घोषणा दिल्या जात होत्या.कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच इतर ठिकाणचे मार्केटही बंद होते. अनलॉक जाहीर झाल्यानंतर सम आणि विषम तारखांनुसार दुकाने उघडली जात होती. परंतु, मुंबईत ५ आॅगस्टपासून रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडील दुकाने उघडण्यास परवानगी दिल्यानंतर ठाणे शहरातही अशा पद्धतीने दुकाने उघडण्यास मुभा द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी महापालिकेकडे लावून धरली होती. त्यानुसार, दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत दुकाने उघडण्याबाबत एकमत झाले. त्यानुसार, शनिवारपासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने खुली झाली आहेत.दरम्यान, आठवडाभरावर गणेशोत्सव आल्याने बाजारपेठ खुली होताच शनिवारी सकाळपासून नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली. दुकानदारांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जात होते.प्रत्येक ग्राहकास सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक केले होते. परंतु, नागरिकांनी जास्त गर्दी करूनये, यासाठी पोलीस आणि ठाणे महापालिकेकडून खरबदारीच्या सूचना दिल्या जात होत्या.>पालकमंत्र्यांनी दिल्या सूचनाशहरातील सर्वच मार्केट तसेच गर्दीच्या ठिकाणी गर्दी होऊ नये तसेच मास्कचा वापर करावा, यासाठी जाहीर घोषणा करण्याच्या सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तडॉ. विपिन शर्मा यांनी मनपा हद्दीत सर्व प्रभाग समितीअंतर्गत जाहीर घोषणा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार, शनिवारपासून मनपाच्या सर्व प्रभाग समित्यांतर्गत जाहीर घोषणा देण्याची कार्यवाही सुरू झाली. सकाळी आणि दुपारनंतर सायंकाळपर्यंत दोन सत्रांत जाहीर घोषणा करण्यात येणार आहेत.